Sunday, October 21, 2012

मोरगाव- नारायणपूर-बालाजी मंदिर

मोरगाव- नारायणपूर-बालाजी मंदिर

तारीख : 21/10/2012

मोरगाव

 

सकाळी ७.४५ ला घर सोडले. खडकीतून येरवडा मार्गे पुणेस्टेशन तेथून  हडपसरमार्गे निघालो. रविवार असल्यामुळे गर्दी नव्हती. वाटेत दिवेघाटाखाली  थांबलो. येथे मटकी भेळ प्रसिद्ध आहे. दिवे घाट ओलांडून सासवडला पेट्रोल भरले. पेट्रोल येथे पिंपरी-चिंचवडच्या तुलनेने स्वस्त आहे. 

मोरगावचा मयुरेश्वर : -

           अनेकवेळा एसटीने मार्गावरून गेलो. पण गणपतीचे दर्शन करण्याचे राहून गेले. तेव्हा मुद्दाम गाडीने जाऊन दर्शन घेतले.
           अष्टविनायकांपैकी प्रथम गणपती म्हणजेच मोरगावचा हा मोरेश्वर. अष्टविनायक यात्र या गणपतीचे दर्शन घेऊन सुरू केली जाते. सर्व आठही गणपतींचे दर्शन घेऊन शेवटी पुन्हा याच गणपतीचे दर्शन घेतली की यात्र पूर्ण होते असे म्हटले जाते. मोरेश्वर हा गणपती नवसाला पावणारा अर्थातच त्यामुळे भक्तांचा तारणहार समजला जातो. वेळेअभावी अष्टविनायकांची यात्र एकदम करता येणो शक्य नव्हते. तेव्हा जमेल तेव्हा अष्टविनायकांचे दर्शन घेण्याचे ठरवले.
           मोरगाव पुणे जिल्हय़ातील पुरंदर तालुक्यात असून क:हा नदीकाठी असलेले छोटेसे गाव. अष्टविनायकांमध्ये या गणपतीला विशेष स्थान आहे.  पुणे-सातारा मार्गावर पुण्यापासून केवळ 64 कि. मी. वर असणारे हे मोरगाव पुण्यातून हडपसरकडून सासवडमार्गे जेजुरीच्या थोडे पुढे गेल्यावर डाव्या हाताला मोरगावकडे जाण्याचा रस्ता आहे.
           मंदिरात जाण्यासाठी गाडी पार्किग तळापासून थोडे पुढे गेलो. श्रींच्या आरतीचे सामान, फुले, माळा, हार, कॅसेटी यांनी बाजारपेठ सजलेली दिसली. पुराणात कथेनुसार सिंधू राक्षसाला ठार मारणारा हा मयुरेश्वर होय. मोरावर बसून गणेशाने राक्षसाला मारले म्हणून मोरेश्वर (मयुरेश्वर) हे नाव प्राप्त झालं.
           सुमारे अर्धा तास रांगेत उभे राहिल्यावर दर्शनाची वेळ झाली. तेही फक्त काही सेकंदच मंदिरातील सेवकांनी भराभरा दर्शन घेण्याच्या सूचना केल्या होत्या. गणेशाची बैठी, डाव्या सोंडेची, पूर्वाभिमुख आहे. श्रींच्या डोळय़ात व बेंबीत हिरे बसविलेले आहेत. डोक्यावर नागाची फणी आहे. मंदिर उत्तराभिमुख आहे. मंदिराला एकूण 11 दगडी पाय:या आहेत. मंदिराच्या चारही बाजूला 50 फूट उंचीची तटबंदी आहे.  मंदिर हे काळय़ा दगडातून साकारलेले आहे. बहमनी राजवटीत मंदिर बांधले असल्याचे अनेक पुस्तकात वाचण्यास मिळते.
           देवळात प्रवेश केल्यावर चौकातच दोन दीपमाळा दिसल्या  अशा प्रकारच्या दीपमाळा अष्टविनायकातील बहुतांश मंदिरात पाहण्यास मिळतात. भक्कम तटबंदी व कळसावरील शिल्पकाम तर छानच आहे. सभामंडपाला दोन मोठी प्रवेशद्वारे आहेत . देवळाजवळ नगारखान्याची इमारत आहे .  इथलं एक वैशिष्टय़ म्हणजे अष्टविनायकांतलं  हे एकच मंदिर असं आहे, जिथे दगडी नंदी आहे.

