Wednesday, November 28, 2012

लवासा

‘लवासा’ची गरज? मौजमजेसाठी



          सध्या विकएंड साजरा करण्याचा प्रघात आपल्याकडेही सुरू झाला आहे. त्यातच पुण्याला पर्यटननगरीचा दर्जा मिळाल्यानंतर तर येथे देशी - विदेशी पर्यटकांची पावले आपोआप वळू लागली. या पर्यटनगरीला अजून आकर्षण निर्माण करण्याचे काम सध्या सुरू आहे. पर्यटकांसाठी लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वर या ठिकाणांना आणखीन एक नवा पर्याय म्हणून ‘लवासा’, सहारा सिटीसारखे मानवनिर्मित शहरे पर्यटनासाठी खुली करून देण्याचा  जोरदार प्रयत्न सुरू आहे. पूर्वी खडकवासल्याच्या व मुंबईच्या चौपाटीवर जाऊन भेळ खाल्याची चैन आठवते. आता ही चैन आधुनिक जगात अजून वाढली आहे. श्रीमंतांसाठी या गावातल्या दरीत ‘स्कूबा डायव्हिंग’ ‘रिव्हर राफ्टिंग’ करणं आदी गोष्टी म्हणजे चैन मानलं जावू लागले आहे.
          ‘लवासा’ हे प्रकरण रोजच प्रसारमाध्यमांतून गाजतयं. रोज त्यावर उलटसुलट बातम्या प्रसिद्ध होत आहेत. लवासा प्रकल्पाला सुरूवात झाल्यापासून त्याची प्रसिद्धी केली जात आहे.  पुण्याजवळच्या मुळशी तालुक्यात मुळा-मुठा नदीच्या क्षेत्रात हा प्रकल्प उभा रहात आहे. वरसगावच्या धरणाच्या बाजूची १८ गावे  वेल्हा, मावळ,  मुळशी या तीन तालुक्यांतर्गत येतात. त्यांचा पर्यटनासाठी विकास सध्या सुरू आहे. पुण्यातून चांदणी चौकातून पिरंगुटच्या पुढे गेले की लवासाकडे जाण्यारे मोठे फलक आपले लक्ष वेधून घेतात.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा अवाढव्य प्रकल्प उभारत असताना स्थानिक रहिवाशांना कितपत विश्वासात घेतले आहे. हा प्रश्न  पडतो. येथील वातावरण पर्यटन स्थळाला पोषक आहे. पर्यटन स्थळाच्या नावाखाली निसर्गाला धक्का लावून, कायद्याला धाब्यावर बसवून हा प्रकल्प सुरू असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यांतून येऊ लागल्या आहेत.
          लवासा हे शहर सरकारच्या विशेष निर्माण अधिकार वापरून म्हणजेच ‘स्पेशल प्लानिंग आॅथॉरीटी’ अतंर्गत तयार होत आहे.  जागतिक ख्यातीची डिझाइनिंग कन्सल्टंट असलेल्या ‘हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनी’ या कंपनीने या संपूर्ण प्रकल्पाची आखणी केली आहे. यात लवासामध्ये तीन मोठी महानगरेच वसवण्यात येत आहेत. यातल्या पहिल्या नगराचं नाव आहे दासवे. भोईनी, मुगाव,  कोळोशी, उगावली, धामण ओहोळ, गडले, साखरी, पडलघर, वदवली, आळमळ, पाथरशेत, बेंबटमाळ, मोसे ब्रदुक, साईव, भोडे, वरसगाव या गावांमध्ये संपूर्ण लवासा सिटी २०२१ पर्यंत उभी राहील, अशी अपेक्षा आहे. नावातच लवासा ‘सिटी’ आल्यामुळे पर्यटनाबरोबरच येथे अत्याधुनिक शहर उभे राहणार हे निश्चित आहे. अनेक आयटी कंपन्या इथे कार्यालये थाटणार असून त्यातील आयटी प्रोफेशनल्स याच भागात राहावेत, अशी ही कल्पना आहे. अर्थातच अनिवासी भारतीयांची मोठी गुंतवणूक येथे आहे. आज  राज्यात कुठे नसेल असा सुमारे ४० किमीचा रस्ता पुण्यातून थेट लवासाला तयार करण्यात आलेला आहे. याच रस्त्यावर टोल नाका झाला आहे.


