Monday, June 22, 2015

‘क्रांतितीर्थ’ - क्रांतिवीर चापेकर

महान क्रांतिकाराक चापेकर बंधूंचे ‘क्रांतितीर्थ’

आज दामोदर हरि चापेकर यांचा आज (18 एप्रिल) बलिदानदिन. तीन सख्ख्या भावांनी राष्ट्रकायार्साठी केलेले हे बलीदान जगात एकमेव आहे ! भूमातेला स्वतंत्र करण्याच्या प्रेरणेने ऐन तारुण्यात स्वत:च्या प्राणाची आहुती देणाºया चापेकरांना  आदरांजली. 

चापेकर बंधूना त्रिवार अभिवादन




पुणे हे स्वातंत्र्यकाळात क्रांतिकाराकांचे माहेरघर बनले होते. अनेक स्वातंत्र्यवीर, क्रांतिकारक या पुण्याने दिले. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या काही क्रांतिकारांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यात चापेकर बंधूंचे नाव उल्लेखनीय आहे. एकाच घरातील तिघा बंधुंना ब्रिटीश सरकारने फाशी दिली होती. चापेकर बंधू राहत असलेले चिंचवडगावातील त्यांचे ठिकाण मोरया गोसावी मंदिरापासून काहीच अंतरावर आहे. मी लहान असताना चापेकर बंधूंविषयी मराठी चित्रपट पाहिला होता. चित्रपटाचे नाव आठवत नाही. पण चित्रपटातील ‘रँड’ या इंग्रज अधिकाराला चापेकर बंधूंनी ठार केल्याचे दृश्य पाहिले होते. चिंचवडगावातील त्यांच्या या वाडय़ाजवळून अनेकवेळा गेलो. परंतु वाडय़ात गेलो नव्हतो.  आज आवजरुन वाडा पाहण्याचे ठरवून गेलो.

