Sunday, November 18, 2018

चौर्यांशी बंदरी एैसी जागा नाही : सिंधुदुर्ग किल्ला




‘चौर्यांशी बंदरी एैसी जागा नाही’, असे ज्या किल्याचे वर्णन छत्रपती शिवाजीमहाराजांनी केले तो म्हणजे मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ला. ज्याची समुद्रावर सत्ता असेल तो आजुबाजूच्या प्रदेशावरही सत्ता व व्यापार करू शकतो. हे ओळखलेल्या शिवाजी महाराजांनी हा किल्ला उभारला. मुरुडच्या जिंजिºया किल्याच्या तोडीसतोड असलेला हा किल्ला. सिंधुदुर्गाची बांधणी अप्रतिम अशी करण्यात आली आहे. अतिशय छोट्या छोट्या गोष्टींचा किल्ला बांधताना विचार केला आहे. त्या विषयी....


            मालवणच्या समुद्रात असलेल्या ‘कुरटे’ बेटावर खडक, चारही दृष्ट्या मोक्याची जागा व त्यावर असलेली गोड्या पाण्याची सोय या गोष्टी पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी आज्ञा केली की, या जागी बुलंद किल्ला वसवावा चौºयांशी बंदरी ऐशी जागा नाही! आणि ‘सिंधुदुर्ग’ नावाचा सागरी अभेदय किल्ला साकार झाला.  छत्रपतींनी बांधलेल्या या किल्यामुळे मराठ्यांच्या नौदलाला एक मोठे बळ मिळाले. कारण तोपर्यंत समुद्रावर केवळ इंग्रज, पोतुर्गीज, डच, आदिलशहा, सिद्दी व पोतुर्गीज, चाचे यांचाच वचक होता. 
‘अठरा टोपीकरांचे उरावर शिवलंका अजिंक्य जागा निर्माण केला. सिंधुदुर्ग जंजिरा, जगी अस्मानी तारा जैसे मंदिराचे मंडन, श्रीतुलसी वृंदावन राज्यास भूषणप्रद अलंकार चतुर्दश महारत्नांपैकीच पंधरावे महाराजांस प्राप्त झाले’ या चित्रगुप्ताच्या बखरीतील मजकूर सिंधुदुर्ग किल्याचे महत्त्व खरोखरच आजही आपल्या पहावयास मिळते.
           अफजलखानाला मारल्यावर छत्रपतींनी आदिलशहाची ठाणी काबीज केली. महाराज त्यानंतर मालवण किनाºयावर आले. त्यावेळी कोकणाची स्थिती अत्यंत भयानक होती. आदिलशहा, सिद्दी व पोर्तुगीजांचे जबरदस्तीने होणारी धर्मांतरे, अमानुष अत्याचार, फुटणारी देवळे, स्त्री-पुरुषांना पकडून परदेशात गुलाम म्हणून होणारी रवानगी हे  प्रकार रोजचेच होत होते. या सर्वांना कुठेतरी खीळ बसावी यासाठी महाराजांनी किल्ला बांधणीची मुहूर्तमेढ रोवली. 
           २५ नोव्हेंबर १६६४ ला किल्ला बांधणीस सुरूवात झाली तर २९ मार्च १६६७ मध्ये किल्ला पूर्ण झाला. दि. २४ नोव्हेंबर १६६४ ला मालवणच्या किनाºयावरील ‘मोर्याचा धोंडा’ या खडकावर गणेश, शिवलिंग, सूर्य-चंद्र आणि नंदीची शिल्पं कोरून गणेशपूजनाचा सोहळा पार पडला. सिंधुदुर्गाच्या या बांधकामासाठी त्याकाळी एक कोटी होन एवढा खर्च आला. छत्रपतींनी यासाठी अख्खी सुरत लुटली. त्या लुटीतून रायगडचे स्थापत्यकार हिरोजी इंदूलकर यांच्या देखरेखीखाली स्वराज्याची शिवलंका आकार घेऊ लागली. स्वत: महाराजांनी, जिजाऊ माँसाहेबांनी या बांधकामात लक्ष घातले होते. दरम्यानच्या काळात महाराजांना आगºयाला जावे लागले. औरंगजेबाने महाराजांना नजरकैद केले. या बातम्या सर्वत्र पसरल्या होत्या. परंतु किल्याचे बांधकाम जिजाऊसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. 

           मालवणपासून सुमारे दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या या कुरटे बेटावरील सिंधुदुर्ग किल्लयावर जाण्यासाठी होडीतून प्रवास करावा लागतो. ९० रुपये प्रति व्यक्ती असे या होडीचे जाऊन-येऊन भाडे आहे. १२ वर्षांखालील मुलांना ५० रुपये असा दर आहे. येथे सुमद्र शांत, सुंदर व स्वच्छ पाणी असल्याने आजुबाजूचा परिसरही देखणा आहे. लहान-लहान होड्या, नारळाची झाडे, नीळे पाणी असे पाहत आपण सुमारे दहा ते पंधरा मिनिटातच किल्याच्या प्रवेशाद्वारासमोर येऊन पोहचतो. प्रवेशद्वारातून आत जाताना ‘छत्रपती शिवाजीमहाराज की जय...’, ‘जय भवानी जय शिवाजी...’’ अशा घोषणा देत अनेक पर्यटक किल्यात प्रवेश करतात. समुद्राच्या आत ऐवढा मोठा किल्ला व त्यावर एवढे पर्यटक पाहून आपणही आश्चर्यचकित होऊन जातो. आत गेल्यावर किल्याची माहिती सांगण्यासाठी खासगी गाईड आपले स्वागत करतात. खरेतर स्वत:हून किल्ला पाहण्यात आनंद आहे. पण ज्यांना किल्याची व इतर माहिती माहित नसते त्यांनी या गाईडचा आधार घेतला तर काहीच हरकत नाही. ५ जणांसाठी २०० रुपये घेऊन आपल्याला ते किल्यातील महत्त्वाच्या गोष्टी, किल्याचा इतिहासाबद्दल माहिती सांगतात. 