भौगोलिक दृष्ट्या परिसर :
          या १८ गावांत शेती जमिनीबरोबर वन जमिनीचे क्षेत्रही मोठ्याप्रमाणावर आहे.  हा सगळा भाग दाट झाडाझुडुपांनी, डोंगराळ भागांनी वढलेला आहे. शतकानुशतके वाढलेले मोठे वृक्षसंपादा या ठिकाणी आहे. गावांमध्ये जुने रस्ते आहेत काही ठिकाणी पायवाटा आहेत. लवासा प्रकल्प ज्या ठिकाणी पूर्ण होतोय त्या ठिकाणी डोंगर उतारावर शेकडो वर्षांपासून ठाकर, कातकरी व धनगर, कुणबी शेतकरी कुटुंब करून राहतात.
दासवे, मुगाव आणि नासा, लवार्डे  या ठिकाणी अनेक ठिकाणी डोंगरावरील झाडे बांधकामासाठी तोडण्यात आली. काही ठिकाणी झाडे लावण्यातही आली आहेत.  पण ती किती प्रमाणात याचा प्रश्न पडतो आहे.
          पुणे जिल्ह्यातल्या मोसे खोºयात खडकवासला धरणाच्या मागे वरसगाव नावाचं एक धरण आहे. वरसगाव धरणाचं २५ किलोमीटर लांबीचं पाणलोट क्षेत्र  आहे. मुळातच दुर्गम असलेला हा भाग पूर्वी सहजरित्या पोहचण्यास अवघड होता. हे संपूर्ण पाणलोट क्षेत्र पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचं ठरवल्यानंतर हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीने ही संपूर्ण जमीन विकत? घ्यायला सुरूवात केली. यातील १२५०० एकर विकसित करण्याची ही योजना आहे.
          कोणत्याही राज्यात धरणे बांधण्यासाठी प्रथम केंद्रशासन व पर्यावरण मंत्रालयाची परवानगी लागते. या परवानगीनंतरच देशाच्या मालकीचे होते. या धरणामध्ये काही सुधारणा करायची असेल तर पुन्हा केंद्र शासनाची परवानगी लागते. वरसगाव धरणामध्ये मागील बाजूस आणखीन एक धरण बांधण्याचे अधिकार लवासाला देण्यात आले आहेत. अशा प्रकारचे नवीन नियम कायद्यात करून धनाढ्य लोक कायद्यात तुरतुद असल्याचे सांगत आहे.   या धरणामुळे वरसगाव धरणातील ५ टीएमसी पाणी अडविले जाणार आहे. या पाण्याची मालकी लवासाकडेच आहे. धामणओहोळ आणि दासवे या खेडय़ांजवळ प्रत्येकी पाच बंधारे बांधून सुमारे २ अब्ज घनफूट पाणीसाठा व्यापारी वापराकरता करण्याची परवानगी लवासाने मिळवली आहे.  हे वाढीव धरण बांधण्यापूर्वी वरसगाव धरणातल्या पाण्यावरचा अधिकार जिल्ह्यातील शेतकरी आणि उद्योगक्षेत्र यांचा होता. तो आता नष्ट होणार असल्याच्या बातम्याही वाचण्यास मिळू लागल्या आहेत. लेकसिटीमधील हॉटेल्स, बंगले, बागा, उद्याने, क्रीडा अशासाठी हे पाणी वापरले जाणार आहे.

धरणे :
          पुणे  जिल्ह्य़ाच्या पश्चिम हद्दीच्या सीमेवर सह्याद्रीच्या प्रचंड पर्वतरांगा आहे.  या डोंगर फाटय़ांच्या बेचक्यामध्ये डोंगरात उगम पावलेले नदीनाले यांची खोरी आहेत. घाटमाथ्यावर वारेमाप पाऊस पडतो नव्हे कोसळतो. येथे नसिर्गाची मुक्त उधळण आपल्याला पाहायला दिसते. हे पाणी साठवण्याच्या दृष्टीने या खोºयात अनेक धरणे बांधलेली आहेत. या डोंगरातून अनेक झरे मिळून टेकपोळे व धामण ओहोळ नजीक अंबी नदी व मोशी नदी उगम पावते.
          ब्रिटिशकालात पुणे शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी खडकवासला धरण पुणे शहराच्या पश्चिमेला १६ किमी अंतरावर मुठा नदीवर धरण बांधण्यात आले.  मुठा उजव्या कालव्याने पुणे शहर व शेतीसाठी पाणी पोचवले जाई. शहराची व शेतीसाठी वाढणारी गरज लक्षात घेऊन १९५७  साली मुठा खोºयात म्हणजेच खडकवासल्याच्या वरील क्षेत्रात पानशेत  या ठिकाणी धरणाचे बांधकाम सुरू झाले. काम अर्धेकच्चे असतानाच १२ जुलै १९६१ रोजी धरण फुटले याच्या तडाख्याने खडकवासला धरणही फुटले. अर्थातच याचा फटका जनसामान्यांना बसलाच. १९७५ साली पानशेत धरण पुन्हा बांधण्यात आले.
          मुठेच्या दोन उपनद्या आहेत एक अंबी व दुसरी मोशी या अंबी नदीवर पुण्याच्या पश्चिमेस अंदाजे ४० कि. मी. वर पानशेतजवळ तानाजी सागर तर मोशी नदीवर वरसगावजवळ वीर बाजी पासलकर सागर आणि मुठा नदीवर टेमघर अशी धरणे बांधण्यात आली.  टेमघरच्या उत्तरेस मुळा नदीवर टाटांचे मुळशी धरण आहे.  वरसगाव, पानशेत व टेमघर धरणांमधील पाणी मुठा नदीच्या पात्रातून खडकवासला धरणात व तेथून कालव्याने व पाइपने पुण्यास आणले जाते.
          पुणे शहराला पानशेत, खडकवासला आणि वरसगाव धरणातून पाणी पिण्यासाठी मिळते. या तीनही धरणांची पाण्याची साठवण क्षमता ३१ टीएमसी आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे पुणे शहराला अंदाजे १४ टीएमसी पाण्याची गरज भासते. जिल्ह्यातील शेतीसाठी १८ टीएमसी पाणी वापरले जाते. औद्योगिक क्षेत्रासाठी ०.४० टीएमसी पाणी राखीव ठेवले जाते. अशा परिस्थितीत लवासाच्या बांधकामासाठी ३ टीएमसी पाणी राखून ठेवण्यात आले आहे.