वासुदेव हरी चापेकरांचा जन्म 1879 मध्ये कोकणात झाला. कालांतराने ते चिंचवड येथे स्थायिक झाले. 1897 पुण्यात प्लेगची मोठी साथ आली होती. या साथीत अनेकांचे बळी घेतले गेले. प्लेगच्या साथीमध्ये रोगी शोधून काढून त्याला उपचारासाठी  अमानवीय पद्धतीने नेले जात असे. तसेच ज्यांना या रोगाची बाधा झाली नाही अशा व्यक्तींना देखील केवळ संशयावरून अत्याचार करण्यात आले. प्लेगची साथ आटोक्यात आणण्याच्या हेतूने भारतात पाठविलेल्या वॉल्टर चार्ल्स रॅन्डने रोग नियंत्रणाच्या नावाखाली जनतेवर अत्याचाराचे सुरु  केले. रॅडने सामाजिक रुढी परंपरांना पायदळी तुडवून लोकांचा असंतोष ओढवून घेतला. या बिटिश अधिका:याने लोकांचा छळ केला. हिंदूंची घरे जाळणो, देवघरात जाऊन देवांचा अपमान करणो, तपासणीच्या नावाखाली महिलांशी असभ्य वर्तन करणो अशा त्याच्या क्रूर कृत्यांमुळे समाजाच्या सर्वच थरांमध्ये संतापाची लाट उसळली. याचा चापेकर बंधूच्या (दामोदर, बाळकृष्ण, वासुदेव) मनात राग निर्माण झाला. हे अत्याचार करणारा इंग्रज अधिकारी रँड होता.
         रँडचा सूड घेण्याची योजना तयार करु न त्याची अंमलबजावणीही केली गेली. यात दामोदरांच्या ‘दादा गोंद्या आला रे आला’ या आरोळी ऐकून बाळकृष्ण चापेकरांनी रॅडची बग्गी आली आहे. अशा समजाने चुकून लेफ्टनंट आयरिस्टवर गोळ्या झाडल्या. ती चूक कळल्यावर रँडची बग्गी आल्यावर दामोदर चापेकरांनी रँडवर गोळीबार केला. २२ जून १८९७ला रँडवर पाळत ठेवून चापेकर बंधूंपैकी दामोदरने त्याच्यावर गोळी झाडली. यात लेफ्टनंट आयरिस्ट जागीच ठार झाला तर रॅडने 3 जुलै 1897 रोजी हॉस्पिटलमध्ये गेल्यावर प्राण सोडले. पुणे युनिवर्सिटीजवळ असलेल्या गणेशखिंडीनजीक ही घटना घडली. चापेकर बंधु त्यावेळी निसटण्यात यशस्वी झाले असले तरी नंतर तिघांनाही नंतर पकडण्यात आले. चापेकर बंधूंना द्रविड बंधूंच्या फितुरीमुळे अटक झाली. याचा बदला चापेकरांचे तिसरे बंधू वासुदेव हरी चापेकर व त्यांचे एक सहकारी महादेव रानडे यांनी खुन्या मुरलीधराजवळ द्रविड बंधूंचा वध करून घेतला. त्यानंतर त्यांनाही अटक झाली. दामोदर चापेकर यांना 18 एप्रिल 1898 रोजी फाशी देण्यात आले. त्यानंतर वासुदेव चापेकर यांना 8 मे 1899 तसेच बाळकृष्ण चापेकर यांना 12 मे 1899 रोजी येरवडा तुरुगात फाशी देण्यात आली.
          आज चापेकर वाडय़ात ठेवलेला चापेकर यांचा पुतळा 4 ते 5 वर्षापूर्वी चिंचवड भाजी मंडईतील मुख्य चौकात उभारलेला होता. 1978 मध्ये चिंचवड गावातील मुख्य चौकात एका हातात पिस्तुल घेऊन उभे असणा:या दामोदर चापेकरांचा सहा फुटी पुतळा उभारण्यात आला होता. या चौकात घडय़ाळ टॉवर व पुतळय़ाचे भूमीपूजन समारंभ कै. बॅ. विठठलराव गाडगीळ व शरद पवार यांच्या उपस्थितीत झाला होता. सध्या या पुतळाच्या चौकात मोठा पूल निर्माण झाला आहे.
      चापेकर बंधू राम आळीतील ज्या वाड्यात राहत होते त्याची फार दुरवस्था होती. या वाडय़ाची आतापर्यंत समाजकंटकांनी दोन वेळा जाळपोळ केली. 1930 च्या सुमारास हा वाडा पेटवण्यात आला होता. महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर 1948 मध्ये ही हा वाडा पेटविण्यात आला होता. स्मारक समितेने  तेथे प्रथम व्यायामशाळा सुरू केली.
        चिंचवड गावात क्रांतिवीर हुतात्मा चापेकर बंधू 125 वर्षांपूर्वी ज्या वाडय़ात राहात होते त्या जागेवर सुमारे दीड कोटी रुपये खर्च करून स्मारक उभारण्यात येत आहे. स्मारकाच्या प्रथम टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. तर दुस:या टप्प्याचे काम सुरू आहे.  या चौघा क्रांतिकारकांचे स्मारक चापेकर बंधूंच्या जुन्या वाडय़ात उभारण्यात आले आहे. त्याला शोभेल असेच ‘क्रांतितीर्थ’ असे नाव दिले आहे. येथे अजून काही काम बाकी आहे. स्मारक उभारण्याचा खर्च पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे  करण्याचे 1998 मध्ये महापालिकेचे आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी मान्य केले. सध्या समितीचे कार्यवाह गिरीश प्रभुणे आहेत.  चापेकरांचा वाडा 1857 च्या सुमारास उभारला असावा. स्मारक म्हणून जुना वाडा त्याच पद्धतीने उभारण्यात येत आहे.  सध्या हा वाडा 30 फूट लांब व 150 फूट रूंद आहे. जुन्या वाड्यांचा अभ्यास करून स्मारकाची रचना करण्यात आली आहे. लाकूड, दगडकाम, कोरीव काम हे दुस:या टप्प्यात पूर्ण करण्यात येणार आहे.  स्मारकामध्ये चापेकरांच्या वस्तू, त्यांच्याविषयी लेखन साहित्य ठेवण्यात येणार आहे. स्मारकाच्या दुस:या मजल्यावर देशातील विविध क्रांतिकारकांची तैलचित्रे लावण्यात आली आहेत.  यात संत मुक्ताई, संत मीराबाई,  झाशीची राणी लक्ष्मीबाई, सरोजनी नायडू,  पुण्शोल्क अहल्याबाई होळकर आदीं विषयी माहिती दिलेली आहे.
       दामोदर चापेकर यांचा स्मृतिदिन 1972 पासून दर 18 एप्रिल रोजी चापेकर स्मारक समितीच्या वतीने चिंचवड गावात साजरा केला जातो. 1857 च्या स्वातंत्र्ययुध्दानंतर निर्माण झालेल्या क्रतिकारकांमधे चापेकर बंधु यांना आद्य क्रांतीकारकांचे स्थान आहे. लाला लजपत राय यांनी चापेकर बंधूंचे ‘गौरव भारतातील क्रांतीचे जनक’ असा केला आहे.
        रँडच्या वधाच्या वेळी दामोदरपंतांचे हे अवघे वय होते 27 वर्षे, बाळकृष्ण यांचे  वय होते 24 वर्षे व वासुदेवरावांचे वय होते 18 वर्षे. अवघ्या विशी-पंचवीशीतील या तरु णांचा त्याग व शौर्य पाहून आजही उर अभिमानाने भरून येतो ! राष्ट्रकार्यासाठी तीन सख्या भावांनी केलेले हे बलिदान जगात एकमेव आहे ! त्यांच्या या त्यागास व शौर्यास विनम्र अभिवादन.