भाद्रपद व माघ या दोन महिन्यात पुण्याच्या जवळच्या चिंचवडहून श्रींची (मोरया गोसावी) पालखी मोरगावी येते. मोरगाव हे साधू मोरया गोसावींचं जन्मस्थान. चिंचवडगावातील मोरया गोसावी यांनी या ठिकाणीही तपश्चर्या केली होती व या मंदिराच्या परीसरातील क:हा नदीत त्यांना गणोशमूर्ती प्राप्त झाली होती. पुढे ही मूर्ती चिंचवडला आणून त्यांनी तिची प्रतिष्ठापना केली. चिंचवडला मोरया गोसावींचे मोठे मंदिर आहे.  मोरगाव मंदिराचे  व्यवस्थापन चिंचवड देव स्थानाकडे आहे.

(चिंचवडच्या मोरया मंदिराबाबत लवकरच ब्लॉग्ज लिहतो..)


कसे जावे :


  • मार्ग : मोरगांव - पुणे- सासवड - जेजुरी मार्गे मोरगावला जाता येते. 
  • जेजुरीतूनच मोरगावाकडे जाणारा फाटा फुटतो. जेजुरी - मोरगांव अंतर 17 कि.मी.,
  • पुणे - मोरगांव 64 कि.मी
  • पुणे - सोलापूर रस्त्यावरील चौफुल्यापासूनही मोरगांवला येण्यासाठी रस्ता आहे.
  • स्वारगेट स्थानकावरून एस.टी.ची. सोय आहे.
नारायणपूर 
तेथून पाहुणचार घेऊन दुपारी ३ ला निघालो. मोरगावमार्गे पुन्हा हडपसरमार्गे जाण्याचा विचार होता. मात्र वाटेत दत्ताचे प्रसिद्ध नारायणपूर होते. सासवड मार्गे फक्त ८ किलोमीटरवर म्हणून गाडी तिकडे फिरवली. दत्ताच्या मंदिराशेजारी शंकराचे एक मंदिर असून, पुरातन काळात बांधलेले आहे. नारायणूपरला जाणारा रस्ता थोडा खराब आहे. 

प्रति तिरुपती बालाजी : 

आजकाल मंदिर बनविण्यामध्ये ही प्रतिरुप म्हणजे ‘च्या’ सारखे, क्लोन, कॉपी, नक्कल, पायरसी सारखे प्रकार वाढू लागले आहेत. जाऊ द्यात आपल्याला काय त्याचे. पण यामुळे अनेकांना लांब असणारी धार्मिक स्थळे आपल्या घरापासून काही अंतरावर बघण्याची संधी मिळते. त्यामुळे अशी प्रति रुपे अजून निर्माण झाली तर आमच्यासारख्या भटकंती करणा:यांची चंगळच होईल. प्रति शिर्डी (शिरगाव), प्रति पंढरपूर (पवनानगर, दुधिवरे खिंडीजवळ) अशा यादीत आता प्रति बालाजी (केतकावळे) हे नवीन नाव समाविष्ट झाले आहे.

              पुणे परिसरातून जेजुरी, सासवड, बनेश्वर, केतकावळे, किल्ले राजगड, तोरणा आदी ठिकाणांकडे जाणा:या  संख्या मोठी आहे. त्यामुळे खेड शिवापूर येथील टोलनाक्यावर वाहनांची नेहमीच गर्दी व कोंडी होते. नशिबाने मी गेलो तेव्हा गर्दी कमी होती. नारायणपूरच्या दत्ताचे दर्शन घेऊन कापुरहोळला बालाजी दर्शन घेण्यास निघालो. व्यंकटेश्वरा हॅचरीज या उद्योग समूहाचे संस्थापक डॉ. बी. व्ही. राव यांचे तिरुपती हे कुलदैवत. सर्वसामान्य भाविकांना तिरु पतीला जाणं शक्य होत नाही म्हणून पुण्यात बालाजीचं मंदिर उभारावं, अशी त्यांची इच्छा होती. ही इच्छा ते असताना पूर्ण होऊ शकली नाही. पुढे त्यांची मुले व्यंकटेश राव, बालाजी राव व अनुराधा देसाई यांनी ती पूर्ण केली.  पुणे - बेंगलोर महामार्गावर पुण्यापासून 40 कि.मी. अंतरावर पुरंदर किल्ल्याच्या परिसरात केतकावळे हे छोटंसं गाव. मंदिर डोंगराच्या पुरंदर किल्ल्याच्या मागील बाजूस एका छोटय़ाश्या डोंगराखाली आहे.  बालाजीचे मूळ मंदिर आंध्र प्रदेशातील तिरुमला-तिरुपती येथे आहे.  येथील मंदिर सुमारे 2 ते 3 एकरांवर बांधलेलं आहे.  कापुरहोळला पोहचल्यावर वाहनतळावर गाडी लावली केली. ‘व्यंकट रमणा गोविंदा’ अशी तेलुगू भाषेतील गोड भजनं ऐकू येऊ लागली.