निसर्गाची हानी :
          येथील सगळाच भाग निसर्गत:च सुंदर आहे. येथे पोहचण्यासाठी घाटरस्ते मोठे टुमदार बंगले, भव्य हॉटेल्स, हेलीपॅड, उद्याने, तलाव, क्रीडांगणे आादी बांधण्यासाठी डोंगरमाथ्यावर व डोंगर उतारावर मोठय़ा प्रमाणात डोंगर खोदाई सुरू आहे.  हा सारा परिसर अमूल्य अशा झाडा-झुडुपांचा आहे. जांभूळ, आंबा, फणस, हिरडा, शिकेकाई, बेहडा, खैर, ऐन, कडुलिंब, करंज, पळस, शिसम, आवळा, कोकम, बांबू, तसेच अनेक औषधी वनस्पतींचे इथे नैसर्गिक भांडार आहे.  तसेच विविध प्रकारचे प्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वास्तव्य करून आहेत. या समृद्ध निसर्गाचे या ‘पर्यटन’ स्थळामुळे काय हानी होईल ते काळाच ठरवेल.


नैसर्गिक संपत्तीची हानी
          या धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील नैसर्गिक संपत्तीची हानी तर होत नाही ना असा प्रश्न उभा राहातो. आणि ही हानी तरी कशासाठी पर्यटनासाठी. हे कुठेतरी थांबणे गरजेचे आहे. नाहीतर नैसर्गिक अन्नसाखळी तुटण्याची शक्यता आहे.  ही सारी मानवनिर्मित शहरे आज मुळशी, भाटगर, पानशेत, टेमघर, वरसगाव, पवना या धरणाच्या पाण्याची वाट लावणार आहेत. याचा थेट परिणाम पुणे व आजुबाजूच्या लोकवस्तीवर झाल्यावाचून राहणार नाही.
          लवासाचे हे मानवनिर्मित ‘हिल’ स्टेशन उभारताना अनेक ठिकाणी डोंगर ‘किल’ केलेले दिसतात. त्याशिवाय एवढा मोठा रस्ता, खिशाला न परवडणारे येथील अवाढव्य गृहप्रकल्प हे झालेच नसते. डोंगरांचे सपाटीकरण करून उभे केलेले हे हिल स्टेशन म्हणले तर वावगे ठरणार आहे. महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे भरपूर आहेत महाबळेश्वर, माथेरान, आंबोली येथे  हिल स्टेशन बांधली जातात. परंतु तेथील पर्यावरणाला धक्का न लावता? लवासातील डोंगर तीव्र उताराचे आहेत आणि त्यावर माथे विस्तीर्ण नाहीत अर्थातच हा प्रकल्प डोंगर सपाट करून काही ठिकाणी झाडांची कत्तल करून पूर्ण करावा लागणार आहे.
          सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरचे असलेले हे आधुनिक शहर राहणार आहे. सध्या वीज, पाणी, वाहतूक, शिक्षण या मूलभूत सुविधांपासून अनेक खेडोपाडी वंचित आहे. सध्या पडलेला २०१३ सालचा कोरडा भीषण दुष्काळ पाहता अशा प्रकल्पांना राज्य सरकार परवानगी तरी कशी देते याचे गौडबंगाल काय आहे हे तपासणे गरजेचे आहे. हिलस्टेशनची महागडी घरे, तेथील उच्चभ्रू स्कूल, वाहतुकीसाठी एअर कंडिशन बस या सेवा नाहीतर काय कामाच्या.  पर्यावरणाची मानवनिर्मित हानी पाहून मन खिन्न होते. आपण एक दिवसाची पिकनिक म्हणून या क्षेत्राकडे न पाहता येणाºया पिढीसाठी निसर्ग ठेवणार आहोत का नाही याचा विचार करायला हवा. ‘मला काय त्याचे’ हे धोरण आता थांबविले पाहिजे.
          पर्यावरणाच्या प्रश्नावरून लवासा वादात असतानाच आणखीन एका खासगी हिल स्टेशन उभे राहू लागले आहे. तेही मुळशी तालुक्यातच. मुळशी तालुक्यातल्या मौजे सालतर, माजगाव बार्फे, भांबुर्डे, एकोले, घुटके, आडगाव येथे हा प्रकल्प उभा राहणार आहे. या प्रकल्पाला लागणारं पाणी मुळशी धरणातून मिळणार आहे.  जमीन खरेदी करण्याचा काम सध्या जोरात सुरू आहे.
          वरील लेख लिहण्यासाठी पुन्हा एकदा मी व मित्र लवासाला गेलो तेथील एकूण भौगोलिक परिस्थिती सध्या तेथील लोकवस्ती यांचा अभ्यास करून व काही वर्तमानपत्रात आलेल्या लेखाच्या आधारे हा लेख लिहीला आहे. चूका आढळल्यास जरूर कळवा. धन्यवाद
          
