Friday, September 12, 2025

फुलांची पंढरी कास पठार


महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यात असून पश्चिम घाटातील एक प्रसिद्ध, जैवविविधता असणारे  ठिकाण आहे. जवळच असलेला अजिंक्यतारा, सज्जनगड, कास तलाव, बामणोली येथील कोयना धरण्याचे जलाशयाचा फुगवटा वासोटा किल्ला, ठोसेघर, वजराई धबधब्यामुळे सातारा अनेक पर्यटकांच्या आवडीचा ठरू लागला आहे. येथील कास पठारहे “Kas Pathar Flower Valley”  म्हणून नावारुपाला आले आहे.  हे फुलांचे पठार पाहण्यासाठी नुकताच येथे फेरफटका केला त्या विषयी……

आजूबाजूच्या जंगलात आढळणाऱ्या कास वृक्षावरून कासपठार हे नाव पडले. अशी एक कथा आहे. कासाचा अर्थ प्रादेशिक भाषेत तलाव असाही होतो आणि  पठारावरील प्रमुख कास तलावाच्या उपस्थितीमुळे त्याचे नाव कास पडले आहे.  जागतिक वारसास्थळ असलेल्या कास पठावर विविधरंगी फुलांचा हंगाम सुरू झाल्याचे प्रसिद्धीमाध्यमातून कळाले आणि कासला भेट देण्याची इच्छा जागृत झाली. लगेच वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन बुकिंग केले. ठरल्या दिवशी सकाळी लवकरच निघून सातारा गाठला. वाटेत ढगाळ वातावरण असल्याचे पाहून पठारावर नक्की कसे वातावरण असेल याची शंकाच आली. नागमोडी वळणे घेत साताऱ्यातून कासपठाराकडे जाणाऱ्या रस्त्याने पठारावर पोहचलो. बारीक पाऊस असल्याने वाटेत धुक्याचे साम्राज्य पसरले होते. वनसरंक्षक दलाची चेकपोस्टवर तिकीट चेक करून कास पठारावरील पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाडीतून पाचच मिनिटात गेट क्रमांक वर आम्हाला सोडले. गेटमधून आत गेल्यावर सर्वत्र हिरवीगार झाडे, बाजूला कुंपण त्यामध्ये डोकावत असलेली विविधरंगाची फुले पाहायला मिळाली. मात्र, पाऊस जास्त, धुके सूर्यप्रकाशाचा अभाव असल्याने काही फुले कुजली असल्याचे लक्षात आले. जेवढे शक्य तेवढे येथील परिसर आम्ही हिंडून पाहिला. मात्र, जोराचे वारे, पाऊस यामुळे फुले पाहण्यात अडचण येत होती. गेट क्र. मधून तिकीट दाखवून आपण प्रवेश करतो. येथे फुललेल्या फुलांभोवती कुंपण टाकून मधोमध चालण्यासाठी चांगला रस्ता केला आहे. जंगली आल यांची मोठी मोठी फुलं दूरवर नजर जाईल इथवर पसरली आहेत. टोपली कारवी, आभाळी यांची निळसर फुलं दिसतात. गेट क्रमांक पाहून थोड्या विश्रांतीनंतर आम्ही कास तलाव पाहण्यास निघालोपठारावर येथील स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून दिला असल्याचे दिसून आले. महिलावर्गाला तसेच पुरुषवर्गाला कासपठारावर तयार केलेल्या संरक्षक जाळीच्या देखरेखीसाठी तैनात केले आहे. त्यामुळे अतिउत्साही पर्यटक या नैसर्गिक संपत्तीला बाधा पोहचविणार नसल्याची खबरदारी हे कर्मचारीघेत आहेत. तसेच येथील पर्यटकांना मार्गदर्शन करण्याचे काम ही हे करतात.



दाट धुकेगार वारे आणि सततच्या पावसामुळे यंदा कास पठारावर ही फुले उमलण्यास काहीशी उशीरा सुरूवात झाली आहे.  सध्या पठारावर दीपकांडीचवरअभाळीभुईकारवीसोनकी या फुलांचा तुरळक स्वरुपात बहर आला आहेपठारावर निवरा शेड एकाच ठिकाणी असल्याने आणि तेही अपुरी जागा असल्याने अनेक पर्यटक पावसातच भिजत असल्याचे दिसलेपावसाने उघडीप दिली आणि उन पावसाचा खेळ सुरू झाला तरच पठारावर यंदा मोठ्याप्रमाणात फुलांचा बहर पाहता येणार आहे.

