Saturday, January 5, 2013

पवना डॅम-प्रति पंढरपूर -दुधीवरे खिंड-लोहगड-लोणावळा

पवना डॅम-प्रति पंढरपूर -दुधीवरे खिंड-लोहगड-लोणावळा

जुन्या पुणे मुंबई महामार्गावर वडगाव मावळ सोडल्यानंतर कामशेत गाव लागते. कामशेतला डाव्या बाजुला पवनानगरकडे जाणारा रस्ता आहे. या रस्त्याने मावळातील अनेक पर्यटन स्थळांना भेटी देता येतात.  पवना धरण, तिकोना, तुंगी किल्ला, याच रस्त्याने पुढे पौडकडे ही जाता येते. उजव्या बाजूला वळवण डॅम लागतो. येथून पुढे उकसान, गोवीत्री, जांभवली अशी गावे आहेत. येथूनच पुढे ढाकचा बहिरी आहे. याबाबत पुढे कधी तरी. डाव्या बाजुला वळून साधारणपण 10 ते 12 किलोमीटरवर काळेकॉलनी लागते. या काळेकॉलनीतून लोहगडला पायी जाता येते.  पण आम्ही पवना डॅमला वळसा घालून दुधीवरे खिंडीतून लोहगडला गेलो.

पवना धरण 




 

संपूर्ण पिंपरी-चिंचवड परिसराला याच पवना धरणातून पाणीपुरवठा होतो.  पावसाळय़ात धरण 1क्क् टक्के भरल्यावर मात्र, पाणी सोडल्यास त्याचा फटका खालील शहरातील गावांना होतो. चिंचवड, पिंपरी, सांगवी येथील नदी शेजारीला झोपडपट्टी, तसेच अन्यत्र पाणी घुसते. सध्या बंद नळ योजनेतून पाणीपुरवठा प्रकल्प वादात आहे. असो. पवना धरण एक दिवसाच्या ट्रीपसाठी छान जागा आहे. काहीजण अनधिकृतरित्या स्वीमिंग तर अधिकृतरित्या बोटिंगचा अनुभव घेता येतो.  पवना धरणाच्या समोरच तुंग किंवा तुंगी किल्ला असून, डाव्या बाजुला तिकोणा तर उजव्या हाताला लोहगड आहे.
बोटिंगसाठी जागा छान आहे. येथे नाष्टा करून पुढे लोहगड किल्ल्यावर जाता येते.  आम्ही गाडीवरून लोहगडकडे जाण्यासाठी निघालो. धरणाच्या कडेकडेने जाताना हिरवळ व धरणाचे पाणी.. सुरेख देखावा दिसतो.

प्रति पंढरपूर मंदिर : 

 

 

पवना धरणापासून साधारणपणो 3-4 किलोमीटर अंतरावर प्रति पंढरपूर मंदिर आहे. मंदिर बाबामहाराज सातारकर यांनी बांधले असून, सुमारे 2 ते 4 एकरात मंदिर वसलेले आहे. मंदिराचा परिसर पावसाळय़ात सुरेखच दिसतो. आजुबाजूला दाट किर्र हिरवी झाडी. समोर डोंगरातून कोसळणारे धबधबे व मागे सुरेख मंदिर परिसर.  विठ्ठल रुक्मिईची सुरेख मूर्ती मंदिरात दिसते. मंदिरातून निघून पुढे दुधीवरे खिंड लागते. या ¨खिंडतून उन्हाळा  असल्यास राजगडचा बालेकिल्ला दिसतो. नवीन यात्रेकरूंसाठी संध्याकाळी 5 नंतर या खिंडीतून लोणावळय़ाकडे न गेलेले चांगले. लोणावळय़ार्पयत अंतर जरी 9 किलोमीटर असले तरी वाटेत जंगल आहे. गाडी पंक्चर होणो, बंद पडली तर मनस्ताप भोगावा लागेल. तर मग सावधान. दर पावसाळय़ात काही वेळा या दुधीवरे खिंडीत दरड कोसळून हा रस्ता बंद  होतो. एकमेव मार्ग असल्याने पवनानगर ते लोणावळा दरम्यान जाणा:यांचे हाल होतात. यासाठी पावसाळय़ात येणार असाल तर नियमित मावळातील वार्ता / बातम्या वाचत चला.

















