Sunday, January 27, 2013

रांजणगावचा महागणपती


 

            पुणे-नगर रस्तावर शिरूर तालुक्यात रांजणगावचा  अष्टविनायकातील हा गणपती आहे. हे ठिकाण पुणे जिल्हय़ात येते.  मुख्य रस्त्यापासून जवळच मंदिर आहे. अष्टविनायकापैकी हा चौथा गणपती. गणपतीला महागणपती असेही म्हणतात. हे महागणपतीचे स्वयंभू स्थान आहे. हा गणपती उजव्या सोंडेचा आहे. मंदिराचा दरवाजा पूर्वेकडे आहे. देवळाचा मुख्य गाभारा व मंडप अजूनही चांगल्या स्थितीत आहे. मराठेशाहीत अनेक सरदारांनी या देवळाला इनामे दिली होती . मंदिराचे दोनही गाभारे थोरले माधवराव पेशवे यांनी जीर्णोद्धार केला आहे. अष्टविनायकांपैकी सर्वाधिक शक्तीमान असे महागणपतीचे रूप आहे.
             येथील देवस्थान कमिटीने सध्या मोठय़ा प्रमाणात चांगला जीर्णोद्धार सुरू केला आहे.  गणपतीचे 5, 10, 15 व 25 ग्रॅम मध्ये चांदीची  नाणी येथे विकत मिळतात. देवस्थानने मोठा सभामंडप बांधला आहे. सकाळी व सायंकाळी या ठिकाणीही अन्नछात्रलय  आहे. प्रवेशद्वारावर आकर्षक दोन हत्तींचे मोठे पुतळे उभारलेले आहे. मोठय़ा कमानीतून आपण प्रवेश करतो. येथे गाडय़ा पार्किगसाठी मोठे वाहनतळ, स्वच्छतागृह उभारलेले आहे. मंदिराच्या बाहेर परिसरात गावागावातून आलेले शेतकरी भाजीपाला विकत होते. संध्याकाळचे 7 वा. आम्ही रांजणगावला पोहचलो. दर्शन घेऊन पुण्याकडे 7.30 ला निघालो.













रामदरा






रामदरा येथील सुंदर निसर्ग, थेऊरचा चिंतामणी, भुलैश्वरचे मनाला भुरूळ घालणारे अद्भूत असे शिल्प, रांजणगावचा महागणपती असे प्रवास नुकताच झाला. त्या विषयी..

सकाळी घरातून लवकर निघता निघता 11 वाजले. त्यातून आज रविवार त्यामुळे हडपसरला नेहमीपेक्षा थोडी जास्तच गर्दी होती. हडपसर सोडून सोलापूर हायवेला गाडी आली. टोल भरून रामदरा पाहण्यास निघालो.
पुण्याकडून येताना उजव्या हाताला रामदरा असा फलक लावला आहे. सुमारे 4 किलोमीटरवर एकरी रस्त्यावरून शेतीशेजारून  हा रस्ता आपल्याला रामद:यावर घेऊन जातो.  रामदरा हे एक नैसर्गिक तळ्याकाठी असलेले छोटय़ाश्या डोंगरावरील देवस्थान आहे.  गाडीवरर्पयत जाते. डोंगर आहे हे प्रथम कळतच नाही. उंचावर असलेल्या या ठिकाणी मोठे तळे आहे. इथे शंकराची देऊळ आहे. विशेष म्हणजे मंदिरातील खांबांवर अनेक देव-देवता आणि ऋ षिंचेमुनींचे पुतळे कोरले आहेत. अतिशय प्रसन्न वातावरण आणि  शांत तळे,  सुंदर निसर्ग असा येथील देखावा आहे. मंदिरात दुर्वासा ऋषी,  स्वामी विवेकानंद, विभीषण, सनत्कुमार, वासुदेव, धन्वंतरी, वेदव्यास, गोरा कुंभार, ज्ञानेश्वर, तुकाराम असे छोटय़ा आकारातील रंगीत पुतळे येथे आहे. पावसाळय़ात या ठिकाणीचा परिसर विलोभनीय दिसतो. नारळाची मोठमोठी झाडे लावून परिसर सुंदर केला आहे. मंदिरात दत्ताची मूर्ती, राम, लक्ष्मण, सीता व त्यांच्यासमोर शंकराची पिंड असा सर्व देवांचा मिलाप या ठिकाणी दिसतो. गाभा:याच्या बाहेर हनुमानाची मूर्ती सुंदर आहे.















येथून पुढे थेऊरचा गणपती पाहण्यास निघालो





कसे जायचे ? :

लोणी काळभोर गावाच्या थोडेसे पुढे लोणी फाटा लागतो.
पुण्याकडून येताना प्रथम रामदरा नंतर थेऊरचा  गणपती व भुलेश्वर असा प्रवास करता येतो.

