Friday, January 16, 2026

यादवांची 'देवगिरी'




         दौलताबाद मूळचा देवगिरी किल्ला. सध्याच्या छत्रपती संभाजीनगरात असणाऱ्या दौलताबादजवळ हा यादवकालीन किल्ला आहे. ही यादवांची राजधानी होती (९ वे शतक - १४ वे शतक). या किल्ल्याने अनेक राज्ये, सत्तांतरे बाघितली. किल्ला एक हातातून दुसऱ्या हातात जात असताना किल्ल्याचा विस्तार होत गेला. ६ व्या शतकाच्या आसपास देवगिरी हे पश्चिम आणि दक्षिण भारताकडे जाणाऱ्या प्राचीन मार्गावर असल्यामुळे व्यापारी मार्गासाठी महत्त्वाचे ठिकाण होते. अजंठा-वेरुळ सारख्या लेणी असल्याने अनेक शतके या ठिकाणी संस्कृती जपली गेली. 
          इतिहासकारांच्या मते, दौलताबादच्या या गिरीदुर्ग व भुईकोट यांचा मिलाप असलेल्या या बुलंद किल्ल्याची निर्मिती राष्ट्रकूट राजा वल्लभ याने इ. स. ८ शतकात केली. यादव कुळातील राजा भिल्लम यादव याने या दुर्गाच्या साहाय्याने आपली स्वतंत्र सत्ता स्थापन केली. यादवांच्या सत्तेचा केंद्रबिंदू हा ‘देवगिरी’ किल्ला होता. 
         कित्येक वर्षे अजिंक्य राहिलेल्या या किल्ल्यावर इ. स. १२९४ मध्ये अल्लाउद्दीन खिलजीने स्वारी केली. त्या वेळी देवगिरीवर राजा रामदेवराव यांची सत्ता होती. अल्लाउद्दीन खिलजीने राजा रामदेवराय यांचा पराभव केला. प्रचंड लूट केली. या लढाईनंतर राजा रामदेवराय  आणि अल्लाउद्दीन खिलजी यांच्यात तह झाला. त्यानंतर कुतुबुद्दीन मुबारक खिलजीने इ. स. १३१८ मध्ये देवगिरीवर पुन्हा हल्ला चढवला. या लढाईत हरपाळदेव याचा पराभव झाला. त्याला अमानुषपणे मारण्यात आले. इ. स. १३१८ मध्ये यादवांची सत्ता संपुष्टात आली आणि सुलतानांचे राज्य सुरू झाले. 
          इ. स. १३२७ मध्ये महंमद बिन तुघलक याने दिल्लीची राजधानी मध्यवर्ती ठिकाणी हलवण्याच्या उद्देशाने ती देवगिरीवर आणली. देवगिरीचे नाव बदलून ‘दौलताबाद’ असे ठेवले. पण ही राजधानी तुघलकाला फार काळ टिकवता आली नाही. तुघलकाने राजधानी पुन्हा दिल्लीला हलवली. या राजाच्या असल्या निर्णयाला 'तुघलकी निर्णय' घेणारा राजा म्हणून संबांधले जाते. म्हणजे त्याच्या मनात आले की तो विचार न करता तुघलकी निर्णय देऊन टाकायचा.  इ. स. १३४७ पासून दिल्लीच्या सुलतानशाहीत सत्ता-संघर्ष सुरू झाला. हसन गंगू बहमनी याने आपले स्वतःचे राज्य स्थापन केले. हेच बहमनी राज्य होय. बहमनी राजांनी सुमारे १५० वर्षे राज्य केल्यानंतर या सत्तेचेही पुढे पाच तुकडे झाले. त्यातीलच एक म्हणजे अहमदनगरची निजामशाही. निजामशहाने आपले राज्य दौलताबाद येथे सुरू केले.