कासपठारला भेट देण्याचे नियोजन करताना वेळ महत्त्वाची आहेफुले बहरण्याचा मुख्य हंगाम ऑगस्टमध्ये सुरू होतो आणि ऑक्टोबर मध्यापर्यंत चालू राहतो. या कालावधीत फुले हळूहळू त्यांचे रंग बदलत असतातपिवळ्या आणि जांभळ्यापासून गुलाबी आणि पांढऱ्या रंगात बदलणारे ही फुले आहेतफुलांच्या विविध प्रजाती त्यांच्या सौंदर्याचे प्रदर्शन करत असतातफुलांचे वेळापत्रक पाऊस आणि सूर्यप्रकाशासारख्या हवामानाच्या परिस्थितीवर अवलंबून असतेसहलीचे नियोजन करण्यापूर्वी स्थानिक हवामान अंदाज आणि फुले बहरण्याचा मुख्य हंगाम लक्षात घेणे गरजेचे आहेबऱ्याच दुर्मिळ फुलांच्या प्रजाती या कालावधीत बघण्यास मिळतातकास पठार प्रसिद्धीस आल्यापासून वर्षानुवर्षे पर्यटकांचे लोंढे कासपठारा कडे वाढत आहेतपण हा हंगाम २० ते २५ दिवसासाठीच असतोपूर्वी प्रति महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पठारावर अनेक मनमोहक दृशे आपल्याला बघायला मिळतात.



कास पठाराला भेट वेळ

साधारण ऑगस्टपासूनच इथे फुलं फुलायला सुरुवात होत असली तरी सप्टेंबर ते ऑक्टोबर हा कालावधी कास पठाराला भेट देण्याचा चांगला कालावधी आहेसप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासुन फुलांचा चांगला बहर बघायला मिळतोतरीसुद्धा कासपठाराच्या वेबसाईटवर फुलांचा हंगाम सुरू झाल्याचे पाहूनच या ठिकाणी जावेwww.kas.ind.in या कास पठाराच्या अधिकृत वेबसाईटवरून आपण ऑनलाईन बुकिंग करू शकता.

कसे पोहोचाल? 

कास पठार हे पुण्याहून १३५ तर मुंबईहून २५५ किमी अंतरावर आहे.  मुंबईपुणेपासून येत असाल तर सातारा इथे पोहोचावेयेथून कास पठार हे २५ किमी अंतरावर आहेएका छोट्याश्या घाटाने येथे पोहचता येते.  आपल्या खासगी वाहनाने येत असाल तर साताऱ्याहून थेट कासकडे जाऊ शकता.

साताऱ्याहून भाड्याने गाडी करूनही आपण कासला जाऊ शकता.ST बसने जाणार असाल तर सातारा बस स्थानकातून बामणोली एसटी बस आपल्याला कास पठारावर घेऊन जातेबामणोलीची बस साताऱ्याहून अंदाजे दीड दोन तासांनी असते.









ऑनलाईन तिकीट :

www.kas.ind.in या कास पठाराच्या अधिकृत वेबसाईटवरून आपण ऑनलाईन बुकिंग करू शकताकास पठाराला भेट देण्यासाठी प्रतिव्यक्ती १५० इतके शुल्क आकारले जातेऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने इथे बुकिंग स्वीकारले जातेपण फुलांच्या बहराच्या कालावधीत इथे होत असलेल्या गर्दीमुळे आपण ऑनलाईन बुकिंग करूनच जावं तसेच ऑनलाईन बुकिंग केल्यावर त्यांची प्रिंट देखील सोबत बाळगावी.  मोबाईलमधील स्क्रीनशॉट ग्राह्य धरला जात नाही१२ वर्षांखालील मुलांना तिकीटाची गरज नसते१०० प्रति तास याप्रमाणे गाईडची सेवा देखील मिळू शकतेशनिवार रविवारी आपल्याला इथे गाईडची सुविधा मिळत नाही.