स्वच्छता व टापटिपपणा :

गाडीतळापासून मुख्य मंदिर थोडसे लांब आहे. प्रशस्त जागा, मोकळे वातावरण, ‘व्यंकट रमणा गोविंदा’चे भजन, असे मंगलमय वातावरण येथे अनुभवाला मिळाले. डाव्या बाजुला प्रसाधनगृहे होती. तर बॅग ठेवण्याची स्वतंत्र व्यवस्था होती. मंदिरात प्रवेश करतानाच समोर चप्पल स्टँड आहे. मंदिरात मोबाईल व कॅमेरा घेऊन जाण्यास परवानगी नाही. दर्शन रांगेच्या आधीच टोकन देऊन आपले मोबाईल जमा करावे लागतात. संपूर्ण मंदिराला बाहेरून मोठा प्रदशिणा मार्ग आहे. पुरुष व महिलांसाठी अशा दोन रांगा आहेत. मंदिरात प्रवेश करतानाच पायरीवर पाणी सोडलेले आहे. आपोआप पाय स्वच्छ होऊनच भाविक पुढे जातो. मस्त कल्पना आहे ना. अशी मंदिर व्यवस्था आपल्याकडील मंदिरात सुद्धा व्हायला हवी. दान धर्मासाठी येथे मोठय़ा आकारातील हुंडय़ा ठेवलेल्या आहेत. मंदिराचा लाडूचा प्रसाद तर फारच छान असतो. एका द्रोणामध्ये भरून हा प्रसाद वाटप केला जातो. विशेष म्हणजे प्रसाद खाली सांडल्यास तो उचलण्यासाठी सेवा देणारे अनेक लोक येथे आहेत. अतिशय स्वच्छता येथे पहावयास मिळते. भाविकांची गर्दी येथे नेहमीच असते. मात्र गडबड, गोंधळ इथे दिसला नाही. मंदिरातर्फे  येथे मोठय़ा प्रमाणावर कर्मचारी आहेत.  आपल्याकडील मंदिरात होणारी भाविकांची ढकलाढकली येथे नव्हती.
               श्री बालाजी हा विष्णूचा अवतार. बालाजीची मूर्ती ही काळय़ा दगडात घडवली असून कमळावर उभी आहे. मूर्तीचे चार हातात शंख, चक्र , गदा असून एक हात भक्तांना आशीर्वाद देणारा आहे. कानांत सोन्याची कर्णफुलं  आहेत. उभट आकाराचा मुकुट आहे. सोन्याच्या विविध अलंकारांनी मूर्तीला सजविण्यात येतं. दिवसभरात मंदिरात तीन वेळा पूजा केली जाते. मंदिराच्या समोर ध्वजस्तंभ व गरु ड मंदिर आहे.  त्यात विविध देवदेवता आहेत. मंदिराच्या चारही बाजूंना छोटी मंदिरं आहेत. त्यात वेणुगोपालस्वामी, नृसिंह, पद्मावती, सुदर्शनस्वामी, गोदामाता अशा देवता आहेत. मंदिराच्या डावीकडे कुबेर व वराहस्वामी यांची मंदिरं आहेत.  मंदिरावर उंच व भव्य गोपूर आहे. येथे वर्षातून दोन मोठे उत्सव साजरे केले जातात. एक वार्षिक उत्सव व दुसरा ब्रमोत्सव.  बालाजीला भाविकांनी केस वाहण्याची प्रथा आहे. तसा कल्याण कट्टा येथेही आहे.
या गावांमध्ये व परिसरात रिक्षा, जीप, सुमो, ट्रॅक्स वगैरे वाहनांची संख्या वाढली आहे.  बालाजी मंदिरात बालाजीचे दर्शन घेऊन रात्री ८ला शिरवळमार्गे कात्रज बायपासला यायला निघालो. वाटते ७० रुपयांचा चांगलाच टोल भरला. तेथून पुढे अर्धा तास ट्रॅफिक जॅमचा अनुभव घेतला. 

जावे कसे : 
  • पुणे - बेंगलोर मार्गावर शिरवळमार्ग
  • हडपसर - सासवड - नारायणपूर - कापूरहोळमार्ग थोडा घाट आहे. फक्त ८ किलोमीटर अंतरावर
    बालाजी.
  • जवळची पाहण्याची ठिकाण : नारायणपूर, कानिफनाथ, जेजुरी, सासवड, भुलेश्वर. 

  

 कॅमे:याअभावी फोटो काढता आला नाही. परत गेल्यावर फोटो जोडतो. 

  या स्थळांचे  लेखनाचे काम अपूर्ण आहे.. तसदीबद्दल क्षमस्व ! 