चांदमिनार : 

किल्ल्याचे वैभव म्हणून चांदमिनारकडे पाहिले जाते. दिल्ली येथे असलेल्या कुतुबमिनारप्रमाणेच हा चांदमिनार शोभिवंत आणि आकर्षक आहे. महाकोट ओलांडताच चांदमिनार दृष्टिक्षेपात येतो. ६५ मीटर उंच असलेला हा चांदमिनार किल्ल्याच्या सर्व परिसरातून दिसतो. भारतमाता मंदिराच्या उजवीकडील दरवाजातून बाहेर पडताच चांदमिनार लागतो. मिनारचे नक्षीकाम व कोरीवकाम अप्रतिम आहे. मिनारच्या तिसऱ्या मजल्याच्या गच्चीवर जाण्यासाठी आतून पायऱ्या आहेत. मिनारवर जाण्यास सुरक्षिततेच्या कारणास्तव मनाई केली आहे. हा मिनार सुलतान अहमदशाह बहमनीने बांधला आहे, असे मानले जाते. इ. स. १४४७ मध्ये या मिनारचे बांधकाम पूर्ण झाले.









‘मेंढा तोफ’ 

गडावर अतिशय मजबूत आणि सुस्थितीत असलेली तोफ म्हणजे ‘मेंढा तोफ’ होय. तोफेच्या एका बाजूस मेंढ्याच्या आकाराचे तोंड आहे. म्हणूनच या तोफेला ‘मेंढा तोफ’ असे नाव पडले. चिनी महालाच्या डावीकडे एका बुरुजावर ही तोफ आहे. या तोफेवर ‘तोफ किला शिकन’ असे लिहिलेले आहे. तोफ किला शिकन म्हणजे किल्ला उद्ध्वस्त करणारी तोफ होय.  या तोफेचे वैशिष्ट्य म्हणजे ही तोफ सर्व बाजूंना वळवता येते. तिची लांबी सात मीटर असून ती मिश्रधातूंची बनलेली आहे. तोफेला अद्याप गंज चढलेला नाही हे विशेष. या तोफेवर औरंगजेब बादशहाचे व कारागीर महंमद अरब याचे नाव आहे. त्यामुळे ही तोफ औरंगजेबाच्या काळातील मानली जाते. तोफेवर कुराणातील एक वचनही कोरलेले आहे.





अंधारी व भुलभुलैया मार्ग :

महाराष्ट्रातील कोणत्याही किल्ल्याच्या बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी इतका बिकट आणि भुलभुलैयाचा मार्ग नसेल. देवगिरीवर मात्र असा मार्ग आहे. या मार्गाला ‘अंधारी मार्ग’ असे म्हणतात.  पाण्याच्या खंदकावरील लोखंडी पूल ओलांडताच डोंगर पोखरून केलेला हा अंधारी मार्ग सुरू होतो. हा मार्ग वळणावळणाचा आणि काही ठिकाणी चकवा देणारा असा आहे. मध्येच खाई लागते. शत्रूने प्रवेश केलाच तर तप्त निखारे अंगावर ओतण्याची सोय होती. हा मार्ग ओलांडण्यासाठी पूर्वी मशालीचा वापर केला जात असे. 


किल्यावर बघण्यासारखी ठिकाणे खूप आहेत. ज्यामध्ये भारतमाता मंदिर, चिनी महाल, निजामशाही राजवाडा,  बारादरी, श्री जनार्दन स्वामी यांची ध्यानगुंफा, शाही हमाम मात्र वेळेअभावी बरचशी ठिकाणे बघता आली नाही. देवगिरीचा किल्ला व्यवस्थित पाहायचा झाल्यास किमान तीन ते चार तास लागतात. 