‘‘स्वदेशिहताकरिता स्वप्राणाची पर्वा न करिता कोटय़वधी पुण्यवान लोक समरांगणी धारातीर्थांचे ठिकाणी पतन पावतात तेव्हा स्वदेशहित होते, फुकट होत नाही. एवढी अक्कल या आधुनिक विद्वांनाना नसावी ही मोठ्या दुर्दैवाची गोष्ट होय.’’  
                                                                                                                       - दामोदर हरी चापेकर












दामोदर हरी चापेकर
जन्म : 25/6/1869 फाशी  18/4/1898

क्रांतिवीर बाळकृष्ण हरी चापेकर
जन्म : 1873  फाशी 12 मे 1899

वासुदेव हरी चापेकर
जन्म : 1879, फाशी  : 8 मे 1899




Apr 18, 2014

Sunday, June 7, 2015

तिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) - भाग १



तमाम हिंदूचे श्रद्धास्थान म्हणजे तिरुपती बालाजी. अनेक वर्षापासून तिरुपती बालाजीचे दर्शन घेण्याची इच्छा होती. पुण्याजवळील कापूरहोळ येथील प्रतिबालाजीला अनेकवेळा गेलो. मात्र, तिरुपतीला प्रथमच जाण्याचा योग जुळून आला. या प्रवासाविषयी..


भारतातील तीर्थक्षेत्रंमध्ये प्रसिद्ध असे हे तिरुपती क्षेत्र आहे.  देशातील सर्वाधिक श्रीमंत देवस्थान म्हणूनही ओळखले जाते. आंध्रप्रदेश राज्याच्या दक्षिण टोकावरील चित्तूर जिल्हय़ात तिरुपती हे शहर. याच शहराच्या जवळ असलेल्या डोंगरावर बालाजीचे हे मंदिर आहे. याच डोंगराला ‘तिरुमला’ असे म्हणतात. तिरुमला डोंगर रांगेत एकूण 7 डोंगर आहेत.  त्याला सात फण्यांचा आदिशेष असे म्हणतात. हे देवस्थान अगदी शेवटच्या डोंगरावर वसले आहे. म्हणून या परिसराला सप्तगिरी असेही म्हणतात. संपूर्ण डोंगर हा लाल दगडाचा आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे 853 मीटर उंचीवर असलेल्या या ठिकाणी उन्हाळय़ातही थंडावा असतो. भगवान वेंकटेशाचे मंदिर असलेल्या पर्वताला ‘वेंकटाचल’ असेही म्हटले जाते. या डोंगरावर ‘कपिलितीर्थ’ नावाचे सरोवर आहे.
‘तिरु’ म्हणजे ‘लक्ष्मी’ लक्ष्मीचा पती म्हणजे ‘तिरु पती’ (विष्णू). तेलुगू व तमिळ भाषेत ‘मला/मलई’ म्हणजे ‘डोंगर/पर्वत’. बालाजी हा विष्णूचा अवतार मानला जातो. तिरुपती राजधानी हैदराबादपासून 740  किलोमीटरवर आहे. तर शहरापासून सुमारे 20 किलोमीटरवर असलेल्या डोंगरावर हे मंदिर आहे. बरेचसे भाविक हे अंतर अनवाणी पार करतात. वैकुंठ एकादशीला येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात. असे मानले जाते कि या दिवशी बालाजीचे दर्शन घेतल्यास सर्व पापातून मुक्ती होऊन त्याला मुक्ती मिळते. दररोज सुमारे 5क् हजारांहून भाविक या ठिकाणी दर्शनास येत असतात. ऑक्टोबर महिन्यात या ठिकाणी ब्राrाोत्सव साजरा केला जातो. सुमारे 9 दिवस हा उत्सव असतो. 