कास पठारावरील फुले

सुमारे ६५० जातींची फुलं आपल्याला कास पठारावर बघायला मिळतातत्यापैकी ३० प्रजातींची फुलं अशी आहेत जी आपल्याला फक्त आणि फक्त कास पठारावरच बघायला मिळू शकताततसेच फुलं आणि वनस्पती मिळून सुमारे ८५० प्रजाती इथे बघायला मिळतातसीतेची आसवेसोनकीमंजिरीतेरडासोनकी अशी विविध रंगांची फुले वेगवेगळ्या वेळी बहरतातयेथे तेरड्याच्या कुळातील प्रजाती खूप प्रमाणात आढळतातयाशिवाय जंगली हळदनरक्या इत्यादी वनस्पती देखील इथे आढळून येतातकास पठारावरील अनेक वनस्पती औषधी असल्याचे आढळून येतात.

या शिवाय आपल्याला हवी असल्यास पुस्तके देखील उपलब्ध आहेत५० रुपयांपासून ते ५०० पर्यंत यांच्या किंमती आहेतत्यात प्रत्येक फुलांच्या जाती  त्याचे नाव यांचे उल्लेख केलेले आहे.





कास पठारावर प्रवेश

कास पठाराला भेट देण्यासाठी दिवसभरातून तीन बॅचेसमध्ये प्रत्येकी १००० पर्यटकांना आत सोडण्यात येतेसकाळी  ते ११११ ते  आणि दुपारी  ते  अशा तीन वेळांमध्ये इथे भेट देता येतेएकूण दिवसभरातून ३००० पर्यटकांना आत सोडण्यात येतेसुटीच्या दिवशी  हंगाम ऐन भरात असेल तर ऑनलाईन तिकीट काढून जाणेच सोईचे ठरेलकारण येथे रस्ता छोटा असूनसाताऱ्यातून कासपठावर येण्यास  तास लागतोवाटेत घाट असल्याने वाहतूककोंडी होण्याची दाट शक्यता असते.

कास पठारावर फुले पाहण्यासाठी स्वत:ची गाडी घेऊन थेट जाता येते नाहीत्यासाठी वनसंरक्षक दलाने उभारलेल्या पार्किंगवरून गाडी पार्किंगची चांगली सोय केली आहेयेथून पुढे कास तलाव बामणोलीला तसेच वासोट्यावर जाता येतेपार्किंग विभागात आपण आपल्या गाड्या लावल्यावर तिथून पुढे त्यांची मोफत बससेवा उपलब्ध आहेपाचच मिनिटांत आपण कास पठाराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ येऊन पोहचतोयेथे एकूण  प्रवेशद्वार असून मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला सोडण्यात येतेतेथे तिकीट दाखवून आपला पायी प्रवास सुरू होतोसर्व बाजूला रंगीबेरंगी सुंदर फुलांचे बगीचे तयार झालेले आपल्याला दिसून येतातमुख्य प्रवेशद्वाराजवळून सुमारे  किलोमीटरवर असणाऱ्या कुमुदिनी तलाव पाहता येतो.




कास पठार हे अत्यंत सच्छिद्र लॅटराइट खडक (जांभा) पासून बनलेले  पठार आहे. मातीचा पातळ थर. माती वर्षभर पाणी टिकवून ठेवू शकत नसल्यामुळे केवळ मुसळधार पावसातच वनस्पती  जीवन टिकवून ठेवते. कासची वनस्पती या विशिष्ट ठिकाणी मर्यादित आहे. कारण पठार हे बेसाल्टचे बनलेले आहे. ज्वालामुखी पासुन बनलेला खडक आणि त्यावरच्या अतिशय पातळ तांबडी (मुरुमाच्या मातीसारखे) थरामुळे तसेच आजूबाजूच्या पोषक हवामानामुळे इथे हे आश्चर्य आपल्याला बघायला मिळते.

कास पठाराजवळ बघण्यासारखं काय काय आहे?

कास तलाव, कुमुदिनी तलाव, वासोटा किल्ला, अजिंक्यतारा किल्ला, सज्जनगड, तापोळा, कोयना अभयारण्य, वजराई धबधबा, ठोसेघर धबधबा, पाचगणी आणि महाबळेश्वर इत्यादी ठिकाणं आपण बघू शकता. येथे राहण्याची तसेच  कॅम्पिंग वगैरे साठी परवानगी नसली तरी इथे जवळपास आपल्याला राहण्यासाठी हॉटेल, कॉटेज तसेच होमस्टे इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत.