                   मुख्य दरवाज्याची बांधणी दोन बुरुजांच्या बांधणीतून केली आहे. सहजरित्या शत्रंूला दरवाजा कोठे आहे हे न समजण्यासाठी असे बांधकाम केलेले आहे. शत्रूने जर हल्ला केला. तर त्याने केलेल्या तलवारीचा वार हा आपल्यावर थेट न घेता तो वार बुरुजावर जाईल मात्र, आपण किल्याच्या आतून केलेला वार मात्र, त्याच्यावर थेट होईल. प्रवेशद्वारावर पोहचोस्तोवर येथील दरवाजाचे अस्तित्वच दिसत नाही. संपूर्ण किल्याला हेच एकमेव प्रवेशद्वार आहे. वरील बाजूस जांभ्या दरवाजाचा नागरखाना असून, शत्रू आल्यास नगारा वाजवून संपूर्ण किल्यावर संदेश देण्यासाठी याचा वापर होई.  सध्या जरी येथे बोटी येण्यासाठी धक्का बांधला असला तरी पूर्वीच्याकाळी समुद्राच्या लाटांमध्ये किल्यात प्रवेश करणे अवघड जात असावे हे नक्की. संपूर्ण किल्ला सुमारे ४८ एकरात बांधलेला असून, ४ ते ५ किलोमीटरची तटबंदी आहे. २० ते ३५ फूट उंचीची तंटबंदी आहे. तटबंदी ८ ते १० फुट रुंद आहे. दक्षिणमुखी मारुती दरवाज्यातच आहे. प्रवेशद्वारासमोरच जरवरी मातेचे मंदिर हे येथील प्रसिद्ध मंदिर आहे. जर म्हणजे आजार आजारांवर मात करणारी ही माता आहे. २५ नोव्हेंबर १६६४ ला किल्ला बांधणीस सुरूवात झाली तर २९ मार्च १६६७ मध्ये किल्ला पूर्ण झाला. आजच्या काळात किल्ला बांधण्यास ३२ हजार कोटी खर्च आला असता. प्रवेशद्वारानंतर काही अंतरावर छत्रपती शिवाजीमहाराजांचे मंदिर आहे. छत्रपती राजाराम महाराजांनी शिवाजीमहाराजांची मूर्ती स्थापन केली आहे. या शिवराजेश्वर मंदिरात छत्रपती शिवाजीमहाराजांची मूर्ती असून, अंगवस्त्र चढवलेली आहेत. हातामध्ये कडा, डोक्यावर चंद्राची कोर, भवानी तलवारीची प्रतिकृतीची तलवार येथे ठेवण्यात आली आहे. मंदिरात फोटो काढण्यास बंदी आहे. १९०७ मध्ये कोल्हापूरचे शाहूमहाराजांनी सभामंडपाचे काम पूर्ण केले. संध्याकाळी येथे महाराजांना नौबत वाजूवन मजुरा करण्याची प्रथा आहे.  किल्यावर महाराजांच्या वेळी किल्याची देखरेख करण्यासाठी असलेली काही कुटुंबे आजही राहतात.  गडावर १८ कुटुंबांची वस्ती आहे. सपकाळ, सावंत, भोसले, जैन, यादव, पडवळकर, फाटक, वैंगणकर, मजुवर अशी वस्ती आज देखील येथे राहते. गडावर त्यांची सध्या ९ वी पिढी राहत आहे.  तसे किल्यावर सूर्यास्तानंतर एतरांना राहण्याची परवानगी नाही. 
           
           

किल्याचे बांधकाम : 

           शिसे, चुना, वाळू, गुळ, उडीद, भेंडी अशा पदार्थांच्या वापरातून तटबंदीच्या वापरासाठी केला आहे. शिसेच्या वापर पाया भरणीसाठी केलेला आहे. गडावर धान्य कोठार देखील आहे. नागमोडीच्या आकाराची तटबंदी पाहण्यासारखी आहे. सुमारे ५२ बुरूज येथे उभारलेले आहे. तटबंदीतच ४० शौचकुपे देखील बांधलेली आहेत. इतक्या मोठ्या संख्येने असलेली शौचकुपे इतरत्र आढळत नाहीत.  तटबंदीवरून आपल्याला गडाची प्रदक्षिणा पूर्ण करता येते. पूर्वी प्रवेशद्वारातून पुढे डाव्या हाताला एक आगळेवेगळे नारळाचे झाड होते. विशेष म्हणजे या झाडाला दोन फांद्या होत्या आणि दोन्ही फांद्यांना नारळ लागलेले असायचे.  परंतु २००७ च्या पावसाळ्यात त्यावर वीज पडून ते झाड मेले. आणी आता मात्र, तेथे काहीही नाही. दुर्देव. 
  