तिरुपती मंदिराविषयी :

           मंदिराची उभारणी ही दाक्षिणात्य गोपुर शैलीपद्धतीची आहे. बालाजीची मूर्ती सोने व इतर अनेक दागिन्यांनी मढलेली असते. मूर्तीची उंची 2  मीटर आहे. मंदिराच्या स्थापनेचा अचूक काळ अज्ञात आहे. मूर्ती स्वयंभू मानली जाते. लोककथेनुसार तिरुपती डोंगरावर मोठे वारुळ होते. एका शेतक:यास आकाशवाणीद्वारे वारु ळातील मुंग्यांना खायला घालण्याची आज्ञा झाली. तेथील राजाला ही आकाशवाणी समजल्यावर त्याने त्या वारु ळास दूध पुरवू लागला. त्याच्या भक्तीमुळे बालाजी अवतीर्ण झाले.
             बालाजीच्या मंदिराचा संपूर्ण कलश सोन्याचा आहे. ऐतिहासिक पुराव्यानुसार मंदिर किमान 2000 वर्षे जुने आहे.  चौल व पल्लव साम्राज्यांनी या मंदिराला भरभराटीस आणले. 1517 मध्ये कृष्णदेवराय राजाने गर्भगृहाच्या शिखराला सोन्याचा थर दिला. पुढे मराठा सेनापती रघुजी भोसले यांनी देखभालीची व्यवस्था केली. म्हैसूर व गदवल संस्थानाद्वारेही या मोठय़ा देणग्या मिळाल्या. ब्रिटिश काळात मंदिराचे प्रशासन  हाथिरामजी मठाला सोपवण्यात आले. ही व्यवस्था 1933 पर्यंत सुरु  होती.  1933 मध्ये मद्रास विधानसभेच्या विशेष कायद्याअन्वये ‘तिरुमला तिरु पती देवस्थानम’ समितीची स्थापना करण्यात आली. यालाच तिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) असे म्हणतात.  हे पुरातन मंदिर ज्या डोंगरावर आहे त्या डोंगराची माती ढासळत असल्याचा दावा मध्यंतरी पुरातत्व विभागाने केला. ही माती अशीच ढासळत गेली तर हे मंदिर एक दिवस खाली येईल असा इशारा देणारे निवेदन पुरातत्त्व खात्याने तिरु मला तिरु पती देवस्थान समितीला दिल्याचे वृत्तपत्रतून वाचण्यात आले होते. या मंदिराची तात्पुरती डागडुजी किंवा त्याच्या बाहय़रूपात काही बदल केले आहेत. मूळ शिल्पाला धक्का न लावता ही डागडुजी केली जाते. सध्या मुख्य मंदिरात डागडुजीचे काम सुरू आहे. 

कल्याण कट्टा / केसांचे दान :

         तिरुपती बालाजीच्या चरणी डोक्याचे केस दान केल्याने मनातील इच्छा पूर्ण होते, अशी भक्तांची धारणा असल्याने येथे  स्त्री, पुरुष, सर्वजण केसदान करतात. रोज हजारो किलो केसांचे दान या ठिकाणी होत असते. या केसांचा वापर विग तयार करण्यासाठी केला जातो. यासाठी देवस्थान त्याचा लिलाव करते. मागे वृत्तपत्रत देवस्थानला 74 कोटीं या केसव्रिकीतून मिळाल्याचे वाचण्यात आले होते. इंटरनेटद्वारे ऑनलाईन प्रक्रियेद्वारे ही विक्री झाली होती.  या लिलावात सुमारे 1 लाख 40 हजार 499 किलो केस विकले गेलेत. केसांच्या लांबीनुसार त्याचे विभाजन करु न ते विकले गेले.
          मंदिराच्या बाहेरील बाजूस एका मोठय़ा इमारतीत कल्याण कट्टा असून, या ठिकाणी भाविक लोक आपले केस दान करतात.  येणा:या भाविकांना एक कुपून व नवीन ब्लेड देण्यात येते. असे कुपून घेऊन संबंधित नंबरवर केस कापणा:या पुढे जाऊन उभे राहावे लागते. प्रथम पाण्याने डोके भिजवून केस मऊ करण्या संदर्भात सांगितले जाते. दोन ते चार मिनिटातच मुंडन केले जाते.
           येथील व्यवस्थाही पाहण्या जोगी आहे. केस काढणा:याला पैसे द्यायची गरज नाही. पैसे दिल्यास ते लोक पैसे स्वीकारत नाही. देवस्थान त्यांना प्रत्येक कुपूनामागे पैसे मोजत असतात. सर्वत्र केस कापून उभे असलेले पुरुष व स्त्री दिसतात. साफसफाई कर्मचारी सर्वत्र केस गोळा करत असल्याचे दिसून येते. याच ठिकाणी स्नान करण्याचीही सोय उपलब्ध करून दिली असते. याच बरोबर कौस्तुभ व सप्तगिरी रेस्ट भवनातही ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.