लोहगड :

उजव्या हाताला वळल्यावर गाडीसाठी चांगलीच चढण लागते. याला घाट म्हणायचे की चढ आणि तो चढ तरी कसा युटर्न तर कधी सरळ अंगावरच. गाडीला फस्र्ट गिअर खाली अजून एक गिअर असावा काय? अशी सूचना करावाशी  मनात येते. जबरदस्त चढण, बाजूला दरी नाही. तर जंगल. ही चढण गाडीने सुमारे 5 मिनटे चढल्यावर तेथून 3 किलोमीटरवर आहे. पूर्वी लोहगड किल्लावर जाण्यासाठी 1998 साली येथे रस्ता नावाचा प्रकार नव्हता. तेव्हा मी व माङो काही मित्र मळवली बाजूने गायमुख खिंडीतून येथे पायी चालत किल्यावर गेलो होतो. आता ****खाली गाडी असल्याने काही वाटले नाही. धनाढय़ लोकांनी या ठिकाणी जमीन व बंगले बांधायला सुरूवात केली आहे. 10 ते 15 मिनिटात लोहगाडाच्या पायथ्याशी असलेल्या लोहगावाडीत आपण पोहचतो. येथे लोकवस्ती अंदाजे 50 ते 100 बि:हाडे. काहींनी हॉटेल काढून झुणाका भाकर, कांदा भजी, पोहे, चहा, नाष्टा, तुम्ही कोंबडी आणून द्या आम्ही तयार करतो असा व्यवसाय थाटला आहे. असो. त्यानिमित्ताने का होईना. पर्यटकांचे पाय लोहगडाला लागले आहे. गडावर जाण्यासाठी पूर्वी मळवलीकडून येताना पाच ते सहा किलोमीटर अंतर पायी तुडवत यावे लागे. मग वाटेतून येताना भाजे लेणी, विसापूर किल्याकडे जाणारा रस्ता व गायमुख खड अशी ठिकाणो लागायची. आतातर येथून काही प्रमाणात टू व्हिलर येऊ लागली आहे. लोहगडा जवळच असणारी भाजे व बेडसे ही बौद्धकालीन लेणी आहे. सुमारे 2700 वर्षांपूर्वी किल्ल्याची बांधणी झालेली असावी असे ऐतिहासिक पुस्तकात लिहले आहे.  1789 मध्ये नाना फडणवीसांचा सरदार जावजी बोंबले याने तो आपल्या ताब्यात घेतला. नानांनी किल्ल्याचे बांधकाम आणखीन मजबूत करून घेतले. किल्ल्यात नानांनी सोळा कोन असलेली एक विहीर बांधली व तिच्या बाजूस एक शिलालेख कोरला आहे. त्यावर त्याचा अर्थ असा-शके 1711 मध्ये बाळाजी जनार्दन भानू नाना फडणवीस यांनी ही बाव धोंडो बल्लाळ नित्सुरे यांच्या देखरेखीखाली याचेकडून बांधली असल्याचा उल्लेख आहे. नाष्टा करून (20 रुपये झुणका भाकरी, पिठलं एक्स्ट्रा घेतल्यास 5 रुपये जादा, भाकरी 5 रुपये) आम्ही गाडावर जाण्यासाठी निघालो. गाडावर जाण्यासाठी 20 ते 25 मिनिटे खूप होतात. वर जाईर्पयत घनदाट झाडी आहे. निम्म्या वाटेत  गेल्यावर विस्तृत असे पवना धरण दिसते. बाजूला तुंगी व समोर तिकोना दिसतो. तर समोर अडवा पसरलेला असा विसापूर किल्ला दिसतो.  गडावर चढतांना आपल्याला सलग चार प्रवेशद्वारांमधून आणि सर्पाकार मार्गावरून जावे लागते.

गणेश दरवाजा :

याच्या डाव्या उजव्या बुरुजाखाली सावळे कुटुंबाचा नरबळी देण्यात आला होता आणि त्याच्या बदल्यात त्यांच्या वंशजांना लोहगडवाडीची पाटिलकी देण्यात आली होती. तसा आतील बाजूस शिलालेख आहेत.

नारायण दरवाजा :

हा दरवाजा नाना फडणीसांनी बांधला. येथे एक भुयार आहे, जिथे तांदूळ व अन्नधान्य साठवून ठेवण्यात येई.
हनुमान दरवाजा:- हा सर्वात जुना दरवाजा आहे.

महादरवाजा : 