काही सूचना

  • फुलं, पानं तोडू नका. इकडेतिकडे थुंकू नका.
  • कचरा करू नका. प्लॅस्टिकच्या बाटल्या, खाद्यपदार्थांचे रॅपर, गुटख्याचे पाऊच पठारावर टाकू नका.
  • इथे उघड्या पठारावर फुलं बघताना उन्हाचा, पावसाळ्यात जाणार असाल तर पावसाचा, थंडीचा त्रास जाणवू शकतो. रेनकोट, स्वेटर, कानटोपी जवळ ठेवा.
  • येथे आपल्याला नाचणीची भाकरी, पिठलं, ठेचा इत्यादी पदार्थ मिळतात.
  • शनिवार रविवार अथवा सार्वजनिक सुट्टीचे दिवस टाळा.
  • सकाळी लवकर किंवा सायंकाळच्या वेळेत गर्दी कमी असते, उन्हाचा त्रास होत नाही.
  • शक्यतो ऑनलाईन बुकींग करूनच जा. जेणेकरून तिथे गेल्यावर ऐनवेळेस निराशा व्हायला नको.
  • कास व्यवस्थापन कडक शिस्तीचे असून तिथे योग्य ती शिस्त पाळा आणि त्यांना सहकार्य करा.

अती-पर्यटनामुळे धोक्यात आलेले हे आणखी एक ठिकाण बनत आहे.  वीस-एक वर्षांपूर्वी इथे कुठल्याही परवानगी शिवाय जाता यायचे. २५ वर्षांपूर्वी वासोट्याला येथून एसटीने गेलो. तेव्हा जाताना याच पठारावर गेलो होतो. वाटेत दिसणारे हे अदभूत सौंदर्य त्यावेळेस परत येथे आपल्याला येथे येण्यासाठी खुणावेल याची कल्पना देखील नव्हती.  कास पठारावरच्या फुलांपेक्षा बेजबाबदार पर्यटक आपल्याकडे अधिक आहेत. याचीच प्रचिती येथे आली. कास तलावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका ठिकाणी एक महिला तिथलं जंगली फुलझाड मुळासकट तोडून नेताना दिसल्या. त्यांना असे करू नका म्हटल्यावर एवढी फुले आहेत. एखादे नेल्याने काय होते. असा उलट उत्तर मलाच दिले. सर्वांनीच असे केल्यावर कसे चालेल. ही नैसर्गिक संपत्ती फक्त याच मातीत आणि याच वातावरण टिकते हे ही त्यांना समजवून सांगितले. पण त्यांच्या लक्षात आले नाही. असो....

सातारा येथील कास पठार निसर्गाचा अद्भूत चमत्कारच आहे. आवर्जुन येथे भेट द्यावी. पण येथील संपत्तीला आपल्याकडून कोणताही धोका पोहचवताच….

आपल्याला हा ब्लॉग कस वाटला या विषयी आपली प्रतिक्रिया येथे जरूर कळवा

2013 साली भेट दिलेला कास पठार

कास पठार


Friday, November 22, 2024

महाराष्ट्राचा मुकुटमणी : वेरूळचे कैलास लेणं


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) पुण्यापासून सुमारे २३० किलोमीटर अंतरावरील
ऐतिहासिक असे शहर जगाच्या पाठीवर कुठेच नसणारी अशी मानवनिर्मित
शिल्पकृतींचा खजीना असलेल्या या शहराच्या सभोवताली बिबी का मकबरा,
पानचक्की, देवगिरी किल्ला (दौलताबाद), वेरुळ - अजंठा लेणी, घृष्णेश्वराचे मंदिर आहे. वेळेअभावी ही वेरुळ व अजंठा, देवगिरीतील सर्व ठिकाणे संपूर्ण पाहता आली नाही.
हे पाहण्यासाठी किमान ४ ते ५ दिवसांची सोय करूनच हे पाहता येणे शक्य आहे.
आम्ही दोन दिवसात या ठिकाणांना भेटी दिल्या त्या विषयी….





