Wednesday, May 20, 2015

तिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) - भाग २

आमचा प्रवास :

          


तिरुपतीला जाण्याची सर्व तयारी जय्यत झाली होती. ट्रेनमध्ये खाण्यासाठी बिस्कीटे, चिवडा, लाडू, फुटाणा,  वेफर्स, एकवेळचे जेवण,  घेऊन सॅक चांगली जड झाली होती.  पुणं स्टेशनात 6 ला पोहचलो. गाडी संध्याकाळी 7.15 ला होती. गाडी नक्की कुठल्या प्लॅटफॉर्मवर येणार याची चिंता लागून राहिली होती. अखेर प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर कन्याकुमारी जयंती एक्सप्रेस येणार असल्याची घोषणा होताच प्लॅटफॉर्मवर येऊन बसलो. तेथील अस्वच्छता पाहून नकळत हात नाकाला गेला. असो. त्यात आमचे तिकीट कन्फर्म झालेले नव्हते. जागा मिळेल का नाही? याची चिंता लागून राहिली होती. अखेर गाडी आली. डब्यात चढून प्रथम टिसीला शोधण्याची मोहीम सुरू झाली. अखेर पाच सहा डबे शोधल्यावर एकदाचा टिसी सापडला. पण आत्ताच काही सांगता येणार नाही. आहे तेथे जाऊन बसा असे सांगताच आम्ही परत डब्यात येऊन बसलो. दौंडला अखेर 3 बर्थ प्लेस देतो असे सांगताच आनंद झाला. तब्बल 18 तासांनंतर दुपारी 3 वाजता एकदाचे तिरुपती स्टेशनात पोहोचलो. स्टेशनाबाहेर येताच तिरुमलावर जाण्यासाठी प्रायव्हेट टुरिस्टवाले जमा झाले. शासकीय दरात घेऊन जातो. थेट हॉटेलवर सोडतो असे सांगून झाल्यावर आम्ही सर्व सुमोत बसलो. काही वेळातच तिरुमला डोंगरावर जाण्याच्या वाटेवर लागलो. घाटाखाली प्रथमत: सर्व बॅगांची तपासणी झाल्यावर पाऊण तासातच तिरुमलावरील कौस्तुभ हॉटेलमध्ये पोहचलो. मात्र, तेथे रुम शिल्लक नसल्याने रुम खाली होण्याची वाट पाहत बसावे लागले. अखेर संध्याकाळी 8 ला सप्तगिरी रेस्ट हाऊसमध्ये रुम मिळाली. फ्रेश होऊन कल्याण कट्टय़ावर जाऊन केसदान करून आलो. डोके हलके झाल्याने कसे तरी वाटत होते. रात्री 11 वाजता मुख्य मंदिरातील मोफत दर्शन रांगेत जायला निघालो. वाटेत एका ठिकाणी मोबाईल व चपला जमा करून पावती घेऊन दर्शन रांगेला लागलो. लांबच लांब चालायच्या प्रतीक्षा रांगा होत्या. अर्ध्या तासातच एका मोठय़ा हुंडीत येऊन बसलो. तेथे गरमागरम भाताची खिचडी तयार होती. तेथील पाय:यांवर मस्तपैकी पसरलो. पहाटे 3 वाजता एकदम गडबड झाली, सर्वच भाविक सावरून दर्शनासाठी तयार झाले होते. बालाजीच्या या हुंडीमध्ये एकवेळी किमान 500 भाविक सहज बसतात. अशा 50 हुंडय़ा आहेत. आम्ही गेलो तेव्हा नशिबाने गर्दी कमी होती. मुख्य मंदिरात पोहचण्यास पहाटेचे साडेचार वाजले. मात्र, दर्शनाची आस लागल्याने वेळ कसा गेला ते कळलेच नाही. वाटेत वीस रुपयांना दोन लाडूची कुपने घेतली. अखेर ज्यासाठी येथे र्पयत आलो ती वेळ आली. बालाजीचे मंदिर जुने असल्याने आतील सजावट, दगडी बांधकाम पाहत चांगला वेळ गेला. पहाटे 5 वाजता बालाजीचे दर्शन घेऊन मन एकदम प्रसन्न झाले. गाभा:यात तुपाचे दिवे जळत होते. कुठलाही कृत्रिम प्रकाश त्या ठिकाणी नव्हता. दर्शन घेऊन मंदिराबाहेर आलो. एकदाचे दर्शन घडले. एवढय़ा सकाळी दर्शन घेण्याची वेळ पाहिल्यांदाच. आता झोप डोळय़ावर चांगलीच येऊ लागली होती. मंदिराबाहेरील लाडू वाटप केंद्रात लाडू घेऊन पुन्हा सप्तगिरी हॉटेल आलो. मस्तपैकी 11 र्पयत ताणून दिली. पुन्हा फ्रेश होऊन तिरुमलावरील पाच ठिकाणो पाहिली. संध्याकाळी बाजारपेठ हिंडून बाजारातील वस्तूंचे दर्शन घेतले. दुस:या दिवशी तिरुपतीला गाडी ठरवून तिरुपतीतील ठिकाणो पाहून रात्री 9 च्या हरिप्रिया एक्सप्रेस गाडीत बसलो. जातानाचे तिकीट कन्फर्म असल्याने चिंता नव्हती. तिरुपतीतील प्रचंड गरमीमुळे हैराण झालो होतो. गाडी सुरू झाल्यावर पहाटे गारवा आल्यावर बाकीच्यांना झोप लागली. प्रवास म्हटला की मला झोप अशी कमीच लागते. वाटेतील ठिकाणो पाहत पहाटे 5 ला थोडी झोप घेऊन सकाळी 8 ला उठलो. अजून मिरज बरेच अंतरावर होते. तेव्हा रेल्वेत फेरफटका मारायला सुरूवात केली. रेल्वेत टाईमपास करायचा असेल तर सर्व रेल्वे डब्यात हिंडून यायला पाहिजे. नानाविध लोक त्यांचे पेहराव, वागण्याच्या त:हा  समजतात व आपला वेळही चांगला जातो. रेल्वेत विक्रेतेही किती प्रकारचे येतात. भेळ, चणो फुटाणा, कैरी, थंड पाण्याची बाटली, कटलेटवाले, कलाकंद विकणारे, वेगवेगळय़ा माळा, चहा, कॉफीवाले असे एक ना अनेक विक्रेतेही टाईमपास करतात. दुपारी 3 वाजता मिरजेला उतरलो. तेथून 4.45 ची महाराष्ट्र एक्सप्रेसने पुण्याचा प्रवास सुरू झाला. रात्री 10.45 ला पुण्यात दाखल झालो.