गडावर शंकराचे एक मंदिर असून, पूर्वी या ठिकाणी गुप्त विहीर होती. जी समुद्राखालून सुमारे ८ किलोमीटर अंतरावर असलेल्या ओझर या ठिकाणी जात असे. मात्र, सध्या ती विहिर बंद करण्यात आली असून, केवळ वरूनच आपल्याला त्याचे दर्शन घडते.  तटबंदीवरून आपल्याला गडाची प्रदक्षिणा पूर्ण करता येते. पण वेळे अभावी आपल्याला ती शक्य होत नाही.  गडावर आपल्याला नाष्टा, पाण्याची सोय होते.


दहिबाव, दूधबाव व साखरबाव 

किल्याचे वैैशिष्ट्य म्हणजे चारही बाजूने समुद्राचे खारे पाणी असून देखील आतमध्ये गोड्या पाण्याची तीन विहिरी आहेत. आजही या गडावर येथील स्थानिक लोक हेच पाणी पितात. या तीनही विहिरींची नावे सुद्धा फारच गोड आहेत. दहिबाव, दूधबाव व साखरबाव अशी त्यांची नावे आहेत. पंचामृतामध्ये असलेल्या या तीन गोष्टींमुळे अजूनच गोडवा तयार होतो. तिन्ही विहिरींना शंकराच्या पिंडीचा आकार दिलेला आहे. असा आकार देण्याचे कारण म्हणजे एक तर शिवाजीमहाराज शिवभक्त होते. व दुसरे कारण म्हणजे शिवलिंगआकाराने सूर्याची किरणे थेट पाण्यात पडत नाही. व त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवनही लवकर होत नाही. संपूर्ण जांभा दगडामध्ये असलेले बांधकाम आहे. गडावर ताराराणी व राजाराम याचा वास्तव्य असलेला एक वाडा होता. मात्र, त्याची दुरवस्था झाली आहे. बिट्रीशांनी येथील राजवाडा तोडून भुईसपाट केलेला आहे. महाराजांची स्फूर्ती घेऊन पुढे कोणीही महाराजांसारखे कर्तृत्व करू नये यासाठी इंग्रजांनी केलेली ही सोय होती. गडावर भवानी मातेची मूर्ती असून, काळ्या पाषाणाची ही मूर्ती आहे. निशाण काठी म्हणून येथे एक जागा आहे. ही किल्याची सर्वात उंच असलेली जागा याला टेहळणी बुरूज म्हणून देखील म्हणतात. सभोवताली नजर ठेवण्यासाठी याचा वापर केला जाईल. नुसत्या डोळ्यांनी देखील वेंगुर्ला परिसर, मालवण परिसर, निवतीचा किल्यापर्यंत नजर ठेवता येई.  











      प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला असलेल्या तटबंदीवर एका छोट्याश्या जागेत छत्रपती शिवाजीमहाराजांच्या हाताचा व पायाचा ठसा जतन करून ठेवला आहे. किल्ला संपूर्ण बांधल्यावर तो पाहण्यासाठी आलेल्या महाराजांनी हिरोजींना किल्ला बेलाग उभारल्याबद्दल बक्षीस देऊ केले. हिरोजींनी देखील बक्षीस म्हणून काय मागितले ? सोने, पैैसे नाही तर चक्क  महाराजांच्या हाताचा व पायाचा ठसा मागितला. केवढे मोठे बक्षीस?  हिरोजी इंदुलकरांनी महाराजांकडे काय मागितलेले अवघड आहे ना. नाहीतर एवढा किल्ला बांधल्यावर स्वत:साठी काही तरी मागून दुसºया एखाद्याने स्वत:चे पोट भरून घेतले असते. ना पैैश्यांची अफरातफर, ना बांधकामामध्ये भेसळ, ना टक्केवारी, ना टेंडरची फिरवाफिरवी. असली माणसे महाराजांना कशी काय भेटली असतील ना....














खंत :  

सध्या मुंबईत समुद्रात छत्रपती शिवाजीमहाराजांचा आश्वारुढ भव्य, उंच असा पुतळा उभारण्याचे सरकारचे स्वप्न आहे. मी हा पुतळा बांधण्याच्या विरोधात आहे.  पुतळा उभारण्यासाठी कितीतरी कोटी रुपये खर्च होईल आणि एवढे पैसे खर्च करून काय मिळणार आहे? एकीकडे छत्रपतींचे भव्य दिव्य पुतळे उभारायचे व दुसरीकडे छत्रपतींचे प्रेम असलेल्या गड किल्यांची दुरवस्था होत असताना पाहायची यासारखे दुर्देव्य नाही. शिवस्मारकावर ही उधळपट्टी करण्याऐवजी छत्रपतींनी बांधलेल्या महाराष्ट्रातील किल्यांची ढागडुजी, ढासळलेली तटबंदी पुन्हा बांधली, योग्य ते मार्गदर्शक (गाईड) ठेवले तर शिवरायांनी घडवलेला इतिहास पुन्हा एकदा आजच्या व पुढच्या पिढीला नक्की कळेल. यातूनही चांगले पर्यटन घडेल. या किल्यांची दुरुस्ती केल्यानंतर मग खरच बांधा शिवाजीमहाराजांचा आश्वारुढ पुतळा. हेच महाराजांना अपेक्षित असेल ना...