         निजामशाहीचे राज्य सुमारे १३५ वर्षे टिकले.इ. स. १६३३ मध्ये दिल्लीचा मुघल बादशाह शाहजहान याने दौलताबादचा किल्ला आपल्या ताब्यात ठेवला.  शाहजहानला त्याचा मुलगा औरंगजेब याने तुरुंगात ठेवून आपण स्वतः बादशहा बनला. त्यानंतर हा किल्ला औरंगजेबच्या ताब्यात आला. पुढे इ. स. १७२४ मध्ये दौलताबादचे वैभव हैदराबादच्या निजामाच्या ताब्यात गेले. इ. स. १७६० मध्ये सदाशिवराव भाऊ पेशवा आणि निजाम यांच्यात उद्‌गीर येथे लढाई झाली. या लढाईत सदाशिवरावभाऊंनी निजामाचा पराभव केला. निजाम आणि सदाशिवराव भाऊ यांच्या झालेल्या तहात निजामाने दौलताबादचा किल्ला मराठ्यांना दिला. सदाशिवराव भाऊ उत्तरेला निघून गेले. उत्तरेला जाताच निजामाने हा किल्ला पुन्हा १७६२ मध्ये ताब्यात घेतला. केवळ दोन वर्षेच दौलताबादचा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात राहिला. 
           इंग्रजांनी संपूर्ण भारतभर आपली सत्ता निर्माण केली होती. दौलताबादचा किल्लाही इंग्रजांच्या ताब्यात गेला असला तरी तो किल्ला हैदराबादच्या संस्थानाच्या नावावर १९४८ सालापर्यंत राहिला. भारत स्वतंत्र झाल्यावर सरदार वल्लभभाई पटेल यांनी संस्थानांचे भारतात विलिनीकरण केले. त्यात हैदराबादचे संस्थानही होते. ग्रंथकार हेमाद्री, गोपदेव, कवी नरेंद्र यांचे वास्तव्य या किल्ल्यावर होते. त्यातील हेमाद्रीने हेमाडपंथी मंदिरांचा पाया रचला. महाराष्ट्रात आजही कित्येक ठिकाणी हेमाडपंथी मंदिरे पाहायला मिळतात.
         किल्याचा आकार त्रिकोणी आकारातला असून, निम्मा भाग सभोवताली तासला आहे. त्यामुळे किल्ल्यावर आक्रमण करणे खूपच अवघड होते. किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणाजे सभोवताली तीन तटबंदी आहेत. या तटबंदीला कोट असे म्हटले जाते. संपूर्ण गावाभोवती एक तट आहे. त्याला अंबरकोट म्हणतात. अंबरकोटातून आत प्रवेश केल्यावर आणखी दोन तटबंद्या पार कराव्या लागतात. किल्ल्यात प्रवेश करताच महाकोट तटबंदी लागते. या महाकोटात आठ दरवाजे आहेत. त्यातील एकही दरवाजा समोरासमोर नाही. पाण्याने भरलेला खंदकाने वेढलेला असे, प्राचीन काळी मगरींना शत्रूच्या हल्ल्यापासून संरक्षणासाठी खंदकात ठेवले जात असे. किल्ल्यावर जाण्याचे एकमेव साधन म्हणजे एक अरुंद पूल आहे. येथून पुढे अंधार असलेल्या गुहेतून किल्यात प्रवेश होतो. पूर्वी युद्धाच्या वेळी जाळीने झाकलेला असे आणि वरच्या बाजुला जळत ठेवलेल्या आगीची चूल तयार केली असे. शत्रूंना गोंधळात टाकण्यासाठी गुहेचे प्रवेशद्वार आहे. भुईकोट भाग संपल्यानंतर बालेकिल्ल्यास आरंभ होतो.  बालेकिल्ल्यात जाण्यासाठी अंधारी मार्ग लागतो. या अंधारी मार्गातून शत्रूला सहजासहजी बालेकिल्ल्यावर जाणे अशक्य असायचे. अंधारी मार्गात अनेक अडथळे आहेत. अल्लाउद्दीन खिलजीने रामदेवरायचा पराभव केला तो केवळ फितुरीमुळेच! म्हणूनच हा किल्ला अजिंक्य आणि अभेद्य किल्ला असे मानले जाते. किल्ल्याच्या प्रत्येक बुरुजावर तोफा आहेत. इतक्या मोठ्या तोफा गाडावर नेल्या असतील की गडावरच बनवल्या असतील, याचा उलगडा होत नाही. आजही या तोफा मजबूत आणि सुस्थितीत आहेत.  १४९९ मध्ये दौलताबाद अहमदनगर सत्तेचा भाग बनले, ज्यांनी त्यांचा दुय्यम राजधानी म्हणून वापर केला. १६१० मध्ये किल्ल्याजवळ, औरंगाबादचे नवीन शहर, ज्याचे नाव खडकी होते हे वसविण्यात आले. अहमदनगर सल्तनतची राजधानी म्हणून काम करण्यासाठी इथिओपियन लष्करी नेता मलिक अंबरने स्थापन केले होते.  दौलताबाद किल्ल्यावरील सध्याच्या काळातील बहुतेक तटबंदी अहमदनगर सल्तनत अंतर्गत बांधण्यात आली होती.

भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ :

किल्ल्याला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे ऑक्टोबर ते फेब्रुवारी या थंडीच्या काळात. या काळात हवामान आल्हाददायक असते. उन्हाळ्यात येथील तापमान जास्त असते. 