  • पुणे ते रामदरा : 24 किलोमीटर
  • पिंपरी ते रामदरा : 38 किलोमीटर
  • थेऊर ते रामदरा :  12 किलोमीटर

भुलेश्वरचे मनाला भुरूळ घालणारे अद्भूत शिल्प





भुलेश्वरचे मनाला भुरूळ घालणारे अद्भूत शिल्प


श्री भुलेश्वर मंदिर (यवतचे पुरातन शिवमंदीर)

रविवार सुट्टीचा दिवस त्यातच 26 जानेवारीची सुट्टी जोडून आलेली. मग काय रविवारी सकाळीच अष्टविनायकातील थेऊर गणपतीचे दर्शन घेऊन रामदरा, भुलेश्वर व नंतर रांजणगावचा महागणपतीचे दर्शन घेण्यासाठी निघालो. त्या विषयी..


               भुलेश्वर हे प्राचीन मंदिर असलेले ऐतिहासिक ठिकाण आहे.  सिंहगडावरून निघालेल्या सह्याद्रीच्या रांगेत यवतच्या नैऋत्य दिशेला 700 फूटावर भुलेश्वर मंदिर आहे. 13 व्या शतकात देवगिरी यादवांच्या काळात हेमाडपंती बांधकामाची अनेक मंदिरे निर्माण करण्यात आली.  याच शतकाच्या मध्यास मंदिराचे बांधकाम झाले असावे.    पुणे शहराच्या दक्षिणोकडे भुलेश्वर रांग म्हणून ओळखली जाणारी सह्याद्रीची ही उपरांग आहे. ही रांग पूर्व पश्चिम पसरलेली आहे. याच रांगेत सिंहगड असून दिवे घाटाजवळ सोनोरी ऊर्फ मल्हारगड हा किल्ला आहे. याच रांगेत दौलतमंगळ (भुलेश्वर) किल्ला आहे.  आता फक्त किल्याचे जुने अवशेष उरले आहेत. दौलतमंगल आता भुलेश्वराची अप्रतिम अशी दगडात कोरलेली शिल्पांसाठी ओळखले जाऊ लागले आहे. भुलेश्वर मंदिरातील शिल्पे, शिल्पसौंदर्याचा उत्तम आविष्कार आहे.  पुरातत्त्वखात्याने हे मंदिर राष्ट्रीय संरिक्षत स्थळ म्हणून घोषित केलेले आहे. पण येथेही पुरातत्व विभागाचे इतर स्थळांप्रमाणोच दुर्लक्ष आहे. पार्वतीने शंकरासाठी नृत्य केले व नंतर हिमालयात जाऊन लग्न केले, अशी पौराणिक कथा सांगितली जाते. रामायण व महाभारतातील अनेक प्रसंग इथे कोरलेले आढळतात. हे मंदिर संपूर्ण दगडी आहे.



जावे कसे  :

               पुण्यातून जाणार असल्यास दोन मार्ग सोयीचे आहेत. पहिला मार्ग पुणे-दिवे घाटातून सासवड-आंबळे-माळशिरस मार्गे भुलेश्वर असा रस्ता आहे. दुसरा मार्ग दक्षिणोकडून यवत मार्गे  पुणे-सोलापूर रस्त्यावरील आहे. यवतच्या अलीकडे अंदाजे 3 किलोमीटर  पुण्याकडून सोलापुरकडे जाताना, उजवीकडे एक कालव्याच्या बाजुने एक रस्ता आत जातो. येथे कुठलीही पाटी लावलेली दिसली नाही. विचारात विचारात फाटा गाठला. रस्ता मंदिरार्पयत चांगला आहे. पुण्याहुन 45 किमी अंतरावर सोलापूर रोडवर यवतच्या अलिकडे 3 किलोमीटरवर भुलेश्वर फाटा आहे तेथून 7 किलोमीटरवर हे मंदिर आहे. या रस्त्यावरून भुलेश्वरचा डोंगर ओळखता येतो. कारण डोंगरावर एक भला मोठा बीएसएनएलचा टॉवर उभा आहे.  जाताना एक छोटा घाट लागतो. घाट संपताच उजव्या बाजूला भुलेश्वरच्या डोंगरावर जायचा रस्ता आहे. डोंगरावर जाण्यासाठी पाय:या आहेत. ज्यांना फोर व्हिलर चालवायची सवय नाही. अशांनी गाडी येथेच पार्क करावी कारण येथून पुढचा थोडाच रस्ता अवघड आहे. एकदम वर चढणारा शॉर्प टर्न आहे. चुकल्यास गाडी नक्कीच खाली येईल. तेव्हा सावधान. फक्त एकच फोर व्हिलर वर किंवा खाली जाऊ शकते. एकदम दोन वाहने समोर आली तर वाट द्यावी लागते. माळशिरस हे गाव किल्ल्याच्या पायथ्याला आहे. दौलतमंगळ किल्ल्यामधील भुलेश्वर मंदिरापर्यंत गाडीरस्ता झालेला आहे. किल्ल्याची काही तटबंदी तोडून हा रस्ता केलेला आहे.