कसे जावे : 

  • पुण्याहून : कोल्हापूर मार्गे सुमारे गगनबावडा मार्गे सावंतवाडी व तेथून मालवण : ४१० किलोमीटर 
  • मुंबईहून पेण, पनवेल, चिपळूण, लांजा, सावंतवाडी, मालवण.  : ४८१ किलोमीटर
  • मुंबई - पुणे - कोल्हापूर - मालवण : ५३३ किलोमीटर 


राहण्याचे ठिकाण : 

  • तारकार्ली बिचवर एमटीडीसीची निवास्थाने आॅनलाईन बुकिंग करता येऊ शकतात. एसी / नॉन एसी सुमारे २ ते ३ हजार रुपये एक दिवसासाठी असा दर आहे. या शिवाय मालवण परिसरात स्थानिक लोकांच्या घराच्या परिसरात त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या खोल्यांमध्ये राहण्याची व जेवण्याची सोय होते. अंदाजे १ ते २ हजार रुपये असा एका दिवसाचा खर्च आहे.

  • मालवण ते सिंधुदुर्ग किल्ला बोटीने : ९० रुपये प्रौढांसाठी तर ५० रुपये १२ वर्षांखालील.
  • पार्किंगसाठी : ५० रुपये कार


या शिवाय : 

  • स्कुबा ड्राव्हिंगचा अनुभवही आपण या ठिकाणी घेऊ शकतो. माणसी ६०० रुपये असा खर्च आहे. 

वरील लेख आपल्याला कसा वाटला या विषयी येथे जरूर लिहा.....

Friday, November 16, 2018

बारा मोटांची विहिर




सर्वसाधारपणे विहीर म्हटली की आपल्या डोळ्यापुढे गोल आकाराची सुमारे १५ फुट व्यास असलेली व १०० फुट खोल अशी वर्तुळाकार आकार डोळ्यासमोर येतो. एक रहाटाने पाणीवर ओढण्यासाठी तजवीज केलेली असते.  पण सातारा शहराच्या उत्तरेस १३ किमी अंतरावर कृष्णानदीच्या तीरावर लिंब नावाचे गाव आहे. या गावात बारा मोटेची अष्टकोनाकृती आणि शिवलिंगाकृती विहीर आहे.  



सातारा जिल्ह्यातल्या लिंबगावात सुमारे ३०० वर्षे जुनी बारामोटेची विहीर  आहे. इ.स.वी.सन. १७१९ ते १७२४ या दरम्यान छत्रपती शाहूमहाराजांची पत्नी वीरुबाई यांनी ही अष्टकोनी दगडी विहिर बांधल्याचं सांगितल जाते. सुमारे १०० फूट खोल आणि ५० फुट रुंद असा या विहिरीचा आकार आहे. विहीरीचे बांधकाम हेमाडपंती आहे. विहीर बांधताना दगड एकमेकांना जोडण्यासाठी चुना सिमेंट अशा कोणत्याही गोष्टीचा वापर केला नाही. संपूर्ण दगडातून अतिशय कोरीव शिल्प उभं केलं आहे.  येथील स्थानिकांसाठी पाण्याचा एक चांगला मार्ग आहे. शाहूमहाराजांनी येथे ३३०० आंब्याची कलम लावून इथे मोठी आमराई तयार केली होती. 
या विहिरीच्या वर राजमहाल बांधलेला आहे. या विहिरीतूनच चोरवाटेने या महालाकडे जाणाºया दगडी पायऱ्या आहेत. या महालाला मध्यभागी चार खांब आहेत, प्रत्येक खांबावर वेगवेगळीशिल्पे कोरलेली आहेत.  विहिरीच्या भिंतीवर व्याल आणि शलभ शिल्पे कोरली आहेत.  व्याल म्हणजे वाघाचे तोंड आणि सिंहाचं शरीर. ही शिल्पे राज्याची समृद्धी आणि पराक्रम सांगतात. विहिरीच्या दक्षिणकडील भिंतीवर ४ हत्तींवर आरूढ झालेल्या वाघाचं शिल्प हे मराठ्यांचे दक्षिणेतील  वर्चस्व प्रदर्शित करते आणि उत्तरेकडे असलेली झेपावणारी व्याघ्र शिल्पं पुढच्या उत्तरेकडील मोहिमेचा संकेत देतात. 


विहिरीत सुरुवातीला उतरतानाच मोठी दगडी कमान दिसते. उतरायला दगडी पायºया आहेत. कमानीतून उतरल्यानंतर आपण उप विहिरीत जातो. उप विहिरीला तळापर्यंत जाणाºया पायºया आहेत.  अष्टकोनी विहीरीच्या प्रत्येक कोनात नागदेवतेची मूर्ती आहे. विहीरीतील वरील बाजूच्या छोट्याश्या जागेत कमळ, हत्ती, गणपती, मारुती ही शुभ चिन्हं कोरली आहेत. महालाच्या दुसºया मजल्यावर जाण्यासाठी दोन चोरवाटा आहेत. विहीर आणि तिच्यावर बांधलेला महाल हा शिवकालीन स्थापत्यकलेचा एक उत्तम नमुना म्हणता येईल. मुख्य विहीर अष्टकोनी असून जोडून आयताकृती दुसरी विहीर तयार केली आहे.  या दोन्ही विहिरींना जोडणारी दुमजली इमारतीमध्ये एक महाल आहे. 