किल्ला पाहण्याची वेळ : सकाळी ६ ते संध्याकाळी ६ 
तिकीटाचे दर : प्रत्येकी २५ रुपये 
कार पार्किंग दर : ५० रुपये 

औरंगाबाद रेल्वे स्थानकापासून १६ किमी अंतरावर आहे.
टीप : तिकीट जूपन ठेवावे लागते. हरविल्यास १०० रुपये दंड भरावा लागतो. 


ब्लॉगवरील ठिकाणे एकाच ठिकाणी

सहज गंमत म्हणून सुरू केलेला फेरफटका या  ब्लॉगवर आतापर्यंत २९५८७१ वाचकांनी भेटी दिल्या.  या पेजवर सर्व मी पाहिलेली ठिकाण्यांच्या लिंक्स दिलेल्या आहेत.
कृपया त्या पहाव्यात. हा ब्लॉग आपणास कसा वाटला या विषयी जरूर येथे लिहा.

महाराष्ट्रात प्रेक्षणीय स्थळे भरपूर. सह्याद्रीच्या पर्वतरांगा, किल्ले, कोकणात उतरणारे घाट, समुद्रकिनारे यामुळे ऐतिहासिक, धार्मिक स्थळे खूपच आहेत.

ब्लॉग्ज सुरू करण्यापूर्वी मी पाहिलेली काही स्थळे आहेत. ही पर्यटन स्थळे इतरांना थोडी मार्गदर्शक व्हावी, हाच उद्देश.  काही चूका झाल्यास ferfatka@gmail.com.
वर जरूर कळवा...  

आपली प्रतिक्रिया हीच माझ्यासाठी पोच पावती. आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला? यातील लेख, सजावट व मांडणी यावर आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.









यादवांची 'देवगिरी'
अजंठा लेणी
महाराष्ट्राचा मुकुटमणी : वेरूळचे कैलास लेणं
नहर-ए-अंबरी अर्थात पाणचक्की
वाह...दख्खनचा ताज!


अष्टविनायक :
मोरगावचा श्री. मोरेश्वर 
सिध्दटेकचा श्री सिध्दीविनायक
पालीचा श्री बल्लाळेश्वर  
महडचा श्री. वरदविनायक 
लेण्याद्रीचा  श्री. गिरीजात्मज  
थेऊरचा श्री चिंतामणी
ओझरचा श्री विघ्नेश्वर 
रांजणगावचा श्री महागणपती   
चिंचवडचे मोरया गोसावी मंदिर
मंगलमूर्तीवाडा


लेणी व मंदिरे :
बेडसे लेणी
भाजे लेणी 
शिल्पकलेचा चमत्कार : अंबरनाथचे शिवमंदिर
भगवान श्री परशुराम मंदिर
संगमेश्वरचे अनोखे - श्री कर्णेश्वर मंदिर
श्री क्षेत्र सत्यसाई पांडुरंग मंदिर, हाडशी
पांडेश्वरचे शिवमंदिर


किल्ले :
दुर्गदुर्गेश्वर रायगड
चौर्यांशी बंदरी एैसी जागा नाही : सिंधुदुर्ग किल्ला
कोरीगड
लोहगड
तिकोना
अजिंक्यतारा किल्ला - साताऱ्याचा मानाचा तुरा


मावळ परिसर
श्री पार्श्‍वप्रज्ञालय तळेगाव
प्रति पंढरपूर
लोणावळा 
कासारसाई धरण
श्री क्षेत्र सत्यसाई पांडुरंग मंदिर, हाडशी

‘मातेचे रान’ अर्थात माथेरान - भाग १
‘मातेचे रान’ अर्थात माथेरान -भाग २

माझी फोटोग्राफी
कोकण परिसर :
किहीम समुद्रकिनारा
हरिहरेश्वर- दिवेआगर
चौर्यांशी बंदरी एैसी जागा नाही : सिंधुदुर्ग किल्ला
भगवान श्री परशुराम मंदिर
संगमेश्वरचे अनोखे - श्री कर्णेश्वर मंदिर



तिरुपती बालाजी 
तिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) - भाग १ 
तिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) - भाग २

तिरुपती सुवर्ण मंदिर - भाग ४

तिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) - भाग 3 - कोल्हापूरची अंबाबाई महालक्ष्मी