बाजारपेठ

 बाजारपेठ

              मंदिर परिसरात मोठी बाजारपेठ आहे. यासाठी संपूर्ण इमारत तसेच रस्त्याच्या कडेला ही बाजारपेठ आहे. तिरुपती बालाजीचे, लक्ष्मीचे विविध रुपातील फोटो, किचेन, लायटिंगचे फोटो, फुलमाळा येथे उपलब्ध होतात. 10 रुपयांपासून ते 3500 रुपयांपेक्षा जास्त हे बालाजीचे फोटो उपलब्ध आहेत.

याचबरोबर महिलांचे आकर्षण म्हणजे दागिने, बांगडय़ा, गळय़ातील, कानातील, श्रृंगाराचे साहित्यही येथे विक्रीस आहेत. लहान मुलांची खेळणी, गृहोपयोगी वस्तू, विविध प्रकारच्या पर्स, बॅगा, कपडे, चादरी, साडय़ा, धार्मिक साहित्य, कॅसेटी, विविध प्रकारच्या टोप्या अशा विविध वस्तू पाहताना वेळ सहजच निघून जातो. विशेष म्हणजे येथील दुकानदार आपल्याशी हिंदीतून बोलताना दिसतात. दुकानदारांशिवाय अन्य व्यक्तीशी आपण हिंदीतून अथवा इंग्रजीतून संभाषण केल्यास आपल्याला प्रतिसाद दिला जात नाही. संपूर्ण बाजारपेठेत विविध ठिकाणी एटीएमची सुविधा असल्या कारणाने जवळ पैसे बाळगायची गरज नाही. जवळच तिरुमला तिरुपती देवस्थानचे ग्रंथालय असून, तमिळ, हिंदी, इंग्रजी भाषेतील साहित्य उपलब्ध आहे.