तिरुमला वर जायचा  रस्ता

हुंडी / दान :

            अलीकडे विविध धार्मिक संस्थानांच्या वाढत्या श्रीमंतीबद्दल जोरदार  चर्चा होत असते. मध्ये केरळमधील पद्मनाभ मंदिराच्या संपत्तीचे  आकडे डोळे विस्फरणारे ठरले. अजुनही या मंदिराचे काही दरवाजे उघडायचे बाकी आहेत. या ऐतिहासिक मंदिरात सापडलेला खजिना तर दहा लाख कोटींचा असल्याचा प्राथमिक निष्कर्ष सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीने दिला. या श्रीमंतीबाबत विचार करायचा तर बालाजी देवस्थानचा क्रमांक वरचा लागतो. या देवस्थानचे उत्पन्न काही अब्जात जाणारे आहे. मंदिराला एवढे दान मिळते की मंदिराच्या काही भिंती सोन्याच्या पत्र्याने मढवल्या गेल्या आहेत. तिरूपतीला रोख स्वरूपातील रकमेबरोबरच सोने, चांदी, हिरे यांचे दागिने अर्पण केले जातात. भक्तांनी केलेले पैशाचे हे दान मोजण्यासाठी चाळणीतून हे पैसे चाळून वेगळे केले जातात. आपापल्या ऐपतीनुसार प्रत्येक भाविक हे दान करत असतो. अंगठय़ा, सोन्याची चैन, सोने असे दान करण्याची येथे प्रथा आहे.
             खरा भक्त आणि  देवातलं अंतर हळूहळू दूर होत चालल्याचे दिसून येते. पैसे देऊन व्हीआयपी रांग आणि सोन्याचे दान करणारे नवस भाव खाऊन जातात.  कधी काळी शांततेची स्थाने असणारी मंदिरे आता मात्र, प्रचंड गजबजाट आणि कोलाहल बनू लागली आहे.  त्याला धार्मिक स्वरुप येऊ लागले आहे. हिंदू धर्मातील प्रत्येक पंथाचे देव वेगळे बनले आहेत. देशातल्या प्रत्येक मंदिरातील दानपेटीत दान वाढतच जाते. शिर्डीत एका भक्तानं साईच्यां चरणी 32 लाख रु पये किंमत असणारा सोन्याचा कलश अर्पण केलाय. मंदिरातील भाविकांना रांगेत थंडावा मिळावा यासाठी एसीची व्यवस्था केली. रोज दान देणा:यांच्या संख्येत वाढ होताना दिसते. हे दान गुप्त स्वरुपात होते. पद्मनाभस्वामी मंदिराचा सुमारे एक लाख कोटीचा खजिना आहे. तर तिरु पती बालाजी मंदिराचा 50 हजार कोटीचा खजिना आहे. वैष्णोदेवी  वार्षिक दान 500 कोटी तर शिर्डीचे साईबाबा संस्थान वार्षिक दान 200 कोटींच्या वर आहे. हे आकडे ऐकले तर आपला भारत गरीब म्हणावा का? हा प्रश्न उपस्थित होतो. आपण केलेला नवस पूर्ण झाल्यास हा नवस देणगी स्वरुपात, सोन्याच्या स्वरुपात  देण्याची प्रथा अलिकडे सुरू झाली आहे. खरेतर गोरगरीबांसाठी अन्नछत्रलय, शैक्षणिक संस्था, रस्ते, सोई सुविधा, हॉस्पिटल, पाणीप्रश्न या सारख्या प्रश्नांकरिता हे दिलेले गुप्त दान वापरण्याची खरी गरज आहे. काही देवस्थान संस्था हे उपक्रम राबवित असतील ही तरीही मोठय़ा प्रमाणावर हे दान वापरले गेले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदींजींनी काही महिन्यांपूर्वी या मंदिराकडील सोने बाजारात आणण्याची कल्पना मांडली. त्यावरून वाद घालण्या पलिकडे आपण काहीही करत नाही. पंतप्रधानांची ही योजना खरच स्वागताहर्य़ म्हणावी लागेल.