या विहिरीवर १५ मोटांची जागा आहेत. पण, प्रत्यक्षात १२ मोटाच सुरू होत्या.   यावरूनच या विहिरीला बारामोटेची विहीर हे नाव पडले असावे.  विहिरीतील पाणी खेचण्यासाठी बैैलांच्या जोडीचा वापर केला जाई. त्या गाडीची दगडी चाके अजूनही आहेत.  इतिहासातील अनेक घटनांची साक्षीदार असणारी ही बारामोटची विहीर आवर्जून पाहायला हवी. सदरची जागा साताºयाचे उदयनराजे भोसले यांची ही खासगी मालमत्ता असल्याचा फलक ही या ठिकाणी आपणास पहावयास मिळतो. 













विहीरीच्या बाहेर स्थानिकांनी घरी तयार केलेली सेंद्रीय हळद, कांदा, कडधान्ये, पालेभाज्या, सातारातील गरम मसाला, कांदा लसूण मसाला, ओली हळद आदी वस्तू पर्यटकांना स्वस्त दरात विक्रीसाठी ठेवलेल्या आहेत.



कसं जावे : 

  • पुण्याहून साताºयाला जाताना साताºयाच्या अलीकडे नऊ किलोमीटरवर लिंबफाटा आहे. तिथून तीन किलोमीटरवर आत ही विहीर आहे.रस्ता डांबरी असला तरी ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. 
  • तिकीट : १० रुपये प्रति व्यक्ती असे तिकीट आहे.   


Monday, July 16, 2018

तिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) - भाग 3 - कोल्हापूरची अंबाबाई महालक्ष्मी

तिरुपती दर्शन - कोल्हापूरची अंबाबाई महालक्ष्मी 

तिरुपती बालाजी दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपºयातून भाविक जातात मात्र, दर्शन व राहण्याची सोय न केल्यास ही कुठलीही सहल त्रासदायक ठरते. एकतर तेथील भाषा वेगळी त्यात आपल्याला तेथील लोक सहकार्य करत नाहीत ही एक गोष्ट. मग लोकांना विचारत अथवा ट्रव्हल एजन्सीचे भरमसाठ पॅकेज घेत आपण ट्रिप करतो.यावेळी बालाजी दर्शनासाठी दर्शन, राहण्याची व जाण्या येण्याची सोय आधीच केल्याने दर्शन छान झाले. इतरांना तिरुपती बालाजी सहल सुलभ व्हावी यासाठी हा छोटा लेख....



पुण्यातून रात्री १२.१० च्या चेन्नई एक्सप्रेसने रेणुगुंठा या ठिकाणी सायंकाळी ५ ला उतरलो. तिरुपतीला जाण्यासाठी पुण्यातून पाच ते सहा रेल्वेगाड्या आहेत. आपल्या सोईनुसार रेल्वेचे ४ महिने आधी बुकिंग केल्यास सोयीचे ठरते. शक्यतो रात्रीचा प्रवास असल्यास वेळ पटकन निघून जातो. नाहीतर १८ ते १९ तास रेल्वेत बसून कंटाळा येतो. रेणुगुंठा येथे उतरून तिरुपती येथील बालाजी संस्थानच्या लॉजवर जाण्यासाठी निघालो. या ठिकाणी तिरुपती संस्थानतर्फे  भाविकांसाठी अल्पदरात राहण्याची सोय उपलब्ध असते. रिक्षावाल्याला सांगून देखील त्याने स्टेशनजवळच्या विष्णू निवासमवर न नेता दुसºयाच निवासावर आम्हाला नेऊन सोडले. तेथे चौकशी केल्यावर हे ते नव्हे असे कळले. रेल्वे स्टेशनजवळच्या निवासस्थानाकडे जाण्यासाठी पुन्हा बाहेर येऊन आम्ही रिक्षा केली. विष्णू निवासम्ची ही इमारत तिरुपती रेल्वेस्टेशनसमोरच असून, सुमारे दोन हजार रुम्स भाविकांसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. आधिच बुकिंग केल्यास येथे राहण्याची अल्पदरात सोय उपलब्ध होते. आम्हाला मिळालेली रुम अतिशय स्वच्छ होती. दोन बेड, चादर, उश्या, संडास बाथरूम, आंघोळीसाठी गरम पाणी, फॅन अशा सर्व सोयींनीयुक्त असलेली ही रुम्स आधी दोन महिने बुक करावी लागते. सुमारे ३०० रुपयात आपल्याला ही उपलब्ध होते. याच इमारतीत असलेल्या हॉटेलमध्ये सायंकाळचे जेवण करून आम्ही पद्मावती मंदिर व इॅस्कॉनचे मंदिर पाहण्यास निघालो.


भक्तनिवासातून ८ ला खाली आलो. बाहेरील उभ्या असलेल्या रिक्षा स्टँडवरून रिक्षा केली. ४०० रुपयांत इस्कॉन व पद्मावती मंदिर दाखवून परत सोडण्याचे ठरवले. पद्मावतीचे मंदिर रात्री ९ नंतर बंद करण्यात येते. खरेतर बालाजीचे दर्शन घेऊन झाल्यावर पद्मावती देवीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. मात्र, दुसºया दिवशी वेळ नसल्यामुळे आम्ही दर्शन आदल्या दिवशीच घ्यायचे ठरले. दर्शन घेतल्यानंतर थोडा वेळ तेथील दुकानांमध्ये खरेदी केली. रिक्षा ड्रायव्हरने वेळेत आम्हाला या ठिकाणी नेऊन सोडले होते. कारण दर्शन रांगेत उभे राहणाºयांमध्ये आम्ही शेवटचेच होतो. ९ नंतर दर्शनरांगा बंद करण्यात आल्या.  पद्मावती देवीचे दर्शन घेऊन आम्ही परत आमच्या निवासस्थानी आलो.