मंदिराकडे जाण्याचा मार्ग

हॉटेल्स / उपाहारगृहे

          महाराष्ट्रातून एवढय़ा लांबवर आलेल्या भाविकांना येथे जेवणाची थोडी अबाळ होताना दिसते. मात्र, आपल्या जेवणातील काहीसा भाग हा साऊथ व नार्थ इंडियन झाल्यामुळे ही गैरसोय दूर होते. मसाला डोसा, उत्तप्पा, इडली, मेदू वडा, मिरचीची भजी, मसाले भात, रस्सम, दही भात, आपल्याला खायला मिळतो. काही हॉटेल्स महाराष्ट्रीयन पदार्थ देताना दिसतात. मात्र, त्याला आपल्याकडील चव नाही. या ठिकाणी चक्क चायनीज व्हेज ही मिळते. फक्त व्हेजच कारण तिरुमलावर नॉनव्हेज खाण्यास बंदी आहे.

मंदिर परिसरातील हॉटेल्स  पाहून आपण नक्की कुठे आलो आहोत? याचा विचार करण्यास भाग पडते. सप्तगिरी रेस्ट हाऊस अथवा कौस्तुभ रेस्ट हाऊस प्रमाणो अनेक रेस्ट हाऊस या ठिकाणी आहेत. मात्र, त्या हॉटेल्समधील जेवण महाग आहे. त्यापेक्षा मंदिर परिसरातील दुकानांमध्ये स्वस्त आहे.






सप्तगिरी रेस्ट हाऊस


भाविकांसाठी विश्रामगृह :

             दररोज हजारोंच्या संख्येने येणा:या भाविकांना राहण्याची सोय येथे माफक दरात उपलब्ध करून दिली जाते. आम्ही कोणतेही बुकींग न करता येथे गेलो होतो. त्यामुळे विश्रामगृह मिळण्यासाठी फार श्रम घ्यावे लागले. मात्र, ऑनलाईन विश्रामगृह बुकिंगची सोय उपलब्ध आहे. सप्तगिरी रेस्ट हाऊस अथवा कौस्तुभ रेस्ट हाऊस प्रमाणो अनेक मोठी विश्रामगृह या भागात आहेत. अनेक धार्मिक संस्थांचीही खासगी विश्रामगृह येथे उपलब्ध आहेत. अ‍ॅडव्हान्स 600 रुपये भरून दिवसाला 100 रुपये व 24 तासानंतर 100 रुपये नंतरच्या 48 तासाला 300  रुपये जादा या दराने ही विश्रामगृह उपलब्ध आहेत. एसी, नॉन एसी, संडास बाथरूम अॅटच असल्यामुळे गैरसोय होत नाहीत. अतिशय माफक दरात असलेल्या या विश्रामगृहांमध्ये दररोज हजारो भाविक राहतात.




प्रति महात्मा गांधीजी

             प्रत्येक पर्यटनस्थळी काही ना काही तरी आर्कषण असते. तिरुमलावर श्रीवारी पादुला व सिला तोरणम् या ठिकाणी महात्मा गांधीजींच्या वेशभूषेतील पुतळा  दिसतो. प्रथम दर्शनी हा पुतळा आहे अशी आपली समजूत होते. जेव्हा लोक त्याच्याबरोबर फोटो काढू लागतात तेव्हा हा पुतळा नसून, अंगावर कलर लावलेला खराखुरा माणूस असल्याचे कळते. विशेष म्हणजे पर्यटक नसतानाही केवळ पोटासाठी हा मनुष्य भर उन्हात अंगावर कपडे, पायात चप्पल नसतानाही पुतळ्यासारखा उभा असतो. लोक मात्र टिंगलटवाळी करत, कधी पुतळय़ाला चष्मा लावून, कधी टोपी लावून, चित्रविचित्र भाव दर्शवत फोटो काढत असतात. पण तरी सुद्धा चेह:यावरील भाव न बदलता, कशाचीही पर्वा न करता केवळ पोटासाठी हे काम करत असतात.





श्रीवारी पादूला :

हे ठिकाणी मुख्य मंदिरापासून अंदाजे 6 किलोमीटर अंतरावर आहे. तिरुमला डोंगरावरील अजून थोडय़ा उंचीवर हे ठिकाण असल्यामुळे उंचावरून मंदिर परिसर सुंदर दिसते. पुरणकथेमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे भगवान वेंकटेश्वर स्वामींनी या ठिकाणी प्रथम पदस्पर्श केले. याला नारायणगिरी डोंगर असे म्हटले जाते. या ठिकाणी वेंकटेश्वराच्या पादुका ठेवण्यात आलेला आहे. सुमारे 300 पाय:या चढून गेल्यावर हे स्थळ आहे. वरून तिरुमला व बालाजीचे मंदिर दिसते. सुरूचीची झाडे या परिसरात मोठय़ाप्रमाणात दिसून येतात. वाटेत सिलातोरणम् हे पर्यटन स्थळ आहे.