          आज रविवार होता. बरेच दिवस लवासाबद्दल ऐकत होतो. त्याबद्दल वर्तमानपत्रातून लेखही वाचले होते. येथे जाण्याचा मोह अवरेना  दुपारी 2 ला घर सोडले. हिंजवडी, माण, घोटावडे मार्गे पिरंगुट चौकातून रस्ता आहे.  काही किलोमीटर रस्ता खराब आहे. मात्र, 10 किमीअंतर पुण्यातून चांदणी चौकातून जाण्याचे वाचते. पिरंगुट सोडल्यानंतर लवासा सिटीचा सरळ रस्ता आहे. वाटेत वरसगावचे धरण दिसते.
          मुळशी तालुक्यातल्या मौजे सालतर,  भांबर्डे, एकोले, घुटके, आडगाव गावाच्या परिसरात हा प्रकल्प उभा आहे. लवासा सिटीकडे जाणारा रस्ता छानच आहे. येथील डोंगर तीव्र उताराचे आहेत. रस्ता नागमोडी व घाटाचा आहे. काही टर्न खूपच मास्त आहे. वाटेत लवासातर्फे दिवे लावले आहेत. रस्त्याच्या आजुबाजूला जास्त लोकवस्ती नाही. पुण्यातून चांदणी चौक ओलांडून पिरंगुटच्या पुढे गेले की डाव्या हाताला लवासाकडे जाता येते. वाटेत भुगाव, लवार्डे,  दासवे  अशी गावे आहेत. याच रस्त्याने पुढे ताम्हीणी घाटात जाता येते.  दुपारी 4 ला लवासा सिटीत पोहचलो.
          येथील निसर्गदृश्य बघण्यासाठी पर्यटकांसाठी पर्वणीच ठरणारं आहे. वरून लवासा सिटीचा परिसर, पूल, आजुबाजूच्या इमारती, दिवाळीतल्या किल्लांवरील चित्रंसारख्याच दिसतात. लवासा सिटीत एक गार्डन असून, त्यात लहान मुलांसाठी खेळणी बसविलेली आहेत. गार्डन छान आहे. सायंकाळी 5.30 ला लवासा सिटीतून निघालो. चांदणी चौकात एक टोल आहे. 30 रुपयांचा. जाताना पिरंगुट मार्गे चांदणी चौकातून बाणेर मार्गे घरी पोहचलो.









Sunday, November 11, 2012

महाबळेश्वर-पाचगणी-वाई-मेणवली

रविवार 11/11/2012 





अनेक छोटी मंदिर व नदीवरील मोठे घाट, निर्सगरम्य नदी परिसर सोबतीला मेणवलीतील नानांचा प्रशस्त वाडा ही सर्व पाहायचे असेल तर वाईतील मेणवलीला भेट द्यायलाच हवी. त्या सोबत थंड हवेसाठी प्रसिद्ध असलेले महाबळेश्वर त्या विषयी...