सुरक्षा व्यवस्था

               लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या या देवस्थानची सुरक्षाही तितकीच कडक आहे. डोंगर चढण्यापूर्वी वाहनातून  तसेच पायी चालत जाणा:या भाविकांची तपासणी केली जाते. यासाठी बॅग स्कॅन करण्याची यंत्रणा उपलब्ध आहे. जवळपास अमली पदार्थ बाळगणो हा गुन्हा आहे. सिगरेट, तंबाखू, गुटका, दारू यासारखे व्यसने तिरुपती देवस्थानावर करणो गुन्हा आहे व अर्थात हे पदार्थ वरती मिळत ही नाहीत. मुख्य मंदिर प्रवेशद्वारावरही सर्वत्र कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. मंदिरात प्रवेश करतानाच पुन्हा स्कॅनर मशीन लावण्यात आलेले आहे. जागो जागी कॅमेरा लावण्यात आले आहेत. एकूणच येथील सुरक्षा व्यवस्था कडक आहे. मात्र, भाविकांना याचा त्रस होताना दिसत नाही.






















आदर्श घ्यावा

           तिरुपतीप्रमाणो आपल्याकडे ही अशा देवस्थानचा विकास होण्याची गरज आहे. तिरु पती मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान हे केंद्रस्थानी मानून सभोवतालचा परिसर सुशोभीत केलेला आहे.   देशभरातून येणारा पर्यटक निदान चार दिवस तरी येथे मुक्कामी राहिला पाहिजे. अशी यंत्रणा केलेली आहे. परिसरातील अनेक ठिकाणो पर्यटन स्थळे म्हणून घोषित केलेली आहेत. यासाठी अशी प्रेक्षणीय स्थळे विकिसत केली. तिरु पतीचे महत्व, माहात्म्य सांगणारी माहिती केंद्रे देशभरात उभी केली. येणा:या लाखो पर्यटकांसाठी निवास व्यवस्था,  भक्तांसाठी सोयी-सुविधा, पाणीपुरवठा, वाहतूक व्यवस्था, शिक्षण, संशोधन केंद्र, धर्मादाय संस्था, हॉस्पिटल्स हे सर्व आपल्याकडेही होणो सहज शक्य आहे. संपूर्ण डोंगरावर जाताना व येताना एकेरी मार्ग, संपूर्ण रस्ता डांबरी (खड्डे नाहीत), संपूर्ण डोंगरावर हिरवळ, स्वच्छता हे पाहून नक्कीच आपल्याकडेही असे देवस्थान होण्याची गरज आहे.

पर्यटन वाहन व्यवस्था 

 

 

             तिरुपती बालाजीचे दर्शन घेतल्यावर वेळ मिळाल्यास डोंगरावरील पर्यटन स्थळे व काही मंदिरे पाहण्यास विसरू नका. सुमारे 5 ते 10 किलोमीटर अंतरावर असलेली ही ठिकाणो नयनरम्य परिसरामुळे देखणी व चिरस्मरणात राहणारी ठरतात. देवस्थानतर्फे  स्वत:ची पर्यटकांसाठी बस आहे. मात्र, तिची वेळ माहिती करून घेणो गरजेचे आहे. केवळ 45 रुपयांत ते काही मंदिरे दाखवितात. मात्र, प्रचंड गर्दीमुळे आम्ही ही बस नाकारली.मंदिर परिसरात सुमो, जीप गाडय़ा, तवेरा, क्वॉलिस यांसारख्या गाडय़ा भाडय़ाने उपलब्ध आहेत. डोंगरावरील पर्यटनस्थळे ते आपणास दाखवून आणतात. सुमारे 1000 रुपयांमध्ये 5 पर्यटनस्थळे दाखविली जातात. एका सुमोत 11 जण सहज बसतात. ही स्थळे पाहण्यास सुमारे तीन ते चार तास इतका वेळ लागतो. जादा पर्यटक मिळावेत यासाठी ड्रायव्हर आपल्यामागे घाई करताना दिसून येतो. आपण मात्र, मनसोक्त ही पर्यटनस्थळे पाहवीत. खाली तिरुपतीमध्ये सुद्धा अनेक पर्यटनस्थळे पाहण्यासारखी आहेत. तिरुपतीला जाऊन तेथून गाडी ठरविल्यास ते फायदेशीर ठरते. कारण वरून गाडी ठरविल्यास एकतर ते जादा दर सांगतात. आपली अडचणीची वेळ लक्षात घेऊन वाटेल तो दर सांगतात. खाली तिरुपतीला जाण्यासाठी सुमारे 1500 रुपये असा दर सांगतात. आम्ही तिरुपतीवरून तिरुमलावर 700 रुपयांत वर आलो. मात्र, खाली जाण्यासाठी 67 टर्न असल्याचे कारण व जादा माणसे घेऊन जाता येत नसल्याचे कारण सांगून हे ड्रायव्हर अडवणूक करतात.