सिलातोरणम् / रॉक गार्डन :

सिलातोरणम् या शब्दात दोन शब्द आले आहेत. सिला म्हणजे दगड व तोरणम् म्हणजे तोरण.  मंदिरापासून सुमारे 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या या ठिकाणी निसर्गाचा चमत्कार पहावयास मिळतो. दगडी तोरण असलेला दगडांचा पूल या ठिकाणी दिसतो. या ठिकाणापर्यंत वाहने जातात. ज्युरासिक कालातील म्हणजे सुमारे 1.5 बिलियन वर्षापूर्वीचे हे पाषाण असल्याचे सांगितले जाते. सुमारे 25 फूट लांब व 10 फूट उंच असा हे तोरण आहे.  त्याच बरोबर अंदाजे 26 फूट उंच दगड छोटय़ा दगडावर उभा असलेला दिसून येतो. तेथून खाली शंकराचे मंदिर आहे.

सिलातोरणम्













आकाशगंगा जलप्रपात

आकाशगंगा जलप्रपात बालाजी मंदिरापासून उत्तरेला  3 किमी. अंतरावर आहे. या पाण्याने तिरुपती बालाजीला स्नान घातले जाते. मे महिन्यात सुद्धा या ठिकाणी चांगले पाणी पहायला मिळते.  त्याचबरोबर मंदिर परिसरात  श्री राधा-कृष्ण, शिव, हनुमान, गणोश आदी देवतांची मंदिरे आहेत. त्याचबरोबर , वैकुंठ, पांडव, जांबली इत्यादी तिर्थे आहेत. या शिवाय श्री वराहस्वामी मंदिर, श्री बेदी अंजनेयस्वामी मंदिर, स्वामी पुष्करिणी, श्री करिया मणिक्यस्वामी मंदिर, श्री चेन्नाकेशवस्वामी मंदिर, श्री वेणुगोपालस्वामी मंदिर, श्री प्रसन्ना वैंकटेश्वरस्वामी मंदिर आदी पर्यटन स्थळे पाहण्यासारखी आहेत.

पाप विनाशम् :

मुख्य मंदिरापासून सुमारे 12 किलोमीटरवर हे स्थान आहे. या ठिकाणी छोटा डॅमही आहे. येथेच सिंहाच्या आकाराच्या मूर्तीतून बारामही पाणी पडत असते. या ठिक़ाणी स्नान केल्यास सर्व पापांचे विनाश होते असे सांगितले जाते.




इस्कॉन मंदिर

तिरुपती शहरापासून सुमारे 3 किलोमीटरवरील अंतरावर हे इस्कॉन मंदिर आहे. लाखो भाविक या मंदिराला भेट देत असतात. मुख्य मंदिर रस्त्यालगत आहे. मंदिर परिसर स्वच्छ व सुंदर असून, मंदिरही सुंदर आहे. श्रीकृष्ण व गोपीका यांच्या सुबक मूर्ती या ठिकाणी आहेत. मंदिरातील नक्षीकाम व काचेच्या फ्रेमवरील चित्रकाम सुंदर आहे.  दर्शन घेऊन झाल्यावर इस्कॉन मंदिरातील धंदेवाईकपणा आपणास कंटाळवाणा ठरतो. कारण परतीच्या मार्गावर धार्मिक ग्रंथ, श्रीकृष्णाचे चित्र असलेले लहान मुलांचे, मोठय़ा माणसांचे कपडे, विविध सुवासिक उदबत्त्या विक्रीस मांडण्यात आलेल्या आहेत. वस्तू पाहिल्यावर नको असल्यास त्या घेण्यासंबंधित प्रचंड आग्रह केला जातो. हा आग्रह नकोसा वाटतो. येथे जेवण्याची सोय होते. श्री पद्मावती मंदिराप्रमाणे याही ठिकाणी प्रसाद म्हणून डाळभात दिला जातो. एके ठिकाणी गाय व वासरू (गोशाला) तसेच अनाथ मुलांच्या संगोपनासाठी दान स्वीकारण्याची व्यवस्था केलेली आहे.