          आम्ही सकाळी 7.30 घरातून निघालो. खेड शिवापूरच्या टोल नाक्यावर नेहमी सारखीच गाडय़ांची रांग लागलेली होती.  अर्धा तासानंतर 105 रुपये टोल (जायचा-यायचा) देऊन पुढे निघालो. भोरमार्गे मांढरदेवी व तेथून मेणवली असे जायचे ठरले होते. मात्न, भोर केव्हा निघून गेले ते समजले नाही. त्यामुळे खंडाळामार्गे  खंबाटकी घाटातून महाबळेश्वर जाण्यासाठी निघालो. खंबाटकी घाटात पुन्हा ट्रॅफिक  जाम होती.  कसेबसे 12.30 ला वाईत पोचलो. पेट्रोल भरून वाईचा महागणपती पाहायला गेलो.
         पुणे-बंगलोर रस्त्यावर कात्रज व नंतर खंबाटकी हे घाट पार केल्यावर  सुरुर फाटय़ावरून वाईकडे जाणारा रस्ता आहे. येथे डावीकडून महाबळेश्वरकडे जाणारा फाटा आहे. सातारा-महाबळेश्वर मार्गावर वाई गाव आहे. गावाच्या एकीकडे पसरणीचा घाट तर दुसरीकडे धोम धरण असून कृष्णानदीमुळे गावाच्या परिसराला हिरवेगार रान दिसून येते. अशा गावाला ऐतिहासिक वारसादेखील आहे. सरदार रास्त्यांनी 1762 वाईचा बराचसा भाग बसवला आहे. अनेक मंदिरं व नदीवरील  मोठे घाट त्यांनी बांधले आहेत. वाई मंदिरांचे गाव म्हणुन ओळखले जाते. सातारा जिल्ह्यातील वाई हे गाव 18 व 19 व्या शतकामध्ये महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी होती.

श्री काशी विश्वेश्वराचे शंकराचे मंदिर
नदीकाठी असलेले महागणपतीचे मंदीर व शेजारी घाट अप्रतिम बांधलेला आहे. पण या घाटांचा धोबीघाट झालेला दिसला. तेथे स्त्रीया-पुरुष कपडे धुत बसलेले दिसले.  असो. शेजारीच असलेले श्री काशी विश्वेश्वराचे शंकराचे मंदिर आहे. हेमाडपंती बांधकाम असलेले हे पुरातन मंदीर सुंदर व देखणो आहे. येथील घाट हे पूर्वी धार्मिक कार्यक्रमांसाठी वापरले जायचे. पेशव्यांचा या शहरामध्ये धार्मिक कार्यक्रमासाठी नेहमी वावर होता. पुणो ते वाई हे अंतर कमी असल्याने अर्थातच पेशव्यांनी या शांत व निसर्गरम्य वातावरणात धार्मिक कार्यक्रमांसाठी निवड केली. मंदिराचे महाव्दार पूर्वेस आहे. मंदिरासभोवताली तटबंदीची उंच व रुंद अशी आहे. महाद्वारातून आत गेल्यावर दगडी मंडप, दोन दीपमाळा व नंदी  दिसतो.  काही  अंतरावर  प्रशस्त अशा आयताकार दगडीत मंदिर आहे. मंदिर गणपतराव  भिकाजी  रास्ते यांनी आपला मुलगा काशिनाथ याच्या स्मरणार्थ  इ.स 1757 साली  बांधले. सभागृहाच्या दोन्ही  बाजूंस  उंच  दीपमालास्तंभ आहेत. या  स्तंभावरच्या  बाजूस  कमलाकृती असून  तेथे  कुंभाची  रचना  आहे.   बांधणी  अष्टकोनाकृती  असून त्यांवर दिवे  लावण्यासाठी  जागा आहेत. गाभा:यात पाच पाय:या उतरल्यावर महादेवाची मोठी  पिंड  आहे.  छत्र उघडय़ा छत्रीप्रमाणो घुमटाकृती  आकाराचे  असून  ते  वर निमुळते होत गेलेले आहे. सभागृहासमोरील  मंडपात  एकसंध  काळ्या  दगडात घडविलेली, गुळगुळीत  व चमकदार नंदीची  भव्य  मूर्ती आहे. नंदी देखणा व रुबाबदार  वाटतो.
       सध्या वाईत असलेल्या मंदिरांपैकी सुस्थितीत असलेले हे मंदिर असावे. मंदिराचे दर्शन घेऊन पुढे मेणवलीला जाण्यासाठी निघालो. गावातून जाणारा रस्ता छोटा आहे पण छान आहे. अंदाजे मेणवली वाईतून 4-5 किलोमीटर असेल.

वाई येथील ‘ढोल्या गणपती’चे मंदिर.


वाई येथील मंदिर.



वाईतील शंकराच्या मंदिरासमोरील भव्य नंदी.


 वाईतील गणपती मंदिराशेजारील शंकराच्या मंदिरासमोरील दीपमाळ.


वाईतील गणपती मंदिराशेजारील श्री काशी विश्वेश्वर मंदिर.




मंदिरासमोरील भव्य नंदी.