वेरूळ येथील कैलास लेण्याचा अद्वितीय सुरेख शैलमंदिर म्हणून उल्लेख करतात. हे शिवमंदिर अखंड खडकातून सभोवतालच्या ओवऱ्यांसह खोदून काढलेले आहे. छत्रपती संभाजीनगरापासून सुमारे ३० किलोमीटर ही लेणी आहे. या वेरूळ गावाजवळून इला नदी वाहते. लेण्यांची निर्मिती इ.स. सहाव्या शतकापासून पुढे टप्प्याटप्प्याने होत गेली. वाकाटकांच्या ऱ्हासानंतर चालुक्य आणि कलचुरी या दोन राजवंशांच्या संघर्षकालातच ही लेणी कोरली गेली. तत्कालीन अस्थिर राजकीय परिस्थिती आणि या लेण्यांचे भौगोलिक स्थान यामुळे या लेणीमध्ये प्रत्येक राजवटीत विविधता दिसून येते. देवगिरीची सत्ता गेल्यानंतर या लेण्यांमधील प्रमुख शिल्पांवर हातोडा घालून फोडण्यात आल्याचे दिसून येते. किती घाणरडी वृत्ती असेल. असो.. जैन, बौद्ध, हिंदू अशी सगळी लेणी एकाच ठिकाणी असली तरी नंतरच्या शासकांनी आधीच्या पंथाची तयार केलेली लेणीची तोडफोड न करता शेजारीच दुसरी लेणी उभारण्याचे कामही केले.


एकसंध खडकातून कोरण्यात आलेलं हे लेणं इ. स. 757 मध्ये राष्ट्रकूट राजवंश नरेश कृष्ण (प्रथम) यांच्या राजवटीत कोरण्यात आलं. एका मोठ्या शिळेला तीन भागांमध्ये वरून खालपर्यंत खोदण्यात आलं. या खोदकामात जवळपास २० हजार टन दगड फोडून वेगळा करण्यात आला. लेणीच्या मध्यभागी जे मुख्य मंदिर आहे त्यामध्ये वरच्या बाजूला एक मोठे शिवलिंग आहे. या शिवलिंगाच्या समोर मोठा महामंडप आहे. या महामंडपात अनेक मोठमोठेसुंदर कोरीवकाम असलेले स्तंभ आहेत. तर मंदिराच्या छताच्या आतल्या बाजूस भगवान शिवाचं तांडव नृत्य करणारं शिल्प कोरण्यात आलं आहे. मंदिराच्या शिखरावर पाच सिंह कोरण्यात आले आहेत. कैलास मंदिरात प्राणी पूर्णाकृती रूपात पाहायला मिळतात. या संपूर्ण मंदिराची बांधणी एखाद्या रथाप्रमाणे असून हे मंदिर व्याळ आणि हत्ती यांसाख्या प्राण्यांनी डोक्यावर उचललेलं आहे.




राष्ट्रकूट घराण्याच्या ताम्रपटात (आठवे शतक) या स्थळाचा उल्लेख `एलापुरअसा केलेला आहे. अजिंठा येथील कलापरंपरा हरिषेण या वाकाटक सम्राटाच्या मृत्यूनंतर म्हणजे पाचव्या शतकाच्या अखेरीस खंडित झाली आणि तेथून बाहेर पडलेले शेकडो कलावंत नव्या राजवटीच्या आश्रयाखाली वेरूळच्या लेण्यांवर काम करू लागले, असे एक मत आहे.  छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी भोसले हे वेरूळची पाटीलकी चालवीत होते. अठराव्या शतकात अहिल्यादेवी होळकर (१७५६९५) यांनी इला नदीच्या काठी घृष्णेश्वर हे ज्योतिर्लिंगाचे मंदिर बांधले. अहिल्यादेवींनी माणकेश्वर मंदिराचा (कैलास लेण्याचा) जीर्णोद्धार करून तिथल्या धूपदीपासाठी वर्षासन बांधून दिले, अशीही माहिती मिळते. आतापर्यंत हे कैलास लेणं प्राचीन काळात तीन वेळा रंगवले गेले.  या लेण्यांच्या परिसरात सातवाहनकालीन (इ. स. पू. दुसरे शतक ते इ. स. तिसरे शतक) वास्तूंचे अवशेष सापडल्याची नोंद झाली आहे.