श्री कपिलेश्वरस्वामी मंदिर : 

तिरुपतीमधील हे एकमेव शिवमंदिर आहे. शहरापासून सुमारे 3 किलोमीटर असणा:या हे मंदिर तिरुमलाच्या डोंगराच्या पायथ्याशी आहे. कपिलातीर्थमला धबधबा आहे.  यालाच  अलवर तीर्थम असेही नाव आहे. या मंदिरात  महाशिवरात्रीला उत्साह साजरा केला जातो. आम्ही मे महिन्याच्या अखेरीस गेलो होतो. आश्चर्य म्हणजे मे मध्ये ही येथील धबधबा अटलेला नव्हता. शेजारीच पाण्याचे कुंड आहे. परिसर सुंदर असून, धबधब्यार्पयत जाण्यासाठी डोंगराच्या खालील बाजूस खोदून आकर्षक मार्ग  तयार केला आहे. भाविक लोक या ठिकाणी स्नान करून तिरुपतीच्या दर्शनासाठी जातात. प्रवेशद्वारापाशी मंदिर असून, त्यात त्यात विष्णूच्या मांडीवर बसलेली लक्ष्मीची मूर्ती सुरेख आहे.




श्री पद्मावती समोवर मंदिर

तिरु चनूर अर्थात अलमेलुमंगपुरम : तिरु पति शहरापासून सुमारे 5 किलोमीटर अंतरावर असणा:या या मंदिराला खूप महत्त्व आहे. भगवान व्यंकेटशाची पत्नी पद्मावती हिचे हे पद्मावती मंदिर आहे. बालाजी हे भगवान विष्णूचे रूप असे मानले जाते आणि पद्मावती हे लक्ष्मीचे रूप आहे. बालाजीचे दर्शन झाल्यावर पद्मावतीचे दर्शन घेतले जाते नाहीतर ही यात्र संपूर्ण होत नाही. मंदिरात नारळ घेऊन जाण्यास परवानगी नाही. मंदिरा बाहेर नारळ फोडण्याची व्यवस्था केली आहे. मंदिर मोठे व प्रशस्त आहे. दर्शनानंतर प्रसाद म्हणून वाटीत गरम दहीभात  दिला जातो. शेजारीच 10 रुपयांमध्ये प्रसाद म्हणून लाडू दिला जातो. तिरुमला बालाजी म¨दरातील लाडू व या लाडूचा प्रसाद  वेगळा आहे. शुद्ध तुपातील हा लाडू भाविकाचे नक्कीच पोट भरून जातो. मंदिरा बाहेरील परिसरात धार्मिक वस्तू विक्रीस ठेवण्यात आलेल्या आहेत.



तिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) - भाग १ 


वरील लेख कसा वाटला या विषयी जरूर प्रतिक्रिया कळवा.


Friday, May 1, 2015

इतिहासाच्या पाऊलखुणा : राजा दिनकर केळकर संग्रहालय


ऐतिहासिक पुरातन वस्तूंचा नसता छंद न करता तो वाढवून शासनाला अर्पण करणा:या काकासाहेब केळकर यांनी उभारलेलेले संग्रहालय म्हणजे ‘राजा केळकर संग्रहालय.’


             प्रत्येकाला काही ना काही तरी छंद असतोच. जुनी नाणी, एकाच क्रमांकाच्या नोटा, विदेशी नोटा, दस्तऐवज, स्टँप, कविता करणो, नट नाटय़ांची चित्रे, क्रिकेटमधील खेळाडूंची चित्रे व स्कोर याचे रेकॉर्ड ठेवण्याचे छंद असतात. लहानपणी सुरू झालेला हा छंद पुढे अनेक कारणांमुळे मागे पडतो. मग घराच्या माळय़ावर, अडगळीत पडलेला हा छंद धुळ खात इतिहासजमा होऊन जातो. मात्र अनेकजण याच छंदाला आपले जीवन समर्पित करून आयुष्यातील अनेक वर्षे हा छंद जोपासतात. छंदाने वेडे झालेल्या काकासाहेब केळकर हे मात्र यातील  ‘कोहिनूर’ हिराच ठरतात. ऐतिहासिक पुरातन वस्तूंचा नसता छंद न करता तो वाढवून शासनाला अर्पण करणा:या काकासाहेब केळकर यांनी उभारलेलेले संग्रहालय म्हणजे ‘राजा केळकर संग्रहालय.’