दुसºया दिवशी सकाळी ८ ला आवरून तिरुमला डोंगरावर जाणाºया बसमध्ये बसलो. या बसचे तिकीट भक्तनिवास स्थानाच्या बाहेरच्या पॅसेजमध्ये दिले जाते.
विष्णू निवासम्च्या गेट बाहेर तिरुमलावर जाण्यासाठी शासकीय बस उपलब्ध असतात. ५३ रुपये प्रौढांसाठी तर लहान मुलासांठी २९ रुपये असे गाडी भाडे आहे. रिटर्नचे तिकीट काढल्यास माणशी १० रुपये कमी पण होतात. या शिवाय खासगी बस, जीप उपलब्ध असतात. मात्र, त्यांचे भाडे मनमानी असते. मनात येईल तो आकडा सांगून ते मोकळे होतात. थोडी तडजोड करता येते. खासगी जीपचा एक फायदा असा होतो की आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी थांबून वाटेतील स्थळे पाहता येतात. पण तसे ड्रायव्हरशी बोलावे लागते. तिरुमलावर जाण्यासाठी असलेल्या मुख्य डोंगरच्या खाली प्रवाशांची व बॅगांची यंत्राद्वारे तपासणी केली जाते. यासाठी शक्यतो कमी बॅग घेऊन जाणे आवश्यक असते. आम्ही रुमवरच बॅगा ठेवल्याने त्रास झाला नाही. तिरुमलावर जाण्यासाठी प्रशस्त रस्ता असून, २५ किलोमीटर वर तिरुपतीचे मंदिर आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला घनदाट झाडी असल्याने वातावरण उन्हाळ्यातही थंड होते. सुमारे दीड तासातच आम्ही वर पोहचलो.  वर व खाली उतरण्यासाठी वेगवेगळे  रस्ते आहेत. घाट मार्गाने आम्ही  साडे नऊला वर पोहचलो. वरती डोसा, इडली खाऊन कल्याण कट्टावर गेलो.



कल्याण कट्टा :
बालाजीसाठी डोक्यावरचे केस काढणे ही प्रथा आहे. या केसांचाही पुढे मोठा आर्थिकदृष्ट्या वापर केला जातो. यातून बरेच पैैसे कमवले जातात. असो. तर कल्याण कट्टा येथे मोठी इमारत असून, यात महिला व पुरुष, लहान मुले असे भक्त आपले केस कापून देवाला अर्पण करतात. यासाठी छोट्याश्या रांगेत उभे राहून आपल्याला एक कुपन  व ब्लेड देण्यात येते.  कुपनवर न्हावी व खोली क्रमांक दिलेला असतो. त्या-त्या नंबरच्या खोलीत प्रवेश करून केस काढणाºया नाव्हासमोर जाऊन उभे राहायचे. मग तो आपल्याला केस भिजवून येण्यास सांगतो. थोड्याच वेळात मान खाली घालून खराखरा करून डोक्यावर वस्ताºयाने केस उतरवले जातात. या न्हाव्याकडून केस काढताना पैसे मागितले जातात. त्याला आपण होकार दिला तर ठिक नाही तर डोक्यावर एखाद दोन वार करून  डोके काहीप्रमाणात रक्तबंबाळ केले जाते. संस्थानकडून न्हाव्याला पैसे न देण्याबाबत सूचना केलेल्या आहेत. मात्र, येथे गुपचूप पैसे  घेतले जातात. पैसे मागण्याची ही प्रथा ‘खुशी’ या नावाने ओळखली जाते. अगदी मोबाईल, चप्पल जमा करण्याच्या ठिकाणी सुद्धा येथील कर्मचारी १०, २० रुपयांची ‘खुशी’ मागतात. मी मात्र, त्यांना ‘खुश’ न करताच माझे काम काम करून घेतले. केसं उतरविल्यानंतर खालील बाजूस असलेल्या बाथरूममध्ये आंघोळ करून कपडे बदलून आम्ही बालाजी दर्शनासाठी पुढे गेलो.