हा गडाचा मुख्य दरवाजा आहे. यावर हनुमानाची मूर्ती कोरली आहे. दरवाज्याचे काम नाना फडणीसांनी केले आहे. गडावर पोहोचल्यावर सरळ गेल्यास एक दर्गा लागतो. औरंगजेबाच्या मुलीची कबर असल्याचे काहींनी सांगितले. दग्र्याच्या शेजारी सदर व लोहारखान्याचे तुटलेले अवशेष आढळतात. याच दुग्र्याच्या बाहेर बांधकामाचा चुना बनविण्याची घाणी आहे. उजवीकडे ध्वजस्तंभ आहे. याच्या जवळच एक तोफ दुर्गप्रेमींनी सिंमेटमध्ये बसवली आहे. ध्वजस्तंभाच्या उजवीकडे चालत गेल्यास लक्ष्मी कोठी लागते. यालाच लोपेश ऋषींची गुहा असेही म्हणतात. एवढय़ा मोठय़ा कातळात एवढी मोठी कोठी तयार कशी केली असेल याचे आश्चर्य वाटते. या कोठीत राहाण्याची सोय होते. कोठीत अनेक खोल्या आहेत. दग्र्याच्या पुढे थोडे उजवीकडे गेल्यास थोडा उंचवटयाचा भाग आहे. येथे शिवमंदिर आहे. पुढे सरळ चालत एक तळे आहे. हे तळे अष्टकोनी आहे.  ही गडावरील पिण्याच्या पाण्याची एकमेव सोय आहे. तिथून पुढे पंधरा ते वीस मिनिटे चालत गेल्यास एक मोठे तळे आढळते. नाना फडणवीसांनी या तळ्याची बांधणी केली आहे हे तळे सोळाकोनी आहे. यापुढे विंचूकाटाकडे जातांना वाडय़ाचे काही जुने अवशेष दिसतात. लक्ष्मी कोठीच्या पश्चिमेस विंचूकाटा आहे. 

विंचूकाटा

या विंचूकाटय़ाकडे पाहिले असता राजगडाच्या संजीवनी माचीची आठवण होते. संजिवनी माची तीन पदरी बांधली आहे. हा विंचूकाटा म्हणजे सुमारे 1.5 किलोमीटर लांब आण तीस मीटर रु ंद अशी ही डोंगराची सोंड आहे. विंचुकाटयावर जाण्यासाठी थोडेसे खाली उतरून जावे लागते. गडावरून पाहिले असता हा भाग विंचवाच्या नांगीसारखा दिसतो म्हणून यांस विंचूकाटा म्हणतात. या भागात दोन ते तीन पाण्याची टाकी आहेत. पाणी पिण्यास योग्य नाही. खाली दाट जंगल आहे. येथून  उजवीकडे पुणो-मुंबई द्रुतगती मार्ग (एक्सप्रे हायवे) तर समोर लोणावळय़ामधील डय़ुक्स नोज दिसते.
लोहगडाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे कड्याच्या टोकावर बांधलेली चिरेबंदी वाट. अशी रेखीव वाट फार कमी दुर्गांवर पहावयास मिळते. लोहगडवाडी पार केली की ही सर्पाकार वाट सुरू होते. एकदा का कोणी या वाटेवर पाय टाकला की मग तो माणूस वर येईस्तो पहारेकर्यांच्या नजरेआड जात नाही. तो व्यविस्थत हेरला जातो. वाटेवर वेगवेगळे बुरु ज आहेत. त्यावरून बाहेरून येणा:या माणसावर नजर ठेवता येते. वाटेवर गणोश दरवाजा, दुसरा नारायण, तिसरा हनुमान आणि चौथा महादरवाजा असे चार दरवाजे आहेत. या दरवाज्यांची रचना गायमुखाप्रमाणो असल्याचे सांगण्यात येते. शत्रुवर गडावर येईर्पयत एकाच ठिकाणवरून लक्ष ठेवता येता. तसेच वेळप्रसंगी त्यावर बंदुकीतून हमला ही करता येईल अशी रचना केलेली आहे.

लोहगडावर जाण्यासाठी वाटा  

  1. पुण्यावरून अथवा मुंबईवरून येताना मळवली स्टेशनवर पॅसेंजर गाडीने किंवा लोकलने उतरायचे तेथून पुलावरून एक्सप्रेस हायवे पार करून भाजे गावात येता येते. दीड तासानंतर गायमुख खिंडीत येऊन पोहचतो. खिंडीच्या अलीकडेच एक गाव आहे त्याचे नाव लोहगडवाडी. खिंडीतून उजवीकडे वळले म्हणजे लोहगडास आणि डावीकडे वळले म्हणजे विसापूर किल्ल्यावर पोहचतो.
  2. पवना डॅम अथवा लोणावळय़ातून टय़ु व्हिलर किंवा फोर व्हिलरवरून लोहगडवाडीपर्यंत जाता येते. लोणावळा-भांगरवाडी-दुधिवरे खिंड-लोहगडवाडी.
  3. काळे कॉलनी ही पवना धरणाजवळ वसलेली आहे. तेथून लोहगड आणि विसापूर मधील गायमुख खिंड परिसर दिसतो पवना धरणाच्या खालून एक रस्ता गायमुख खिंडीच्या डावीकडील टेकडीवर जातो तेथून एक पायवाट आपणास लोहगडवाडीत घेऊन जाते. पुणे-पौड-कोळवण-तिकोना पेठ-पवना डॅम-दुधिवरे खिंड-लोहगडवाडी.

(डिजीटल कॅमेरा उपलब्ध नव्हता. पूर्वी साध्या कॅमेराने काढलेले फोटेा जोडले आहेत. परत गेलो तर फोटो नक्की जोडतो.)

No comments:

कॉपी करू नका