             पुरातन भांडीकुंडी, चूल, वस्त्रे पाहताना हे काय पाहत आहेत. असा प्रश्न  नवीन पिढीला पडल्यावाचून राहत नाही. या वस्तू प्रत्यक्ष पाहताना केवढा आनंद होतो. प्रदर्शनातील प्रत्येक वस्तू आपल्या इतिहासाची मूक साक्षीदार आपल्याची बोलल्याचा भास होतो. वन बीएचके व टू बीएचके, प्लॅट संस्कृतीत जुन्या वस्तू केव्हाच काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत. म्हणूनच या वस्तूंना एवढे महत्त्व आहे. पुणोकर म्हणजे इतिहासप्रेमी, परंपरा व जुना वारसा जतन करणारे म्हणून प्रसिद्ध आहेत. एका व्यक्तीच्या अफाट कष्टांतून, चिकाटी आणि अथक मेहनतीतून उभे राहिलेले हे संग्रहालय आहे. दैनंदिन जीवनातील पारंपरिक कलात्मक वस्तूंचा खजिना येथे आहे.

पद्मश्री डॉ. दिनकर गंगाधर तथा काकासाहेब केळकर

             10 जानेवारी, 1896 रोजी करंजे, पश्चिम महाराष्ट्र येथे जन्म :झाला. वास्तव्याला पुण्यातच होते. त्यांचे संपूर्ण शिक्षण बेळगाव व पुणे येथे झाले. 1915 पासून अज्ञातवासी या टोपणनावाने ते काव्यलेखन करत असत. आपल्या हयातीची 70 वर्षे हे संग्रहालय उभे करण्यासाठी त्यांनी खर्च केली. पुरातन वस्तूंच्या प्रेमाने भारावलेल्या काकासाहेबांनी या वस्तूंचा संग्रह जमविला हा पुराणवस्तुंचा अमोल ठेवा त्यांनी 1962 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व खात्याकडे हे सुपूर्द केला.  हे त्यांचे दातृत्वही अनोखेच म्हणता येईल. इतिहास क्षेत्रतील त्यांच्या या अपूर्व कार्याबद्दल 1978 साली पुणे  विद्यापीठाने त्यांना सन्माननीय डॉक्टरेट पदवी देऊन गौरव केला. हा संग्रह करताना त्यांच्या पत्नी कमलाबाई केळकर यांचीही मोलाची साथ मिळाली. डॉ. दिनकर केळकर यांनी आपल्या दिवंगत मुलाच्या स्मृतिप्रित्यर्थ  संग्रहालयाला ‘राजा’ केळकर असे नाव दिले आहे. संपूर्ण भारतभ्रमण करून जमवलेल्या 21,000 वस्तूंचा संग्रह या ठिकाणी आहे. या वस्तू जमवण्यासाठी किती वणवण केली असेल हे येथील वस्तू पाहून समजते. 1922 साली एका खोलीत सुरू झालेले हे संग्रहालय वाडय़ातील सा:या खोल्यातून पसरले आहे. संग्रह जमा करण्यासाठी प्रसंगी त्यांनी आपल्या पत्नीचे दागिनेही गहाण विकले. एवढेच नव्हे तर पत्नीला वारसाहक्काने मिळालेले करमाळ्याचे घरही विकले. अशा या संग्राहकाचे 1990 साली निधन झाले.

संग्रहालय

             संग्रहालय एकूण 9 दलानामध्ये असून, तीन मजल्यांमधे विभागले आहे. वनिता कक्षामध्ये भारतीय नारीच्या जीवनशैलीवर आधारित आहे. भारतीय नारीच्या दिवसाची सुरूवात कशी होते. याची साधारण कल्पना या दालनात होते. पाय घासण्याचे दगड, केस वाळविण्याच्या व विंचरण्याच्या फण्या, कुंकवाचे करंडे आदी वस्तू येथे आहेत.  भारतीय चित्रकला या विभागात भारतीय चित्रकला मांडण्यात आली आहे. ही चित्रे 17 ते 19 व्या शतकातील असून, त्यात कांचचित्रे, पटचित्रे आणि कागदावरील चित्रे यांचा समावेश आहे. स्वयंपाक घरातील भांडी या पहिल्या मजल्यावरील दालनात ठेवण्यात आली आहे. यात विवाहकार्यामध्ये मोठय़ा प्रमाणात अन्न तयार करण्यासाठी लागणारी भांडी मांडण्यात आली आहे. यात पाणी आणि धान्य साठविण्याची सोय होत असे. विळय़ा, मसाला पाळी, विविध साहित्यातील लाकूड, धातू, पाषाण, भाजकी मातीपासून तयार केलेल्या वस्तूंचा समावेश आहे.

