सध्याच्या वेरूळ गावाच्या पश्चिमेला असलेल्या बालाघाटच्या डोंगरा औरंगाबाद-वेरूळ या मार्गावरच लेणी खोदण्यात आलेली असून त्यांची एकंदर संख्या ३४ आहे. अनेक लहानमोठी लेणी या डोंगरात पसरलेली आहेत. मुख्य समूहातील दक्षिणेकडील भागात १२ लेणी असून ती बौद्ध धर्मीयांची आहेत. त्यानंतर १७ लेणी हिंदू धर्मीयांची असून, त्यानंतर उत्तरेकडील लेणी जैन धर्मीयांची आहेत. वेरूळच्या बौद्ध लेण्यांचा प्रारंभ सहाव्या शतकाच्या सुरुवातीस व्यापक प्रमाणात सुरू झाल्याचे दिसते. परंतु त्यातील अनेक प्रकल्प पुरेशा पैशांअभावी इ. स. ६०० च्या आसपास बंद पडले असावेत.

 



कैलास लेणे :

`आधी कळस मग पायाहे वचन ह्या वास्तुरूपात पाहावयास मिळते. क्रमांक १६ चे कैलास लेणे आहे.  या लेण्याच्या निर्मितीस राष्ट्रकूटांचा राजा दंतिदुर्ग याच्या कारकीर्दीत प्रारंभ होऊन, पहिल्या कृष्णराजाने (सुमारे ७५६-७७३) त्यास पूर्ण रूप दिले. पुढील राजांच्या काळात या शिवमंदिराच्या ओव्या, सरितामंदिर, लंकेश्वर लेणे, मातृकामंदिर इ. खोदण्यात आली. कैलास लेणे हे शैलमंदिर आहे. या लेण्याच्या कलात्मक आविष्कारात पल्लव-चालुक्यकालीन शैलींची छटा दिसून येते, तसेच विमान, गोपुर इ. घटकांत द्राविड शैली स्पष्ट होते. `माणकेश्वरअसाही त्याचा उल्लेख सापडतो. सर्वच दृष्टींनी हे लेणे भव्य असून, ते वेरूळचा मुकुटमणी मानले जाते. राष्ट्रकूट राजे शिवोपासक होते. त्यांनी अठरा शिवमंदिरे बांधल्याचा उल्लेख राष्ट्रकूटांच्या कोरीव लेखांतून येतो. वेरूळाप्रमाणेच घारापुरी येथे राष्ट्रकूट राजांनी कित्येक शिवकथा प्रसंग साकार केलेले आहेत. ही लेणी ही राष्ट्रकूट राजांची कलाक्षेत्रातील अनुपम व अतुलनीय देणगी आहे. येथे गुंफांचे साधारण तीन समूह आढळतात. त्यांत अनुक्रमे बौद्ध, हिंदू आणि जैन या धर्मांतील देव-देवतांचे शिल्पाकृती आहे. दक्षिणेला बौद्ध आणि उत्तरेला जैन लेणी असून हिंदू लेणी या दोहोंमध्ये आहेत. राष्ट्रकूटांची कीर्ती धर्म, विद्या, साहित्य आणि कला यांना त्यांनी दिलेल्या आश्रयामुळे अजरामर झाली आहे. लेणी जवळ ऐलोगंगा नावाची नदी वाहते. लेणीस ऐलोरा लेणी असेही म्हणतात.

वेरूळला ३४ लेणीची रचना तीन प्रकारच्या समूहात विभागल्या गेल्या आहेत. १ ते १२ बौद्ध लेण्यांचा समूह असून १३ ते २९ हिंदू लेणी समूह तर ३० ते ३४ जैन लेणी समूह आहेत.


वेरुळचा ही लेणी वरून खाली अशी खोदून तयार करण्यात आली आहे. शिखराची निर्मिती अगोदरनंतर गाभारा व पायथ्याचा भाग बनवला गेलेली असी अदभूत शिल्प स्थापत्य शैली बघण्यास मिळते. समोरच्या भागात भव्य दरवाजा मंडप असून उंच अशी कोरीव दोन हत्ती व दोन ध्वज स्तंभ दोन्ही बाजूने खडकात कोरलेली आहेत. यातील उजव्याकडील हत्तीच्या मूर्तीची पडझड झाली आहे. दोन्ही ध्वजस्तंभ संपूर्ण परिसरातून आपले लक्ष वेधून घेत असतात.