पिंपरी-चिंचवड परिसर
बिर्ला गणेश मंदिर
शिरगावचे साईबाबा मंदिर
अयप्पा स्वामी मंदिर 
घोरावडेश्वर 
कुंडमळा 
मुरुगन हिल्स
भंडारा डोंगर  
इंदोरीतील भुईकोट
मोरया गोसावी समाधी मंदिर
अप्पूघर - दुर्गादेवी मंदिर -भक्ती-शक्ती शिल्पसमूह
मंगलमूर्तीवाडा
बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालय
क्रांतिवीर चापेकर  
थेरगाव बोट क्लब
सायन्स पार्क (चिंचवड)  

पुणे परिसर :
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक ट्रस्ट संग्रहालय
पुण्याचे वैभव : शनिवारवाडा (भाग १) 
पुण्याचे वैभव : शनिवारवाडा (भाग २)
पुण्यनगरीचा मानबिंदू - सिंहगड 
मढे घाट - नरवीर तानाजी पराक्रम 
 पर्वती
आगाखान पॅलेस
कात टाकून उभा राहतोय : विश्रामबागवाडा
श्रीमंत बाजीराव पेशवे - एक अजेय योद्धा
त्रिशुंड गणपती 
श्री सद्‌गुरू जंगली महाराज पाताळेश्वर  
भुलेश्वर
लवासा
नागेश्वर मंदिर
रामदरा
वाघोलीचा वाघेश्वर
तुळापुर
लाल महाल

पु. ल. देशपांडे बाग
दुधीवरे खिंड

Friday, September 12, 2025

फुलांची पंढरी कास पठार


महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यात असून पश्चिम घाटातील एक प्रसिद्ध, जैवविविधता असणारे  ठिकाण आहे. जवळच असलेला अजिंक्यतारा, सज्जनगड, कास तलाव, बामणोली येथील कोयना धरण्याचे जलाशयाचा फुगवटा वासोटा किल्ला, ठोसेघर, वजराई धबधब्यामुळे सातारा अनेक पर्यटकांच्या आवडीचा ठरू लागला आहे. येथील कास पठारहे “Kas Pathar Flower Valley”  म्हणून नावारुपाला आले आहे.  हे फुलांचे पठार पाहण्यासाठी नुकताच येथे फेरफटका केला त्या विषयी……

आजूबाजूच्या जंगलात आढळणाऱ्या कास वृक्षावरून कासपठार हे नाव पडले. अशी एक कथा आहे. कासाचा अर्थ प्रादेशिक भाषेत तलाव असाही होतो आणि  पठारावरील प्रमुख कास तलावाच्या उपस्थितीमुळे त्याचे नाव कास पडले आहे.  जागतिक वारसास्थळ असलेल्या कास पठावर विविधरंगी फुलांचा हंगाम सुरू झाल्याचे प्रसिद्धीमाध्यमातून कळाले आणि कासला भेट देण्याची इच्छा जागृत झाली. लगेच वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन बुकिंग केले. ठरल्या दिवशी सकाळी लवकरच निघून सातारा गाठला. वाटेत ढगाळ वातावरण असल्याचे पाहून पठारावर नक्की कसे वातावरण असेल याची शंकाच आली. नागमोडी वळणे घेत साताऱ्यातून कासपठाराकडे जाणाऱ्या रस्त्याने पठारावर पोहचलो. बारीक पाऊस असल्याने वाटेत धुक्याचे साम्राज्य पसरले होते. वनसरंक्षक दलाची चेकपोस्टवर तिकीट चेक करून कास पठारावरील पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाडीतून पाचच मिनिटात गेट क्रमांक वर आम्हाला सोडले. गेटमधून आत गेल्यावर सर्वत्र हिरवीगार झाडे, बाजूला कुंपण त्यामध्ये डोकावत असलेली विविधरंगाची फुले पाहायला मिळाली. मात्र, पाऊस जास्त, धुके सूर्यप्रकाशाचा अभाव असल्याने काही फुले कुजली असल्याचे लक्षात आले. जेवढे शक्य तेवढे येथील परिसर आम्ही हिंडून पाहिला. मात्र, जोराचे वारे, पाऊस यामुळे फुले पाहण्यात अडचण येत होती. गेट क्र. मधून तिकीट दाखवून आपण प्रवेश करतो. येथे फुललेल्या फुलांभोवती कुंपण टाकून मधोमध चालण्यासाठी चांगला रस्ता केला आहे. जंगली आल यांची मोठी मोठी फुलं दूरवर नजर जाईल इथवर पसरली आहेत. टोपली कारवी, आभाळी यांची निळसर फुलं दिसतात. गेट क्रमांक पाहून थोड्या विश्रांतीनंतर आम्ही कास तलाव पाहण्यास निघालोपठारावर येथील स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून दिला असल्याचे दिसून आले. महिलावर्गाला तसेच पुरुषवर्गाला कासपठारावर तयार केलेल्या संरक्षक जाळीच्या देखरेखीसाठी तैनात केले आहे. त्यामुळे अतिउत्साही पर्यटक या नैसर्गिक संपत्तीला बाधा पोहचविणार नसल्याची खबरदारी हे कर्मचारीघेत आहेत. तसेच येथील पर्यटकांना मार्गदर्शन करण्याचे काम ही हे करतात.