संगीत वाद्ये पहिल्या मजल्यावर आहेत. यात तबला, बासरी, सनई, सितार, तानपुरा, टाळ, झांज, चिपळय़ा यांचा समावेश आहे.  दुस:या मजल्यावरील मूर्तीकला आणि विवि प्रकारचे दिवे, समया, नेपाळ येथील सूर्यदिवा, कदंबवृक्ष दीप आपले लक्ष वेधून घेतात. याच बरोबर अडकित्ते ,दौती, हस्तिदंत, खेळणी, तसेच बाहेर जाण्याच्या मार्गावर मंदिरे आणि प्राचीन वाडे यांचे रेखीव, नक्षीदार दरवाजे व खिडक्या मांडण्यात आल्या आहेत. यात राजस्थानी शैलीतील दरवाजे आहेत. 13 व्या शतकातील श्री विष्णूची दगडातील कोरीव मूर्ती आपले लक्ष वेधून घेते. तळमजल्यावरील ‘एल पॅसेजच्या प्रवेशद्वारपासून सुरेख कोरीव दरवाजे आणि खिडक्या आकर्षक आहेत. 1857 मधील स्वातंत्र्यसेनानी रंगो गुप्ते यांना इंग्लंडला मिळालेले चांदीचे तबक, 150 वर्षांपूर्वीचा नक्षीदार देव्हारा, 1782 मधील भक्तीविजय ग्रंथाच्या हस्तलिखिताची प्रत,  पानिपत युद्धातील पेशवेकालीन पेटारा, पेशव्यांचे सरदार ओंकार यांचा लाकडी देव्हारा, 125 वर्षे जुना असलेला लाकडी पाळणा. चूल फुंकणीपासून ते उंटाच्या कातडीपासून तयार केलेल्या तेल्याच्या मोठय़ा रांजणार्पयत तसेच दैनंदिन वापरातील अनेक छोटय़ा मोठय़ा गोष्टी त्यांनी जमा केल्या आहेत. गुजराथ, राजस्थान, कर्नाटक, केरळ अशा ठिकठिकाणच्या लाकडी, दगडी कोरीव कामाचे नमुने, घरगुती वस्तू, दिवे, कुलपे, अडकित्ते, दौत, लेखणी संग्रह येथे पाहण्यास मिळतो. दिवे,  जहाजावरील दिवे, गंजीफा , सोंगट्या,  पानदाने, पेटारे, दरवाजे, विविध आकार व रुपातील गणोश मूर्ती, कात्र्या, कळसूत्री बाहुल्या, लहान मुलांचे कपडे, धान्य साठवण्याचे कोठार, जुन्या काळातील टांगा पाहताना आपण ऐतिहासिक काळात जातो. याचबरोबर शस्त्रत्रे दालनात 18 व्या शतकातील तलवारी, मूठ, म्यान, खंजीर,कटय़ार, चिलखत, ढाल, ठासणीची बंदूक, बंदुकीची दारू ठेवण्याची कुपी, भाले आदी शस्त्रत्रे येथे आहेत.

मस्तानी महाल :
             मस्तानी ही शूर सेनानी थोरले बाजीराव पेशवे यांची पत्नी. थोरले बाजीराव पेशव्यांनी मस्तानीसाठी पुण्याजवळ असलेल्या कोथरूड येथे 1734 मध्ये महाल बांधला. कालांतराने तो नामशेष झाला. पडझड झालेला मस्तानीचा महाल केळकरांनी आणून त्यातील काही भाग कुशल कारागीरांच्या मदतीने काढून आणून त्याची पुर्नरचना केली आहे. मोठ मोठे झुंबर, दिवे लावण्याचे झुंबर, कोरीव नक्षीकाम पाहताना त्यावेळचा पेशवाई थाट लक्षात येतो.