महागणपती ऊर्फ ढोल्या गणपती :
          वाईकडे जाण्याचा रस्ता थोडा छोटाच आहे. रस्त्यावर लिहिलेल्या पाटय़ांमुळे विचारण्याची गरज लागत नाही. दुपारी 12.30 वाईत पोचलो. गाडी लावून महागणपतीचे दर्शन घेण्यास निघालो. वाईचे मुख्य दैवत म्हणजे इथला महागणपती. गणपतीचं देऊळ नदीवर वसलेलं आहे. त्याला ढोल्या गणपती असंही म्हणतात. गणपतीची मूर्ती नावाप्रमाणोच अवाढव्य आहे. हा गणपती नवासाला पावतो असे म्हणतात. मंदिर 1762 साली पेशव्यांचे सरदार गणपतराव भिकाजी रास्ते यांनी बांधले. गणपतीची मूर्ती 6 फूट व लांबी 7 फूट अशी आहे.

नाना फडणवीसांचे मेणवली :
वाईपासून धोम धरणाकडे जाण्याच्या वाटेवर चार ते पाच किलोमीटरच्या अंतरावर हे मेणवली गाव आहे. संथ वाहणारी कृष्णा नदी, आजूबाजूस असणारी दाट गर्द हिरवीझाडी. निरव शांतता आहे. नाना फडणवीसांचा वाडा आजही चांगल्या स्थितीत आहे. सुबक बांधणीयुक्त व  कृष्णा नदीवरील घाटही पाहून मन प्रसन्न होते. येथील घाट शांत व सुंदर आहे. सहा चौकी असलेला हा वाडा आहे. येथे श्रीमंत चिमाजी अप्पा पेशवे यांनी वसईच्या किल्ला जिंकल्यानंतर विजयाची आठवण राहावी म्हणून तेथील चर्चमधील घंटा येथे आणली आहे. ही घंटा पंचधातूपासून बनवलेली असून, घंटेवर जोरात मारले असता मधुर नाद होतो. यावर 1707 असा उल्लेख आहे. येथेही परिसरातील लोक नदीचा वापर कपडे व जनावरे धुण्यासाठी यथेच्छ करताना दिसले. वाडय़ाच्या दारात दुर्मिळ असलेला गोरख चिंचेचा वृक्ष आहे. वाडय़ात पेशवेकालीन चित्रे, कारंजे आहे.  भुलभुलैय्या असलेला आपणास वाटतो. वाडय़ाची काळजी घेणारे एक गृहस्थ मला या ठिकाणी भेटले. वाडय़ासंबंधी माहिती देऊन संपूर्ण वाडा त्यांनी आम्हाला आतून दाखविला. ज्या काळी हा वाडा राबता असेल त्यावेळी वाडा खरच छान असला पाहिजे. नानांचा शिसमचा मोठा पलंग त्यांनी दाखवला. वाडा बराच पडझड झालेला आहे. परंतु सुधारणा चालू असल्याचे दिसले. साहजिकच आहे एवढा मोठा वाडय़ाची निगा राखणो अवघड आहे.  वाड्याचा बराच भाग बंदिस्त आहे. वाडय़ाशेजारून कृष्णानदी वाहते. येथे बांधण्यात आलेला घाट हा  चंद्रकोराकृती आहे. उन्हाळय़ात छोटय़ाच्या खिडकीतून कृष्णा नदी व परिसर व देऊळ छान दिसते.  या खिडकीतून थंड गार हवा जेव्हा आत येते तेव्हा फारच थंडगार वाटते. नानांच्या वाडय़ात त्यांचा पलंग व घरातील नक्षीकाम सुंदर आहे. वाडय़ात एकूण 4 विहीरी आहेत. 




चिमाजी अप्पांनी वसई येथून आणलेली पंचधातूची घंटा.




मेणवली येथील बांधलेला घाट. शेजारी कृष्णानदी.

मेणवली येथील नाना फडणवीस यांनी बांधलेला घाट. शेजारी कृष्णानदी.



नानांचा वाडा.


वाईच्या ‘ढोल्या गणपती’ची छोटी प्रतिकृती.



 नानांच्या वाडय़ातील आतील नक्षीकाम.



 नानांच्या वाडय़ातील आतील नक्षीकाम.




 नानांच्या वाडय़ातील आतील नक्षीकाम.