दिसणारा परिसर : 

               पुरंदर, सिंहगड किल्ला दिसतो. जेजुरी, सपाटीवरचा प्रदेशही पहाता येतो. येथून जवळच जेजुरी, नारायणपूर व केतकवळेचा बालाजी आदी ठिकाणी आपण भेट देवू शकतो.


भुलेश्वरबद्दल थोडी माहिती

    मंदिरास भुलेश्वर किंवा यवतेश्वर असेही म्हणतात. मंदिराचे बांधकाम 13 व्या शतकातले असुन भिंतीवरील कोरीवकाम व मूर्तीकाम केलेले आहे. या मंदिराची बांधणी दक्षिणोकडील होयसळ मंदिराप्रमाणो आयताकृती व पाकळय़ासमान आहे. हे मंदिर पूर्वाभिमुख असून आहे. अर्धखुला मंडप, मधला भाग आणि मुख्य गाभारा असा या मंदिराचा परिसर आहे. या मंदिरासमोर नंदीमंडपही आहे. मोगल लढाईच्या काळात ब:याच मूर्तीची तोडफोड झालेली आहे. पण तरीही ज्या मूर्ती तडाख्यातून वाचल्या त्याचे वर्णन करणे शक्य नाही. गाभा:यात शिवलिंग आहे. शंकराच्या पिंडीखाली खोबणीमध्ये जर प्रसाद ठेवला तर तो खाल्यासारखा आवाज येतो व नंतर प्रसाद खाल्लेला दिसतो. अशी येथे कहाणी सांगितली जाते. पुजा:याने आम्हाला पिंडीचा वरचा भाग उचलून दखविला.
किल्ल्याची तटबंदी, बुरु जांचे काही अवशेष आजही उभे आहेत. किल्ल्याचा दरवाजा, पाय:यांचा मार्ग, पाण्याची टाकी पहायला मिळतात. किल्ल्याचे भग्नावशेष पाहून मन खिन्न झाले. 7 ते 8 वर्षापूर्वी येथे गेलो होतो. तेव्हा परत संपूर्ण परिसर पहाणे व्यर्थ होते. मुख्य मंदिराच्या बाहेरून भिंत बांधलेली आहे. या भिंतीवरून संपूर्ण मंदिराला प्रदशिणा घालता येते. मात्र, प्रदशिणा घालताना उंचावर असल्याने थोडी भीतीही वाटते. मध्येच मुख्य मंदिराची छोटी खिडकी आली की गार वा:याची झुळूक येते. येथून आजुबाजूचा परिसर छान दिसतो.







 
     सभोवतालची भिंत, नगारखाना व शिखरे  17 व्या शतकात मराठा राजवटीत बांधलेली आहे. पहिले बाजीराव पेशवे व साताराचे शाहू महाराज यांचे गुरू ब्रम्हेंद्रस्वामी यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. जीर्णोद्धारामुळे हे मंदिर हेमाडपंथी-मराठा संमिश्र वास्तुशैली झालेली आहे. महाशिवरात्रीला येथे गर्दी होते. माळशिरस गावातून श्रवण महिन्यात येथे भुलेश्वराची पालखी नेली जाते. मंदिरात मानवी व देवतांची शिल्पकलाकृती आहेत. देवळाभोवती अनेक देवतांच्या मूर्ती आहेत. 













मुख्य सभामंडपांच्या भोवती असलेल्या अध्र्या भिंतींवर  युद्धप्रसंग, सिंह, हत्ती व रामायण-महाभारतातील प्रसंग कोरलेले आहेत.  द्रौपदी-स्वयंवर, शरपंजरी भीष्म, हत्तीला आकाशात फेकणारा भीम ही शिल्पे कोरलेली आहेत. कुंभ, कमळ, मखर, पाने-फळे, वेलबुट्ट्या ही शुभचिन्हे कोरलेली आहेत. येथे दगडात कोरलेली स्त्री व तिने वापरलेले अलंकार अतिशय सुंदर आहेत. मंदिराचा मुख्य गाभारा खोल असून समोर काळय़ा दगडातील कोरीव काम केलेला नंदी आहे. पिंडीमागे  संगमरवरी दगडावर पितळी मुखवटा बसवलेला आहे. बाण काढल्यानंतर खाली आत तीन मुख्य लिंगे, तीन कोप:यात उंचवट्याच्या स्वरूपात असून ती ब्रम्हा, विष्णू व महेश यांची प्रतीके आहेत. पिंडीच्या खाली असलेल्या खोलगट भागात नैसिर्गकरित्या पाणी पाझरत असते. अन्य शिवमंदिरापेक्षा येथे अनेक वैशिष्ट्ये आढळतात.  मंदिराच्या बाहेरील बाजूस गणोशाचे स्त्री स्वरूपातले दुर्मिळ शिल्प आहे.
             भुलेश्वरचे दर्शन घेऊन रांजणगावला जायचे अचानक ठरले मग रस्ता विचारून यवतला पोचलो.  संध्याकाळाचे 5 वाजले होते. तेथून केडगाव मार्गे, रिलायन्स गॅस पंप, घोडेगाव सहकारी साखर कारखाना, न्हावरा फाटा, आंबळे, कर्डेगावातून पाईप लाईन शेजारून रस्ता कापत अखेर रांजणगावच्या गणपतीला 7 ला पोचलो. हे अंतर सुमारे 50 किलोमीटर होते. 