आम्ही दोन महिने आधि आॅनलाईन दर्शनासाठी पास काढला होता. ३०० रुपये प्रती माणशी असे हा पास असतो. यात प्रसादासाठी २ लाडू देण्यात येतात.   दर्शनाची वेळ  सकाळी ११ वाजता होती. पास चेक करण्याअगोदर  स्त्री व पुरुषांनी ठराविक ड्रेस परिधान करणे गरजेचे असते. तश्या सूचना अगोदरच दिलेल्या असतात. मात्र, गडबडीत जीन्स पॅन्ट व ओढणी न घेता गेल्यास दरवाजातच अडवून बाहेर बाजूस असलेल्या विक्रेत्याकडून ओढणी व पंचा विकत घ्यावा लागतो. दर्शन रांगेत ११ वाजता उभे राहून आम्ही पुढे गेलो. वाटेत आपल्याकडील बॅगा व मोबाईल तेथील काउंटरवर जमा कराव्या लागतात. त्यांच्याकडून तशी पावती आपल्याला मिळते. ही सुविधा मोफत आहे. तरी पण येथे ‘खुशी’ मागणारे कमी नाहीत. पैसे देण्याची गरज नाही. या पास शिवाय मोफत दर्शन घेणारे व अजून १००० रुपये देऊन विशेष पास घेणारे असे सगळेच जण वेगवेगळ्या मार्गाने या रांगेत पुढे आपल्याला येऊन मिळतात. बºयाचश्या फरकाने येथील भक्तांना पैैश्याच्या जोरावर दर्शन घेणे सोपे जाते. जितके पैैसे पाससाठी जास्त तितके लवकर दर्शन. नाहीतर मोफत पास घेणाºयांना २४ ते ३६ तास हुंडीत बसणे भाग पडते. मागे दोन वेळा हा अनुभव घेतला होता. गदीनुसार साधारणपणे ४ ते ५ तर कधी २४ तासांनी सुद्धा दर्शनाचा लाभ घेणारे भाविक येथे पहायला मिळतात. या आधिच्या ट्रिपमध्ये दर्शनासाठी आम्ही ८ तास घालवले होते. सुमारे १ तास रांगेत चालल्यानंतर आम्ही मुख्य मंदिरात येऊन पोहचलो. अगदी ५ ते १० सेकंदातच समोर बालाजीची आकर्षक मूर्ती डोळ्यांसमोर येते. डोळे मिटून उघडेस्तोवर आपण पुढे सरकलेले असतो. झाले एकदाचे दर्शन. मंदिराच्या परिसरातील भिंतीवर जुन्या तमिळ भाषेतील कोरीव लेख दिसतात. कोरीव काम आपल्याकडील मंदिरा इतके पहावयास मिळत नाही. जमिनीवर एक प्रकारचा तेलकट प्रकार पायला लागतो. काय आहे ते पाहिल्यास वातावरणातून उडत आलेले तूप असते. भाविकांना देण्यात येणाºया साजूक तुपातील लाडू बनविण्याचे केंद्र मंदिरा बाहेर असल्याने येथे जमिनीला व वातावरणात एक प्रकारचा सुगंध दरवळत असतो. मंदिराच्या आवारात आपल्याला द्रोणात गरम भात प्रसाद म्हणून दिला जातो. एकंदरीतच येथील भक्तीमय वातावरण, बालाजीला पाहण्यासाठी अबालवृद्धांची सुरू असलेली चढाओढ, गर्दी, लोकांच्या भावना यातून आपण कुठेतरी सावरून मुख्य दरवाज्यातून बाहेर येतो.  येथून पुढे कोणतीही सूचनाफलक नसलेल्या मार्गाने विचारात, गर्दीच्या मागे जात आपण लाडू मिळण्याच्या ठिकाणी येऊन पोहचतो.


अापल्याकडील पासवर असलेल्या लाडूच्या संख्ये इतके लाडू आपल्याला रांगेत उभे राहून मिळतात. विशेष म्हणजे हे लाडू घेण्यासाठी जरी गर्दी होत असली तरी या ठिकाणी प्रसादासाठी अनेक काउंटरर्स उपलब्ध असल्याने ५ ते १० मिनिटातच आपले काम पूर्ण होते. लाडू मात्र, साजूक तुपातला, काजू, बदाम, बेदाणे युक्त असा असतो. अशा प्रकारे प्रसाद मिळल्यानंतर आम्ही मंदिर परिसरातून बाहेर पडलो. आता वेळ होती आमचे मोबाईल व बॅगा घेण्याची. तर बॅगा व मोबाईल जेथे जमा केले तेथे मिळत नाहीत. तर मंदिरापासून काही अंतरावर असलेल्या रस्त्याच्याकडेला असलेल्या एका इमारतीत आपले सर्व सामान आणले जाते. पावती दाखवून आपल्याला मोबाईल सुस्थितीत मिळतात. बॅगा व चपला देखील मिळतात. एवढे फरफेक्ट नियोजन या ठिकाणी असते. याचे आश्चर्य वाटते.

यानंतर वेळ होती ती जेवणाची. दुपाराचा १.३० वाजला होता. परिसरात असणाºया खाद्यविक्रेत्यांच्या स्टॉलवर जाऊन पोळी-भाजी, डोसा, दही भात, उडीदवडे, चायनीज, कोल्डड्रिंक्स असे खाद्यपदार्थ आपल्याला खायला मिळतात. मात्र, उच्चभ्रू सुखसोईनी युक्त असे हॉटेल या परिसरात नाही. त्यामुळे काहीजणांना हे आपण कुठे येऊन असे रस्त्यावर येऊन खातोय असा प्रश्न मनात येतो. पण असा अनुभव कधीतरी घेणे नक्कीच वेगळे ठरते. जेवण करून आम्ही येथील मार्केटमध्ये जाऊन खरेदी केली. बालाजीच्या आकर्षक मूर्ती, महिलावर्गासाठी अभुषणे, दागिने, लहान मुलांसाठी खेळणी असे या मार्केटचे स्वरुप असते. विशेष म्हणजे येथील विक्रेते चक्क आपल्याशी हिंदी संभाषण करतात. कारण धंदा आहे. तेव्हा त्यापुरती त्यांची मातृभाषा थोडी बाजूला ठेवतात.