दाट धुकेगार वारे आणि सततच्या पावसामुळे यंदा कास पठारावर ही फुले उमलण्यास काहीशी उशीरा सुरूवात झाली आहे.  सध्या पठारावर दीपकांडीचवरअभाळीभुईकारवीसोनकी या फुलांचा तुरळक स्वरुपात बहर आला आहेपठारावर निवरा शेड एकाच ठिकाणी असल्याने आणि तेही अपुरी जागा असल्याने अनेक पर्यटक पावसातच भिजत असल्याचे दिसलेपावसाने उघडीप दिली आणि उन पावसाचा खेळ सुरू झाला तरच पठारावर यंदा मोठ्याप्रमाणात फुलांचा बहर पाहता येणार आहे.

कासपठारला भेट देण्याचे नियोजन करताना वेळ महत्त्वाची आहेफुले बहरण्याचा मुख्य हंगाम ऑगस्टमध्ये सुरू होतो आणि ऑक्टोबर मध्यापर्यंत चालू राहतो. या कालावधीत फुले हळूहळू त्यांचे रंग बदलत असतातपिवळ्या आणि जांभळ्यापासून गुलाबी आणि पांढऱ्या रंगात बदलणारे ही फुले आहेतफुलांच्या विविध प्रजाती त्यांच्या सौंदर्याचे प्रदर्शन करत असतातफुलांचे वेळापत्रक पाऊस आणि सूर्यप्रकाशासारख्या हवामानाच्या परिस्थितीवर अवलंबून असतेसहलीचे नियोजन करण्यापूर्वी स्थानिक हवामान अंदाज आणि फुले बहरण्याचा मुख्य हंगाम लक्षात घेणे गरजेचे आहेबऱ्याच दुर्मिळ फुलांच्या प्रजाती या कालावधीत बघण्यास मिळतातकास पठार प्रसिद्धीस आल्यापासून वर्षानुवर्षे पर्यटकांचे लोंढे कासपठारा कडे वाढत आहेतपण हा हंगाम २० ते २५ दिवसासाठीच असतोपूर्वी प्रति महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पठारावर अनेक मनमोहक दृशे आपल्याला बघायला मिळतात.



कास पठाराला भेट वेळ

साधारण ऑगस्टपासूनच इथे फुलं फुलायला सुरुवात होत असली तरी सप्टेंबर ते ऑक्टोबर हा कालावधी कास पठाराला भेट देण्याचा चांगला कालावधी आहेसप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासुन फुलांचा चांगला बहर बघायला मिळतोतरीसुद्धा कासपठाराच्या वेबसाईटवर फुलांचा हंगाम सुरू झाल्याचे पाहूनच या ठिकाणी जावेwww.kas.ind.in या कास पठाराच्या अधिकृत वेबसाईटवरून आपण ऑनलाईन बुकिंग करू शकता.

कसे पोहोचाल? 

कास पठार हे पुण्याहून १३५ तर मुंबईहून २५५ किमी अंतरावर आहे.  मुंबईपुणेपासून येत असाल तर सातारा इथे पोहोचावेयेथून कास पठार हे २५ किमी अंतरावर आहेएका छोट्याश्या घाटाने येथे पोहचता येते.  आपल्या खासगी वाहनाने येत असाल तर साताऱ्याहून थेट कासकडे जाऊ शकता.

साताऱ्याहून भाड्याने गाडी करूनही आपण कासला जाऊ शकता.ST बसने जाणार असाल तर सातारा बस स्थानकातून बामणोली एसटी बस आपल्याला कास पठारावर घेऊन जातेबामणोलीची बस साताऱ्याहून अंदाजे दीड दोन तासांनी असते.