चित्रपट व मालिकांमधील वाई परिसर :
अशा या वाई व मेणवली परिसराचे देश व परदेशातील सिनेमांमध्ये समावेश होणो साहजिकच आहे.  शुटिंगसाठी देशा-परदेशातली  मंडळी नवीन जागेचा शोध घेत वाईत पोहचले. अर्थातच येथील निसर्ग, शेजारीच असणारा महाबळेश्वर, स्वस्ताई यामुळे सिनेमा, छोटय़ा पडद्यावरील सीरिअल, जाहिरातदार या वाईकडे आकर्षित झाले. आमीर खानची सॅमसंग मोबाइलची जाहिरात, स्वदेसच्या चित्रपटातील शाहरुख खान ज्या नदीकाठावर बसतो तो मेणवलीचा नदीकाठ, गंगाजलमध्ये अजय देवगण पारावर उभे राहून केलेली डायलॉग बाजी. ही सगळी दृश्य वाई व मेणवली परिसरातील आहेत. या ठिकाणी छोटय़ा पडद्यावर सुरू असलेली काही मालिका ही येथूच शूट झालेल्या आहेत. जसे ‘अगले जनम मोहे बिटिया किजो’, छोटी बहू, भाग्यविधाता, बैरी पिया, गंगा, महाभारत, काशी. तेव्हा जेव्हा कधीही वाई व मेणवलीतील मंदिर पाहल तेव्हा या ठिकाणी पिक्चर शुटिंग केल्याचे नक्की लक्षात ठेवाल.

इथून जवळच  वाळकी व कृष्णा या नद्यांवर बांधलेले धोम धरण आहे.  वाईतून बाहेर पडलं की रस्त्याच्या दोन्ही बाजूंना शाळू , ऊस , हळदीची पिकं दिसतात.  मेणवलीहून जवळ असलेले मांढरदेवीचा डोंगर आहे. या डोंगरावर्पयत गाडी जाऊ शकते. इथून आंबोडे खिंडीतून भोरलाही जाता येतं.  येथून जवळ पांडवगड आहे. परंतु परिवारासह जाण्यास योग्य नाही. भटक्यांसाठी छान जागा आहे. मांढरदेवला जाण्यासाठी गाडी रस्ता आहे.  25 किलोमीटरवर मांढरदेवी आहे. पुणो - भोर मार्गे देखील आपण वाईला येऊ शकतो.
वाईच्या परिसरात गड किल्ले ट्रेकिर्ससाठी मोठी पर्वणीच आहे. पांडवगड, वैराटगड, कमळगड, चंदन-वंदन आदी किल्ले आहेत.

वाईचा महागणपती व मेणवलीचा नानांचा वाडा पाहून महाबळेश्वरकडे जाण्यासाठी निघालो. ऐव्हाना दुपारचे 1.45 वाजले होते.


कसे जाल :
  • पुणे-खेड शिवापूर-शिरवळ-खंबाटकी घाट-सुरुर-वाई.
  • पुणे-खेड शिवापूर-भोर-मांढरदेव घाट-वाई.
  • सातारा-पाचवड-भुईंज-ओझर्डे-वाई.


दुपारी 1.45 ला मेणवलीमधून निघालो. पसरणी घाटमार्गे पाचगणी रस्ता छान आहे. घाट संपताच पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण सुरू होते. पाचगणीमध्ये पाचगणी पालिकेचा 90 रुपयांचा टोल भरून टेबल लॅण्ड पाहण्यास गेलो. तेथे 10 रुपये पार्किग आहे. टेबललॅण्डवर महाराष्ट्रातील मोठे पठार आहे. येथून पाचगणी, महाबळेश्वर व वाईचा परिसर दिसतो. दुपारी 1.25 ला महाबळेश्वरकडे जायला निघालो.  वाटते पारशी पाईंट दिसतो.  तेथेही पार्किग आहे. वेण्णा लेक वाटेत दिसतो. प्रत्येक माणशी 325 /- (1 तासाकरिता) बोटिंग आहे. तेथून पुढे निघालो 1.45 वाजले होते. भूक लागली होती. महाबळेश्वरच्या आधी मस्त अर्धा तास पुन्हा ट्रॅफिक  लागली होती. मग गाडीतच घरून आणलेली पोळी भाजी खाल्ली. जुन्या महाबळेश्वरला जायचे मनात ठरले होते. मात्र, महाबळेश्वरला गेल्यावर नेहमी सारखा रस्ता चुकला व मुंबई-गोवा हायवेकडे जाणा:या रस्त्यावर जायला निघालो. चौकशी करून पुन्हा माघारी फिरलो. 

पाचगणीच्या टेबल लॅण्डवरून दिसणारे दृश्य.


पाचगणीच्या टेबल लॅण्डवरून दिसणारे दृश्य.


वेण्णा तलाव, महाबळेश्वर

  लॉडविक पाईंट व एलिफंट हेड पाईंट : 

 लॉडविक पाईट वरून दिसणारे महाबळेवरचे जंगल.


 लॉडविक पाईट वरून दिसणारे महाबळेवरचे जंगल.

लॉडविक पाईट वरून दिसणारा सावित्री नदीचा धबधबा.


प्रतापगडाकडे जाणारा महामार्ग.