पावसाचं पाणी मंदिर परिसरात थांबू नये म्हणून ड्रेनेज सिस्टिम बनवण्यात आलेली आहे. त्यामुळे या भागात पाऊस पडला तरी या मंदिरात पाणी थांबत नाही. ते सर्व पाणी या नाल्यांमधून जमिनीच्या आत निघून जातं. लेणीच्या भित्तीवर कोरीव खडकात अद्वितीय शिल्पकला ज्यात गौतम बुद्धांची मूर्तीभगवान शंकराच्या तांडव करताना असलेल्या अनेक वेगवेगळ्या भावमुद्रा तसेच ब्रम्हाविष्णूमहेश देवतांचे मूर्ती देखील बघायला मिळतात.  रावणाने शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी कैलास डोक्यावर घेतला त्या प्रसंगाचे शिल्प आहे. भिंतीवर शिल्पात कोरलेल्या या मुर्तीसोबतच वेरूळ लेणीत बौद्ध धर्मीय चैत्यविहार तसेच स्तूप बघायला मिळते.






या मूर्ती कोरण्यासाठी कोणत्या प्रकारची आयुधे वापरली गेली..मूर्तींचा वरील भाग एकदम गुळगुळीत कसा काय केला असावा.. या विषयी मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. बहुधा दगड गुळगुळीत करण्यासाठी तो दगडानेच घासला असावा असे वाटते. तर लेणे कोरतांना फक्त ३ प्रकारच्या छिन्नी वापरल्या गेल्यात असे अनुमान तिकडील भिंतींवर असलेल्या छिन्नीच्या खुणांवरून संशोधकांनी काढलेले आहे. अजंठा आणि वेरूळ जंगलाच्या काळाचा ओघात पुढे लुप्त झाले. लोक या वास्तूंची आठवण विसरले हे फार चांगले झाले. १८१९ साली एका ब्रिटीश अधिकाऱ्याने त्यांचा शोध लावला त्यामुळे आपण हा महान ठेवा आज बघू शकतो.



१९५१ साली भारत सरकारने अति प्राचीन वास्तूंचा ठेवा जपण्यासाठी लेण्यांना राष्ट्रीय स्मारकम्हणून घोषित केले. सांस्कृतिक माहितीच्या आधारावर हा ठेवा जपण्यासाठी वेरूळ लेणीस १९८३ साली संयुक्त राष्ट्रांची शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (UNESCO) युनोस्कोने जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समाविष्ट केले. त्यामुळे जगभरातील पर्यटक येथे येतात.  या लेणीला बघण्यासाठी लाखोंच्या संख्येने भारतीय तसेच विदेशी पर्यटक दरवर्षी हजेरी लावतात. वेरूळ लेणीजवळच घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर आहे. त्यामुळे नेहमीच येथे पर्यटकांची वर्दळ बघण्यास मिळते.
































खंत : जगभरातून पर्यटक येथे हे वैभव पाहण्यास येत असतात. परंतु हा एवढा अमूल्य ठेवा आपल्या शहरात आहे याचे भान येथील प्रशासनाला बहुदा नसावे. कारण येथे जाणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. वेरुळ ते अजंठा या सुमारे १०० किलोमीटर अंतरावरील रस्त्यामध्ये अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. संपूर्ण रस्त्यात कुठेही लाईटची सोय नाही. वाटेत एकदाच पेट्रोपंप असून, रात्री येथून प्रवास करताना केवळ गुगल मॅपचा आसरा घ्यावा लागतो. मुख्य वळणावर दिशादर्शक फलकांचा अभाव दिसून येतो. रस्त्यावर झालेली दुकानदारांची अतिक्रमणे ही अजून एक डोकेदुखी ठरत आहे. जेणे वाहतुककोंडीस अजून वाढ होते. हे प्रशासनाने सुधारणे गरजेचे आहे.

लेणी पाहण्याची वेळ : सकाळी ६ ते सायंकाळी ६ पर्यंत. (मंगळवारी लेणी बंद असते)

तिकीट दर : ४० रुपये प्रति माणसी.

पाहण्याचा वेळ : साधारणपणे ३ ते ४ तास. (खरे तर शांतपणे ही लेणी पाहण्यासाठी अनेक महिने लागतील.)






हा ब्लॉग आपणास कसा वाटला या विषयी जरुर लिहा.


कॉपी करू नका