              महाराष्ट्राचा व एकूणच संपूर्ण भारताचा गेल्या कित्येक वर्षांचा इतिहास या माध्यमातून आणण्याचे महत्वाचे कार्य हे संग्रहालय करीत आहे. डॉ. केळकरांनी  भारतीय संस्कृतीचा हा अमूल्य ठेवा वर्तमानकाळातही आपल्या पुढील पिढीच्या भविष्याकालासाठी उपलब्ध केला आहे. काळाच्या ओघात चौसोपी वाडे जाऊन घरे झाली, घरे जाऊन आज इमारती उभ्या राहिल्या. त्यामुळे वन बीएचके, टू बीएचके मध्ये जागाही कमी झाली. प्लास्टिकचे युग सुरू झाले. वस्तू वापरा व फेकून द्या ‘युज अॅंड थ्रो’ पद्धतीमुळे जुने ते सोने ही संकल्पना पडद्याआड जाऊ लागली आहे. पण आपल्या आजच्या पिढीला, पुढच्या पिढीला ही संस्कृती, हा वारसा, परंपरा, इतिहास समजावा म्हणून काही छंद जोपासणारे संग्राहक अशा वस्तूंचा संग्रह करतात.
पुण्याची शान असलेल्या राजा दिनकर केळकर संग्रहालयातील दुर्मिळ वस्तूंचा ठेवा आता अधिक समृद्ध होऊ लागला आहे. गेल्या पाच वर्षांत पाचशेपेक्षा अधिक वस्तू संग्रहालयाला भेट मिळाल्या आहेत. शिवकालीन तसेच पेशवेकालीन घराण्यांमध्ये तसेच त्यांच्याकडे असणा:या सरदार घराण्यांमध्ये अनेक दुर्मिळ व ऐतिहासिक पुरातन वस्तू असतात. मात्र, सर्वांनाच त्या वस्तूंचे मूल्य (पैशाचे नव्हे)  कळतेच असे नाही. ज्यांना त्या वस्तूंचे महत्त्व कळते त्यांना त्या वस्तू भविष्यातही टिकाव्यात असे वाटते. हीच भावना मनात असलेल्या ब:याच जणांनी त्यांच्या घरातील दुर्मिळ आणि पुरातन वस्तू संग्रहालयाला भेट दिल्या आहेत. सध्या असलेल्या संग्राहलयाच्या जागेअभावी सर्वच वस्तू प्रदर्शनात मांडलेल्या नाहीत. पुण्यातील बावधनजवळ  सुमारे सहा एकर जागेत राजा दिनकर केळकर संग्रहालयाचे स्थलांतर करण्यात येणार असल्याच्या बातम्या मध्यंतरी वर्तमानपत्रत आल्या होत्या. 
              संग्रहालयातर्फे माहितीपुस्तिका व पोस्टकार्डही विक्रीस उपलब्ध आहेत. तेव्हा जमेल तेंव्हा हा वारसा आपल्या पुढील पिढीला अवश्य दाखवा. पर्यटन किंवा सहलीला म्हणून पुण्यात आलात किंवा खुद्द पुण्यातील असूनही देखील कधी हे संग्रहालय पाहिले नसेल तर आवजरुन पहावे. जेणोकरून भारतीय  संस्कृती व त्यातून दिले जाणारे संस्कार जपले जातील. पुरातन वस्तू आपल्या संस्कृतीच्या पाऊलणखुणाच आहे. तुमच्या आमच्या घरातल्या काळाच्या पडद्याआड गेलेल्या वस्तूंची माहिती व्हावी, परंपरेची ओळख व्हावी या उद्देशाने केळकरांनी हा ठेवा पुढील पिढीसाठी राखून ठेवला आहे.

  • कसे जावे : पुण्यातील प्रसिद्ध असा लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, कु मठेकर रस्ता, मंडईपासून या ठिकाणाहून कोणाला विचारले असता सहज जाता येईल.

  • प्रवेश फी : लहान मुले (3 ते 12 वर्षे) : 10 रुपये, प्रौढ : 50 रुपयेसंग्रहालयाची वेळ : सकाळी 9.30 ते सायंकाळी 6 र्पयत (सायं. 5.30 नंतर तिकीट विक्री बंद)

  • सुटीचे दिवस : 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, अनंत चतुर्दशीपत्ता : 1377/78 शुक्रवार पेठ, राजा केळकर संग्रहालय, नातूबाग, 

  • दूरध्वनी : 24482101 / 24461556

    बघण्यासाठी लागणारा वेळ : सुमारे 1  तास (थोडी घाई), निवांत पाहण्यासाठी किती वेळा ही.


वरील लेख आपल्याला कसा वाटला, काही चुका असल्यास त्या जरूर येथे कॉमेंटसमध्ये लिहून कळवा.

कॉपी करू नका