सायंकाळी ५ वाजता आम्ही बसस्टँडवर येऊन पोहचलो. येथून तिरुपती, वेल्लूर जाण्यासाठी बसेस सुटतात.  गर्दीच्या वेळी या बसेस फॅमिलीसोबत पकडणे मोठे कठीण काम असते. कारण बस येताच बसच्या दोन्ही बाजूकडून माणसे खिडक्यातून आत उड्या मारतात. टॉवेल ठेऊन जागा अडवतात. दरवाज्यामधून जाणे तर फारच कठीण. प्रचंड धक्का बुक्की करत अनेक गाड्या सोडल्यानंतर आम्ही कंडक्टरला विनंती करून उभ्याने प्रवास करण्यास राजी केले. त्यानेही आम्हाला उभे राहण्यास मंजुरी दिली. बस पकडण्यासाठी फारच मोठे दिव्य करावे लागते. पण मजा आली. एक तर त्यांची भाषा वेगळी आपण मराठी भांडणार ते तमिळीमध्ये म्हणजे कोणालाच काही कळणार नाही. नुसताच राडा. सुमारे तासभराच्या प्रवासानंतर  सायंकाळी ६.३० ला तिरुपती निवासस्थावर पोहचलो.

आमचा राहण्याचा कालावधी २४ तासांचा असल्याने निवासस्थानकाच्या कर्मचाºयाने कुलूपावर छोटे कुलूप लावले. विनंती केल्यानंतर अर्धा तास वाढीव मिळाला. आवरून ७ ला खाली आलो. आमची कोल्हापूरला जाण्यासाठीची हरिप्रिया ट्रेन रात्री ९ ची होती. स्थानकाच्या बाहेरील बाजूस असलेल्या हॉटेलमध्ये जेवण करून स्थानकात येऊन बसलो. एक मात्र, जाणवले की येथील स्थानक आपल्या पुण्यातील स्थानकापेक्षा खूप पटीने स्वच्छ असते. प्रचंड गर्दी असूनही रेल्वेस्थानक खूपच स्वच्छ होते. रात्री ९ ला आमचा कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या दर्शनासाठीचा प्रवास सुरू झाला. दुसºया दिवशी दुपारी ४.३५ ला ही गाडी कोल्हापूरला पोहचते. सुमारे १९ तास ३५ मिनिटे व ९०४ किलोमीटरचे अंतर कापून गाडीने आम्हाला कोल्हापूरात सोडले. रेल्वेस्थानकातून रिक्षा करून महालक्ष्मी मंदिर परिसरात असणाºया घरगुती लॉज शोधण्यास रिक्षा ड्रायव्हरला सांगितले. त्यानेही आम्हाला वांगेआळीत नावाच्या परिसरात आणून सोडले. घरगुती लॉज चालविणारे या परिसरात खूपजण आहेत. आम्ही फक्त फ्रेश व दर्शन घेऊन निघणार असल्याचे सांगितल्यावर ५०० रुपयांत मालक तयार झाला. सायंकाळी ८ ला आवरून मंदिराकडे निघालो. मात्र, मंदिरात बाहेरच्या दरवाज्याच्या बाहेर गेलेल्या रांगा पाहून आम्ही लांबूनच महालक्ष्मीचे दर्शन घेतले. तेथून कोल्हापूरचा बाजार पाहत पाहत रांकाळ्याला आलो. सुंदर ठिकाण आहे. आमची पुण्याकडे जाण्यासाठी असणारी गाडी सह्याद्री एक्सप्रेस रात्री १०.५० होती. दोन रात्र तीन दिवस असलेली आमची तिरुपती बालाजी व महालक्ष्मी दर्शनची ही ट्रिप आमच्याबरोबर असलेल्या मित्रांमुळे आणखीच मजा आली.





भाषेचा अभिमान : 

येथील लोकांना त्यांच्या भाषेचा प्रचंड अभिमान पहायला मिळाला. रिक्षा ड्रायव्हर, दुकानदार, किरकोळ विक्रेते सोडले तर हिंदीतून कोणीही बोलत नाही. रस्त्यावर जाणाºया-येणाºया माणसाकडे मदत मागितल्यास ‘नो हिंदी’ असे बजावून सांगतात. हिंदी राष्ट्रभाषा असून ही परिस्थिती?. त्यामुळे आपण मराठी भाषेचा अभिमान बाळगलाच पाहिजे.


काही टिप्स :
  • आॅनलाईन रेल्वे बुकिंगसाठी वेवसाईट :  https://www.irctc.co.in
  • आॅनलाईन तिरुपती निवासस्थान व भक्तनिवास वेबसाईट : https://ttdsevaonline.com/#/login

आम्ही केलेल्या रेल्वेगाड्या :
  • पुणे ते रेणीगुंठा : मुंबई - पुणे - चैैन्नई एक्सप्रेस रात्री ००.१० मिनिटे. (पुणे) पोहचते दुसºया दिवशी : दुपारी ४.४० (१९ तास प्रवास) (१२१६३ ट्रेन क्रमांक)
  • रेणीगुंठा ते कोल्हापूर : हरिप्रिया एक्सप्रेस : रात्री ९ वाजता रेणीगुंठा येथून - कोल्हापूरला पोहचते ४.३५ ला (१६.३५ मिनिटे प्रवास (१७४१५ ट्रेन क्रमांक)

कॉपी करू नका