रामदरा

रांजणगावचा महागणपती



थेऊर


थेऊरचा चिंतामणी :


पुणो जिल्हय़ातील हवेली तालुक्यात थेऊर हे गाव आहे . अष्टविनायकांपैकी थेऊरचा श्री चिंतामणी हा दुसरा गणपती आहे. थेऊरच्या कदंब वृक्षाखाली हे श्री गणोशाचे ठिकाण आहे.तेथील गणपती चिंतामणी म्हणून ओळखला जातो. भक्तांच्या चिंतेचे हरण करणारा म्हणून याला चिंतामणी म्हणतात.  देवळाचा मुख्य दरवाजा उत्तरेकडे आहे. गणोशाची मूर्ती मात्र पूर्वेकडे तोंड केलेली आहे. गणपती डाव्या सोंडेचा आहे. थोरले माधवराव पेशवे या गणपतीच्या दर्शनास नेहमी येत असत.  त्यांनी मंदिराचा सभामंडप बांधला. देवळाजवळच राहण्यासाठी एक वाडाही त्यांनी बांधला होता . माधवराव पेशवे अकालीच थेऊर मुक्कामीच वारले .  त्यांची पत्नी रमाबाई येथेच सती गेली तिची समाधीही नदीकाठी आहे. मोरया गोसावी यांनी तेथेच गणपतीची तपश्यर्या केली. थोरले माधवराव पेशवे यांनी देवस्थानला येथील गणपतीच्या व्यवस्थेसाठी या गावचा महसूल इनाम म्हणून दिला होता .
सध्या देवस्थानचे ट्रस्टी चिंचवड देवस्थानकडे आहे. माणसी 15 रुपयांत सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेर्पयत मंदिराशेजारीच अन्नछत्रलयात जेवण मिळते. गरम गरम भात, पोळी, भाजी व शिरा असा बेत आम्ही जेवलो. एकाचवेळी 1क्क् माणसे जेवण करतील एवढी प्रशस्त जागा आहे. इतर अष्टविनायकामध्ये मंदिराचा बाहेरील परिसर मात्र, प्रचंड रहदारीचा वाटला. वाटेत बसलेले भाजीविक्रेते, छोटे स्टॉलधारक, अस्वच्छता आहे. पार्किगची सोय आहे. येथून रांजणगाव गणपतीला जाता येते. अंदाजे अंतर 4क् किलोमीटर आहे.
गणपतीचे दर्शन घेऊन व जेवण करून निघण्यास एव्हना दुपारचे 3 वाजले होते. तेथून पुढे मनात भुलेश्वरला जायचे ठरले होते. त्यामुळे रांजणगावला न जाता भुलेश्वरला निघालो. भुलेश्वर येथून अंदाजे 25 किलोमीटरवर आहे. जेवण झाल्यामुळे चांगलीच सुस्ती आली होती. गार वारा घेत भुलेश्वरकडे जाण्यास निघालो.

कसे जायचे? :

थेऊरचा गणपती पुणो-सोलापूर महामार्गाला जोडलेल्या रस्त्यावर असून, पुण्यापासून हे 26 कि.मी. अंतरावर आहे. पुण्यापासून बसेसची सोय आहे.


Sunday, January 13, 2013

मुंबई - घारापुरी - नेहरू सायन्स पार्क

भल्या पहाटे 5 ला उठून सर्व आवरले. नेटवरून बुकिंग केलेली ऑनलाईन रेल्वे तिकीटे घेतल्याची खात्री केली. सामानाची आवाराअवर करून चिंचवडला 6.35 ची सिंहगड एक्सप्रेस पकडण्यास निघालो. वेटिंग लिस्टवर नाव होते. रविवार आणि सोमवारी संक्रांत आल्याने गाडीला चांगलीच गर्दी होती. गाडीत सतत वावरणारे चाय, कटलेट, वडापाव विकणा:यांचा साहजिकच गर्दीतील उभ्या असणा:यांना प्रवाशांना त्रस होत होता. एका बाईने तर परत एकडे याला तर खाली फेकून देईल, अशी धमकीच या विक्रेत्यांना दिली. आमचेही पोट असते. म्हटल्यावर गर्दीतील गडबड गोंधळ जरा कमी झाला. कल्याण आल्यावर बसायला जागा मिळाली. एकूण 2 तास मजेत गेले. छत्रपती शिवाजी टर्मिनल्सला बरोबर 10 ला गाडी पोचली. येथे 26/11 नंतर येथे चांगला बंदोबस्त केलेला आहे.

छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) :

मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस ही वास्तू सध्या मध्य रेल्वेची मुख्यालय म्हणून परिचित असून मुंबईतील नाही तर भारतातील सर्वात महत्त्वाचे असे ते रेल्वे स्थानक आहे. येथून दिल्ली, कोलकाता, चेन्नई, कोकण, पुणो  यासारख्या ठिकाणी रेल्वे जातात. या वास्तूचा निर्मिती-आराखडा फ्रेडरीक विल्यम स्टीव्हन्स यांनी 1887-88 या काळात निर्माण केला. कामाला सुरु वात 1889 ला होऊन ते 1897ला पूर्ण झाले. या वास्तूवर कोरीव काम केलेले आहे. वेगवेगळे प्राणी देखील कोरलेले आहे. 1996 ला या इमारतीचे व्हिक्टोरीया टर्मिनस हे नाव बदलून ‘छत्रपती शिवाजी टर्मिनस’ असे करण्यात आले. नुकताच प्रदर्शित झालेला ‘रावण’ या हिंदी चित्रपटातील एका दृश्यात सीएसटीची इमारत फोडून ट्रेन बाहेर येते असे कॉम्प्युटरद्वारे चित्रीत केले आहे.  स्टेशनच्या बाहेर येऊन गेटवे ऑफ इंडियाकडे जाणारी टॅक्सी पकडली. 25 रुपयांत गेटवे ऑफ इंडिया आले.  जरा वेळ फोटोग्राफी करून 10.30 ला घारापुरीकडे जाणारी लाँचचे तिकीट काढले. 








घारापुरी :

घारापुरीला पोहोचण्यासाठी आपल्याला गेट वे ऑफ इंडियाहून लॉँच पकडावी लागते.   यात पब्लिक लाँच व लक्झरी लाँच असे दोन पर्याय आपल्यासाठी उपलब्ध आहेत.   आम्ही मात्र, पब्लिक लाँचचे 150 रुपये माणसी तिकीट काढले. 20 रुपये जादा देऊन बोटीच्या वरच्या मजल्यावर समुद्राचा नजरा पाहण्यासाठी गेलो.









 गेटवे ते घारापुरी बेटापर्यंतच्या एका तासाच्या लाँच प्रवासात मोठमोठी मालवाहू जहाजे दिसतात. समुद्री पक्षी या जहाजांच्या शेजारी  घिरटय़ा घालताना किंवा समुद्रात मासे पकडताना दिसतात. समुद्रातून जाताना एक लांबलचक पाइपलाइनही दिसते. ती तेलशुद्धीकरण प्रकल्पांमध्ये वाहून नेणा:या तेलाची पाईप लाईन असल्याचे लाँचवरील चालकाने सांगितले. समुदाचा खारा वारा अंगावर घेत, आजुबाजूची छोटी जहाजे व मोठी जहाजे पाहत तासाभरातच घारापुरी आली. 1534 मध्ये घारापुरी बेट पोतरुगिजांनी ताब्यात घेतले. पुढे शिवाजीमहाराजांच्या काळात मराठय़ांनी ते जिंकले. त्यानंतर इ.स. 1774 मध्ये घारापुरी बेट इंग्रजी सत्तेच्या हाती जाऊन 1947 पर्यंत ते त्यांच्या सत्तेखालीच होते.