ऑनलाईन तिकीट :

www.kas.ind.in या कास पठाराच्या अधिकृत वेबसाईटवरून आपण ऑनलाईन बुकिंग करू शकताकास पठाराला भेट देण्यासाठी प्रतिव्यक्ती १५० इतके शुल्क आकारले जातेऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने इथे बुकिंग स्वीकारले जातेपण फुलांच्या बहराच्या कालावधीत इथे होत असलेल्या गर्दीमुळे आपण ऑनलाईन बुकिंग करूनच जावं तसेच ऑनलाईन बुकिंग केल्यावर त्यांची प्रिंट देखील सोबत बाळगावी.  मोबाईलमधील स्क्रीनशॉट ग्राह्य धरला जात नाही१२ वर्षांखालील मुलांना तिकीटाची गरज नसते१०० प्रति तास याप्रमाणे गाईडची सेवा देखील मिळू शकतेशनिवार रविवारी आपल्याला इथे गाईडची सुविधा मिळत नाही.

कास पठारावरील फुले

सुमारे ६५० जातींची फुलं आपल्याला कास पठारावर बघायला मिळतातत्यापैकी ३० प्रजातींची फुलं अशी आहेत जी आपल्याला फक्त आणि फक्त कास पठारावरच बघायला मिळू शकताततसेच फुलं आणि वनस्पती मिळून सुमारे ८५० प्रजाती इथे बघायला मिळतातसीतेची आसवेसोनकीमंजिरीतेरडासोनकी अशी विविध रंगांची फुले वेगवेगळ्या वेळी बहरतातयेथे तेरड्याच्या कुळातील प्रजाती खूप प्रमाणात आढळतातयाशिवाय जंगली हळदनरक्या इत्यादी वनस्पती देखील इथे आढळून येतातकास पठारावरील अनेक वनस्पती औषधी असल्याचे आढळून येतात.

या शिवाय आपल्याला हवी असल्यास पुस्तके देखील उपलब्ध आहेत५० रुपयांपासून ते ५०० पर्यंत यांच्या किंमती आहेतत्यात प्रत्येक फुलांच्या जाती  त्याचे नाव यांचे उल्लेख केलेले आहे.





कास पठारावर प्रवेश

कास पठाराला भेट देण्यासाठी दिवसभरातून तीन बॅचेसमध्ये प्रत्येकी १००० पर्यटकांना आत सोडण्यात येतेसकाळी  ते ११११ ते  आणि दुपारी  ते  अशा तीन वेळांमध्ये इथे भेट देता येतेएकूण दिवसभरातून ३००० पर्यटकांना आत सोडण्यात येतेसुटीच्या दिवशी  हंगाम ऐन भरात असेल तर ऑनलाईन तिकीट काढून जाणेच सोईचे ठरेलकारण येथे रस्ता छोटा असूनसाताऱ्यातून कासपठावर येण्यास  तास लागतोवाटेत घाट असल्याने वाहतूककोंडी होण्याची दाट शक्यता असते.

कास पठारावर फुले पाहण्यासाठी स्वत:ची गाडी घेऊन थेट जाता येते नाहीत्यासाठी वनसंरक्षक दलाने उभारलेल्या पार्किंगवरून गाडी पार्किंगची चांगली सोय केली आहेयेथून पुढे कास तलाव बामणोलीला तसेच वासोट्यावर जाता येतेपार्किंग विभागात आपण आपल्या गाड्या लावल्यावर तिथून पुढे त्यांची मोफत बससेवा उपलब्ध आहेपाचच मिनिटांत आपण कास पठाराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ येऊन पोहचतोयेथे एकूण  प्रवेशद्वार असून मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला सोडण्यात येतेतेथे तिकीट दाखवून आपला पायी प्रवास सुरू होतोसर्व बाजूला रंगीबेरंगी सुंदर फुलांचे बगीचे तयार झालेले आपल्याला दिसून येतातमुख्य प्रवेशद्वाराजवळून सुमारे  किलोमीटरवर असणाऱ्या कुमुदिनी तलाव पाहता येतो.