स्वच्छतेबाबत

              एकूणच धार्मिक पर्यटन म्हटले की, घाण, सडलेली फुले, नारळ, करवंटय़ा, लोकांनी खाऊन टाकलेले उष्टान्न, टाकाऊ पदार्थ, राडा असे चित्र आपल्याकडे काही ठिकाणी सर्रास पाहायला मिळते. मात्र, तिरुपती स्टेशन असो वा तिरुमला डोंगरावरील मंदिरे असो, तेथील हॉटेल परिसरा भोवती सुद्धा कमालीची स्वच्छता पाळण्यात येते. जागोजागी प्लॅस्टिकच्या कचराकुंडय़ा ठेवल्यामुळे पर्यटक कचरा कचराकुंडीतच टाकतात. जागोजागी झाडू घेऊन स्वच्छता करणारे कर्मचारी दिसून येतात. यामुळे एवढी गर्दी होऊन सुद्धा स्वच्छता असल्याचे पाहून आश्चर्य वाटते. पुणो स्टेशनावर गाडीची वाट पाहत असताना नाकाला रुमाल बांधल्याखेरीज बसणो मुश्किल जाते. मात्र, तिरुपती स्टेशनवर गाडी गेल्यावर रेल्वे ट्रॅक पाण्याने स्वच्छ धुतला जातो. हे  पाणी तेथील गटारातून वाहून जाण्याची सुविधाही उत्तम केलेली दिसून येते. तिरुमला डोंगरावर अनेक ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहे बांधण्यात आलेली आहे. 

काही टिप्स :

  •  तिरुपतीला दर्शनासाठी तसेच राहण्यासाठी ऑनलाईन बुकिंग करता येते.
  • विमान प्रवास केलास 2 दिवसांची ही ट्रिप होते.
  • शक्यतो रात्री दर्शन घेण्यास गेल्यास लवकर दर्शन होते.
  • कुठल्याही मंदिर परिसरात मोबाईल, कॅमेरा न्याण्याची परवानगी नाही त्यामुळे शक्यतो या गोष्टी टाळा. आणल्यास त्या मंदिराबाहेरील काउंटरजवळ जमा करण्यासाठी परत रांग लावावी लागते.
  • तिरुमला व तिरुपतीवरील प्रेक्षणीय स्थळे पाहायची असल्यास प्रायव्हेट गाडी ठरवा. स्वत:ची ठिकाणो पाहण्याचा आग्रह धरा. त्यासाठी आधी प्लॅनिंग करा.

जायचे कसे  :

  • तिरुपती हे ठिकाण लोहमार्ग (रेल्वे) व द्रुतगती (रस्ता) मार्गाने पुणो, चेन्नई व बंगळूर या शहरांशी जोडलेले आहे.
  • जवळचे रेल्वेस्टेशन: तिरुपती, रेणीगुंठा. येथे उतरून मोटारीने  डोंगरावर जाता येते.
  • पुण्याहून संध्याकाळी 7.15ला सुटणा:या छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कन्याकुमारी जयंती एक्सप्रेस गाडीने सुमारे 18 तासांचा प्रवास करावा लागतो. या शिवाय दादर ते चेन्नई एक्सप्रेस, मुंबई सीएसटी ते चेन्नई मेल आहेत. 


तिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) - भाग २

वरील लेख कसा वाटला या विषयी जरूर प्रतिक्रिया कळवा.

कॉपी करू नका