घारापुरीच्या समोरच तुर्भे येथील अणुभट्टीचा गोल घुमट दिसतो.  घारापुरी बेट हे एखाद्या उंच टेकडीसारखे आहे. घारापुरीच्या नवीन जेट्टीवर (प्रवाशांना उतरण्यासाठी समुद्रात तयार केलेला छोटासा पूल) उतरलो. येथून घारापुरीचा डोंगर 2 किलोमीटरवर आहे. हे अंतर चालत जाण्याएवढे असले तरी महाराष्ट्र पर्यटन विभागाकडून येथे प्रवाशांना नेण्यासाठी छोटय़ा रेल्वेची घारापुरी ग्रामपंचायतीने सोय केली आहे. केवळ 1क् रुपयांत र्टिन तिकीट आपणाला मिळते. वाटेत आवळे, बोरं, काकडी, कै:या असा रानाचा मेवा विक्रीसाठी उपलब्ध होता.  दुपारचे 12 वाजले होते. प्रथम पोटोबा करून लेण्या पाहण्यासाठी निघालो. लेण्यांपर्यंत पोहोचण्यासाठी साधारण 120 ते 125 पाय:या चढाव्या लागतात. या पाय:यांच्या दोन्ही बाजुला अनेक हस्तकलेच्या वस्तू, दगडात कोरीव काम केलेले हत्ती, जुन्या काळी वापरत असलेल्या वस्तू, मोत्यांच्या माळा, महिलांसाठी पसेर्स विकायला ठेवलेल्या होत्या. या वस्तू बहुधा मुंबईतच तयार केलेल्या असणार कारण मुंबईत इतरत्र फिरल्यावर या वस्तू नक्कीच दिसतात. दगडातील कोरीव काम केलेल्या वस्तूंच्या किंमती विचारून आपल्याला धक्काच बसतो. विदेशी पर्यटकांची मात्र, येथे चांगलीच लुबडणूक होते. टेकडीवर पोहचण्यास सुमारे अर्धा तास पुरतो. लेणीपर्यंत जाणारी चढण फार मोठी नाही; पण वृद्ध अथवा अपंगांना पायथ्यापासून डोली-खुर्चीची सोय आहे. (अर्थातच पैसे देऊन) काही कालावधीसाठी राहण्यासाठी येथे राज्य पर्यटन खात्याची निवास व्यवस्था आहे. त्याचप्रमाणो खाण्यापिण्यासाठी सरकारी हॉटेल्स तर काही छोटी खासगी हॉटेल्स आहेत! एक पिकनिक स्पॉट म्हणून घारापुरीला आता ओळखले जाते. खरे तर जागतिक वारसा लाभलेल्या घारापुरी लेण्या पाहून त्यांचा अभ्यास करायला हवा. मात्र, गंमत म्हणून येथील कोरीव काम केलेल्या मूर्तीबरोबर आपला स्वत:चा व मित्रमैत्रिणींचा फोटो काढणारे जास्त अशी परिस्थिती सध्या सर्वच लेण्यांमध्ये दिसून येते. लेणी पाहण्यासाठी आलेल्यांची पर्यटकांची संख्या प्रचंड आहे. लेणी पाहायला आलेल्यांमध्ये विदेशी पर्यटकांची संख्या खूपच असते. घारापुरीचे प्राचीनकाळी ‘श्रीहरी’ असे नाव होते. या बेटावर शैव संप्रदायाच्या लेण्या आहेत. मुंबईपासून 10 ते 12 कि.मी. अंतरावर समुद्रात घारापुरी या बेटावर या लेण्या आहेत. इ.स. 3 ते इ.स. 7 या काळात या लेणींची निर्मिती झाली असे मानले जाते.  पूर्वी या बेटाच्या दक्षिणोला एक मोठा दगडी हत्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत असे. त्या हत्तीवरूनच या लेणींना ‘एलिफंटा केव्हज’ हे नाव मिळाले. हा हत्ती सध्या मुंबईतीलच जिजामाता उद्यान (जुने नाव राणीची बाग) येथे आहे. या लेणींचादेखील ‘जागतिक वारसा’ च्या यादीमध्ये समावेश झाला आहे. मौर्य, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, मुस्लिम व पोर्तुगीज साम्राज्याच्या ताब्यात हे बेट होते. भौगोलिकदृष्टया रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात हा परिसर येतो. अजंठा, वेरूळ, कार्ला, भाजे सारख्याच येथेही गुफा आहेत. जुन्या काळच्या ध्यानधारणा करण्यासाठी खोल्या आहेत. एकूण पाच गुंफा आहेत. कोरीव काम फारच छान आहे.  काही मूर्ती भग्न अवस्थेत आहेत. काहींचे हात, पाय, चेहरा विद्रुप केलेला आहे.


लेण्या :