लॉडविक पाईट


लॉडविक पाईट

 एक रस्ता लॉडविक पाईंट व एलिफंट हेड पाईंटकडे जात होता. रस्ता खूपच उतार असलेला होता. गाडीने तब्बल 10 मिनिटे उतरल्यावर गाडी पार्किग केलेल्या दिसल्या. हा रस्ता सायंकाळी 5 नंतर खूपच भीतीदायक असेल कारण वाटेत घनदाट जंगल आहे. तेथे पोचल्यावर समोरील डोंगरातून उगम पावणारी सावित्री नदीचा धबधबा दिसला. या पॉईंटवर जाण्यासाठी तब्बल 15 ते 20 मिनिटे चालत जावे लागते. येथे पोहोचल्यावर समोरील डोंगरात प्रतापगड व कोकणात उतरणा:या वाटा दिसल्या. निसर्ग सौंदर्य पाहून परतीचा मार्ग धरला. ऐव्हाना 4.क्क् वाजले होते. तेथून पुन्हा रस्ता विचारून जुन्या महाबळेश्वरला गाडी वळवली. 

जुने महाबळेश्वर : 

 जुन्या महाबळेश्वरमधील शंकराचे मंदिर.


 जुन्या महाबळेश्वरमधील शंकराचे मंदिर.


मंदिराशेजारील बाजारपेठ.


अतिमहाबळेश्वर मंदिरा बाहेरील नंदी.


श्री पंचगंगेचे मंदिर. येथून पाच नद्यांचा उगम होतो.

  महाबळेश्वराचे देऊळ हे यादव राजाने तेराव्या शतकात बांधले असल्याचे समजले. अफझल खानाच्या तंबूवरचे कापून आणलेले हे सुवर्ण कळस महाबळेश्वर मंदिरास अर्पण केले. येथील शंकराची पिंड स्वयंभू असल्याचे सांगण्यात आले. मंदिर खूपच छान आहे. आतमध्ये कोरीव काम केलेले आहे. मंदिर पुरातन काळचे आहे. याठिकाणी अतिमहाबळेश्वर व महाबळेश्वर ही दोन मोठी शिवमंदिरे बांधलेली  आहेत. यादव राज्यांनी बांधलेल्या या हेमांडपंथी मंदिराजवळ चंद्रराव मोरे यांनी पंचगंगा मंदिर बांधले त्यात कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्नी, गायत्नी या पाच नद्या उगम पावल्या आहेत. मंदिराच्या शेजारी छोटा बाजार आहे. येथे पार्किग 20 रुपये आहे. 

 

ऑर्थर सीट पाईंट

आपले पूर्वज.

ऑर्थर सीट पाईंटच्या अलिकडून घेतलेले छायाचित्र.

ऑर्थर सीट पाईंटच्या अलिकडून घेतलेले छायाचित्र.




ऑर्थर सीट पाईंट.

ऑर्थर सीट पाईंटच्या अलिकडून घेतलेले छायाचित्र. या फोटोत ऑर्थर सीट पाईंट. बारीक दिसत आहे.
L-810 Nikon

 तेथून 4.30 ला  ऑर्थर सीट व विडो पॉईंट पाहण्यास निघालो. पुन्हा उपद्रव शुल्क म्हणून 10 रुपये नगरपालिकेला दिले. ऑर्थर सीट पाईंट अंदाजे 7 ते 8 किलोमीटर आहे. वाटते पूर्ण जंगल आहे. सायंकाळी 5 नंतर जाण्याचे टळलेले बरे. तेथे 5 ला पोचलो. ऑर्थर सीट व विडो पॉईंट  तेथून बरेच लांब चालायचे होते. थोडेच अंतर चालत गेलो. फोटो सेशन केले. 5.30 ला परत त्याच मार्गाने यायला निघालो. महाबळेश्वरमधील बाजारपेठ 6 वाजेर्पयत पाहिली.  6 ला घरचा रस्ता धरला. अंधार पडल्यावर गाडी चालावायला अजूनच मजा येत होती.

Nikon L - 810 कॅमे:यातून घेतलेले फुलाचे चित्र.

Nikon L - 810 कॅमे:यातून घेतलेले फुलाचे चित्र.

Nikon L - 810 कॅमे:यातून

महाबळेश्वर मार्केटमधील लाल दिसणारा पण आतून पांढरा व गोड मुळा.

महाबळेश्वर - वेण्णा तलाव - पारशी पाईंट - पाचगणी - पसरणी घाट - वाई नंतर हायवे व तेथून पुण्याकडे असा मार्ग 2 तासात कापून खेड शिवापूर येथील टोल नाक्यापुढे चहा पिऊन परत घरचा मार्ग धरला. पिंपरी ते महाबळेश्वर अंतर 140 किलोमीटर आहे. एकूण 345 किलोमीटर अंतर झाले.

कॉपी करू नका