कास पठार हे अत्यंत सच्छिद्र लॅटराइट खडक (जांभा) पासून बनलेले  पठार आहे. मातीचा पातळ थर. माती वर्षभर पाणी टिकवून ठेवू शकत नसल्यामुळे केवळ मुसळधार पावसातच वनस्पती  जीवन टिकवून ठेवते. कासची वनस्पती या विशिष्ट ठिकाणी मर्यादित आहे. कारण पठार हे बेसाल्टचे बनलेले आहे. ज्वालामुखी पासुन बनलेला खडक आणि त्यावरच्या अतिशय पातळ तांबडी (मुरुमाच्या मातीसारखे) थरामुळे तसेच आजूबाजूच्या पोषक हवामानामुळे इथे हे आश्चर्य आपल्याला बघायला मिळते.

कास पठाराजवळ बघण्यासारखं काय काय आहे?

कास तलाव, कुमुदिनी तलाव, वासोटा किल्ला, अजिंक्यतारा किल्ला, सज्जनगड, तापोळा, कोयना अभयारण्य, वजराई धबधबा, ठोसेघर धबधबा, पाचगणी आणि महाबळेश्वर इत्यादी ठिकाणं आपण बघू शकता. येथे राहण्याची तसेच  कॅम्पिंग वगैरे साठी परवानगी नसली तरी इथे जवळपास आपल्याला राहण्यासाठी हॉटेल, कॉटेज तसेच होमस्टे इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत.

काही सूचना

  • फुलं, पानं तोडू नका. इकडेतिकडे थुंकू नका.
  • कचरा करू नका. प्लॅस्टिकच्या बाटल्या, खाद्यपदार्थांचे रॅपर, गुटख्याचे पाऊच पठारावर टाकू नका.
  • इथे उघड्या पठारावर फुलं बघताना उन्हाचा, पावसाळ्यात जाणार असाल तर पावसाचा, थंडीचा त्रास जाणवू शकतो. रेनकोट, स्वेटर, कानटोपी जवळ ठेवा.
  • येथे आपल्याला नाचणीची भाकरी, पिठलं, ठेचा इत्यादी पदार्थ मिळतात.
  • शनिवार रविवार अथवा सार्वजनिक सुट्टीचे दिवस टाळा.
  • सकाळी लवकर किंवा सायंकाळच्या वेळेत गर्दी कमी असते, उन्हाचा त्रास होत नाही.
  • शक्यतो ऑनलाईन बुकींग करूनच जा. जेणेकरून तिथे गेल्यावर ऐनवेळेस निराशा व्हायला नको.
  • कास व्यवस्थापन कडक शिस्तीचे असून तिथे योग्य ती शिस्त पाळा आणि त्यांना सहकार्य करा.

अती-पर्यटनामुळे धोक्यात आलेले हे आणखी एक ठिकाण बनत आहे.  वीस-एक वर्षांपूर्वी इथे कुठल्याही परवानगी शिवाय जाता यायचे. २५ वर्षांपूर्वी वासोट्याला येथून एसटीने गेलो. तेव्हा जाताना याच पठारावर गेलो होतो. वाटेत दिसणारे हे अदभूत सौंदर्य त्यावेळेस परत येथे आपल्याला येथे येण्यासाठी खुणावेल याची कल्पना देखील नव्हती.  कास पठारावरच्या फुलांपेक्षा बेजबाबदार पर्यटक आपल्याकडे अधिक आहेत. याचीच प्रचिती येथे आली. कास तलावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका ठिकाणी एक महिला तिथलं जंगली फुलझाड मुळासकट तोडून नेताना दिसल्या. त्यांना असे करू नका म्हटल्यावर एवढी फुले आहेत. एखादे नेल्याने काय होते. असा उलट उत्तर मलाच दिले. सर्वांनीच असे केल्यावर कसे चालेल. ही नैसर्गिक संपत्ती फक्त याच मातीत आणि याच वातावरण टिकते हे ही त्यांना समजवून सांगितले. पण त्यांच्या लक्षात आले नाही. असो....

सातारा येथील कास पठार निसर्गाचा अद्भूत चमत्कारच आहे. आवर्जुन येथे भेट द्यावी. पण येथील संपत्तीला आपल्याकडून कोणताही धोका पोहचवताच….

आपल्याला हा ब्लॉग कस वाटला या विषयी आपली प्रतिक्रिया येथे जरूर कळवा

2013 साली भेट दिलेला कास पठार

कास पठार


कॉपी करू नका