सहाव्या शतकात काळय़ा पाषाणात कोरलेल्या या लेण्यांमुळे घारापुरी लेण्यांना वल्र्ड हेरिटेजचा वारसा लाभला आहे.  शिवशंकराची अनेक रुपे या या लेण्यांमध्ये साकारली आहेत. महाराष्ट्रात वेरु ळ, जोगेश्वरी, अंबेजोगाई या ठिकाणी शैव लेण्या आहेत. येथील गाभा:याच्या मंडपात मोठय़ा आकाराचे शिविलंग असून चारही दिशेला प्रवेशद्वार आहे.
पहिली गुफा सर्वात मोठी आहे. लेण्यातील मुख्य आकर्षण म्हणजे भव्य अशी महेशमूर्ती (सदाशिव) त्रिमूर्ती. ब्रम्हा, विष्णू आणि महेश (शिवशंकर) यांच्या मूर्तीने जगभरातील पर्यटकांना मोहित केले आहे. महाराष्ट्र पर्यटन महामंडळाच्या बोधचिन्हासाठी त्याचा वापर केला गेला आहे. छातीपासूनची ही शिवाची मूर्ती भव्य आणि उंच असून त्यातून उत्पत्ती - स्थिती आणि लय ही शंकराची तीन रूपं दाखविली आहेत. लेण्यातील महामंडप 130 फूट लांबी- रुंदीचा आणि 17 फूट उंचीचा आहे. सभामंडपाचं छत 26 खांबांवर आधारलेले आहे. प्रत्येक शिल्प पौराणिक कथा पार्श्वभूमी असून शिल्पकारांनी त्याला वास्तव रूप आहे.
या मूर्तीच्या डावीकडे गंगावतरण शिल्प आहे. भगीरथ गंगा पृथ्वीवर आणली तो प्रसंग 5 मी. उंचीच्या शिल्पातून साकारला आहे. शिवपार्वती विवाह सोहळय़ाचा प्रसंग दाखिवणारे शिल्प आहे. या शिल्पाच्या शेजारीच अंधकारसुरवधमूर्ती शिल्प आहे. शिवाच्या तांडव नृत्याचे शिल्पही आहे. प्राचीन भव्य शिविलंग, डोंगर माथ्यावरील निसर्गरम्य सान्निध्यातील सीतागुंफा हेदेखील आवर्जून पाहण्यासारखे आहे.
गुंफा क्र . 2, 3, 4 त्या मानाने लहान आहेत. पाचव्या गुफेत फार पडझड झालेली दिसली. उन, वारा, पावसामुळे गुफेत माती भरली गेली आहे. शेवटच्या दोन्ही लेणींमध्ये आतमध्ये कोणतेही कोरीव काम नाही. या लेण्यात खूप मोठय़ा प्रमाणावर मातीचा ढिगारा दिसला.  या ठिकाणी मात्र, महाराष्ट्र पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष आहे.   सिंहाची आयाळ, घोडय़ाचे शरीर, वरती शिंगे असे त्याचे रूप आहे. हे सहाव्या शतकातील लेणो आहे. त्यानंतरचे तीन क्र मांकाचे लेणो हे  खोदलेले व चांगल्या स्थितीत आहे. तर दोन क्रमांकाचे लेणो हे मात्र अर्धवट सोडण्यात आले आहे.  शिवपार्वती विवाह शिल्पकृती, चतुर्भुज द्वारपाल, गणोशमूर्ती, अर्धनारीनटेश्र्वराची कार्तिकेय ही शिल्पदेखील आहेत.  ‘साइट म्युझयिम’ लेण्यांच्या परिसरातच आहे. मुंबईच्या परिसराचा आणि महाराष्ट्रातील अन्य लेण्यांचा इतिहासही येथील भिंतींवर पाहण्यास मिळतो. सर्व लेणी पहायला साधारणपणो तीन तास लागतात. 
















लेण्या पाहून पुन्हा जेट्टीवरील कोणत्याही सोडण्यात येणा:या लाँचमधून पुन्हा गेटवे ला आलो. तेथून चालत चर्चगेट स्टेशनपर्यंत निघालो. वाटेत मुंबई विद्यापीठाची इमारत दिसली. शेजारीच राजाभाई टॉवरही सुरेख आहे. तेथे दोन-चार फोटो काढून चर्चगेटच्या बाहेरील मार्केटही पाहिले. रविवार असल्याने ट्रेनला गर्दी कमी होती.






संध्याकाळी 7 ला आत्याच्या घरी मुक्कामाला गेलो. दुस:या दिवशी आत्याचा पाहुणचार घेऊन दुस:या दिवशी सकाळी 10 ला घर सोडले. ते महालक्ष्मी येथील नेहरू सायन्स सेंटर पाहण्यासाठी. फास्ट लोकल व स्लो लोकल कुठल्या स्टेशनवर थांबते याचा अंदाज आला नाही. त्यामुळे महालक्ष्मी स्टेशनवर गाडी थांबली नाही. सहप्रवाशांनी मग बॉम्बे सेंट्रलला उतरून परत मागे येणारी लोकल पकडा अथवा टॅक्स करून नेहरू सायन्स सेंटरला जाण्याचा सल्ला दिला. मग  ट्रेन न पकडता बॉम्बे सेंट्रलमधून बाहेर येऊन टॅक्सी केली. 58 रुपयांमध्ये महालक्ष्मीमधील नेहरू सायन्स सेंटरला टॅक्सीने सोडले. 11 वाजता 25 रुपये माणसी तिकीट काढून नेहरू सायन्स सेंटरमध्ये प्रवेश केला.

नेहरू सायन्स सेंटर :


 इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रीकल म्हणजे काय?, भूकंप कसे होतात?, शॉक कसा बसतो, पृथ्वी गोल आहे काय? सूर्यमाला कशी आहे? ती कशी फिरते? अॅम्पिअर, व्होल्ट काय आहे?  वेग, अंतर, दाब कसं मोजतात? आपल्याला दिसतं कसं? प्रकाशाचा वेग काय आणि कसा असतो?  अशा प्रश्नांची उत्तरं देणारं शास्त्न म्हणजे विज्ञान आणि या विज्ञानाची प्रात्यक्षिके स्वत: करायला मिळणो म्हणजे आनंदच. येथे विज्ञानाची गंमत-जंमत अनुभवण्यासाठी विविध प्रकारचे एकूण  11 मोठी दालने आहेत. त्यातील प्रत्येक दालतना विज्ञानाचे छोटे छोटे प्रयोग करायला मिळतात. लहान मुलांचं कुतूहल किंवा चौकस बुद्धी मोठी असते. ती अजून वाढवावी यासाठी या सायन्स सेंटरची निर्मिती केली आहे. लहान असताना एकदा येथे गेलो होतो. आज बरेच वर्षानी नेहरू सायन्स सेंटरला हे सर्व पाहण्यासाठी गेलो.
 सकाळी 11.15 ला येथे पोचलो. वाटतेच सी सॉ, झोपाळा असलेलं गार्डन आहे. ही विज्ञानाची बाग आहे ही. तिथून थोडंसं पुढे गेलो तर पूर्वीच्या काळी  इलेक्तिट्रक इंजिन, वाफेचं इंजिन, स्टीम लॉरी, घोडय़ांची ट्रामगाडी, इलेक्ट्रिक ट्राम, लढाऊ विमान ठेवलेले दिसले. मुख्य इमारतीकडे जाण्यापूर्वी विज्ञान क्षेत्रत मोठी कामगिरी केलेले जगदीशचंद्र बोस, श्रीनिवास रामानुजन, चंद्रशेखर वेंकटरमण, सत्यंद्रनाथ बोस, होमी जहांगीर भाभा अशा काही शास्त्रज्ञांची अर्ध पुतळे उभारले आहेत.
‘विज्ञान ओडिसी’ नावाची एक नवीन रंगीत इमारत दिसली. येथे थ्रीडी सिनेमा पाहायला मिळतात. मात्र, त्याचे वेगळे तिकीट काढायला लागते. ते येथेच उपलब्ध असते.
एक टाचणी तळहाताला जोरात टोचली तर टोचते. मात्र, अनेक टाचण्या घेऊन त्या एकत्रितरित्या टोचल्या तर त्या टोचत नाहीत. या संबंधी टाचणाचा येथे प्रयोग आहे. मजा म्हणजे या टाचण्यांना आपण स्वत: हात लावून पाहू शकतो.
‘लाइट अँड साइट’ हे असेच एक दालन कोणतीही वस्तू आपल्या डोळय़ांना कशी दिसते? प्रकाश व रंगाचा संबंध काय? विविध रंग कसे दिसतात? ध्वनीचा आपल्या मेंदूवर कसा परिणाम होतो किंवा आवाज आपल्याला कसा ऐकायला येतो?  हे ‘साऊंड अँड हिअरिंग’ दालनात पाहायला मिळाले. स्पर्शाचं, वासाचं, चवीचं ज्ञान कसं होतं, जिभेवर कुठल्या ठिकाणी कुठल्या चवीचे ज्ञान होते. याचे बटण दाबून मोठय़ा जिभेच्या प्रतिकृतीवर लाईटींग होऊन आपल्याला पाहायला मिळते.  याविषयीची मानवी शरीराच्या संदर्भातील काही महत्त्वपूर्ण माहितीही या ठिकाणी मिळेल. ‘सायन्स फॉर चिल्ड्रन’ या गॅलरीत साबणाचे बुडबुडय़ांसारखे काही मजेशीर प्रयोग करून छोटय़ा छोटय़ा प्रयोगांतून विज्ञान कळत जाईल.
अवर टेक्नॉलॉजी हेरिटेज.’ त्यात शून्याचा शोध कसा लागला? पायथागोरस सिद्धान्त, वर्तुळाचं क्षेत्रफळ कसे? पूर्वीच्या मूळ गणिताविषयी, तसेच अन्य मानवी संबंधाविषयी या ठिकाणी माहिती आहे. संगणकाचा शोध कसा लागला. टायपराईटरचा शोध,  ‘प्रिहिस्टॉरिक अॅनिमल लाइफ’ यात प्रागेएतिहासिक काळातील डायनोसर व बुली मॅमथ (हत्ती) पाहून मोठे आश्चर्य वाटते. या दालनात या प्राण्यांचे आवाज येत असतात.
वेळ कमी असल्याने भराभरा पाहता येतील तेवढी विज्ञानावर आधारित प्रयोग पाहत गेलो.












  •  येथे जाण्यासाठी महालक्ष्मी स्टेशनवर 10 मिनिटात टॅक्सीने जाता येते. टॅक्सीभाडे 15 रुपये पडते.
  •  येथून जवळच महालक्ष्मीचे मंदिरही आहे.
  •  नेहरू सायन्स सेंटर हे वर्षातील सर्व दिवस सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेर्पयत उघडे असते. फक्त होळीच्या दुस:या दिवशी आणि दिवाळीत काही दिवस बंद असते.
  • तिकीट दर : 25 रुपये प्रत्येकी
  • http://www.nehrusciencecentre.org

कॉपी करू नका