Sunday, August 5, 2012

महड-पाली-उन्हरे-अलिबाग

महड-पाली-उन्हेरे-आलिबाग

श्री वरदविनायक गणपती

 

अष्टविनायकांपैकी सातवा असलेला हा महडचा श्री वरदविनायक गणपती महड, ता. रायगड जिल्हय़ात आहे. रायगड जिल्ह्यात खालापूर तालुक्यात हा गणपती आहे.  जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावर खोपोलीकडून मुंबईकडे जात असताना 3 किलोमीटरवर डाव्या हाताला या मंदिराचा रस्ता लागतो. अष्टविनायकांपैकी असून सुद्धा येथील रस्ताची दुर्दशाच आहे. साधारणपणो दीड किलोमीटर रस्ता खराब आहे. मंदिरापासून काही अंतरावर गाडी पार्किगसाठी जागा आहे.
या मंदिरात सध्या नवीन बांधकाम होत आहे. मंदिराचा गाभारा मात्र पेशवेकालिन असून तो हेमांडपंथी आहे. हा गणपती पुरातन काळाचा असल्याचे सांगितले जाते. गणेश येथे वरदविनायक (समृद्धी व यश देणारा ) या रूपात रहात असे. येथील मूर्ती स्वयंभू असून धोंडू पौढकर यांना येथील तलावात 1690 साली सापडली. 1725 साली कल्याणचे सुभेदार रामजी महादेव भिवळकर यांनी येथे देऊळ बांधले व महाड गावही उभारले. देवाळाच्या चारही बाजूस चार हत्तींच्या मूर्ती आहेत.
.









पाली (जि. रायगड)

बल्लाळेश्वर


श्रीबल्लाळेश्वर हे रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात कर्जतपासून साधारण 30 किलोमीटर अंतरावर आहे. पुण्यापासून 115 कि. मी. अंतरावर आहे. महडच्या मंदिरासमोरून पालीच्या गणपतीला जाता येते. महड पाली रस्ता 30 किलोमीटरचा असून, रस्ता खराब होता. सुमारे 1 तास लागतो. हा रस्ता हिरव्यागार गर्द, घनदाट झाडांनी वेढलेला आहे.
बल्लाळेश्वर (पाली) हे रायगड जिल्ह्यातील पाली गावातील गणपतीचे देऊळ आहे. अष्टविनायकातील तिसरा गणपती म्हणून पालीचा हा गणपती ओळखला जातो. हा गणपती भक्ताच्या नावाने प्रसिद्ध आहे.  चिमाजी अप्पा पेशवे यांनी येथील मंदिराला एक मोठी घंटा दिली आहे व येथील मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केला. येथील लाकडी मंदिराचे दगडी मंदिर तयार केले आहे.  मंदिराच्या बाहेर मोठय़ा आकारातील घंटा लावलेली आहे. अशीच घंटा वाईच्या मेणवली घाटावर सुद्धा आहे.मंदिराचा गाभारा पंधरा फूट उंच आहे . उंदराची मूर्ती हातात मोदक घेऊन उभी आहे . मूर्ती छान आहे. सभामंडप चाळीस फूट लांब आहे . देवळासमोर दोन मोठी तळी आहेत. परंतु नेहमीसारखे या ठिकाणही महाराष्ट्र पर्यटन विभागाचे दुर्लक्ष झाल्याने दुरवस्था झाली आहे.  माघ महिन्यात येथे मोठा उत्सव होतो.




सरसगड 

अगदी देवळाच्या जवळच सरसगड आहे. गडावर पूर्वी गेलो होतो. गडावर जाण्यासाठी मोठ मोठय़ा पाय:या आहेत. पालीगावाच्या पूर्वेस हा किल्ला आहे. पाली गावातून इथं येउन किल्ला पहाणे 2-3 तासांत होते. या किल्ल्याच्या पूर्वेला 10 ते 12 कि.मी. वर सुधागड हा किल्ला आहे. धनगड, कोरीगड, तेलबैल्या, खंडाळा घाट, नागफणी, अंबा नदी, गरम पाण्याची कुंड असणारे उन्हेरे असा परिसर गडावरु न दिसतो. सरसगड उर्फ पगडीचा किल्ला उर्फ पालीचा किल्ला अशा नावांनी ओळखला जातो.

सरसगड



 येथील देवळात आणि परिसरात फोटो काढायला बंदी आहे. ही बंदी का असते हे कळत नाही. चौकशी केल्यास मंदिराच्या मागील बाजूस थोडय़ा अंतरावरच स्वच्छतागृह आहे. तेथे किरकोळ पैसे देऊन फ्रेश होता येते. मंदिर परिसरात मोठा तलाव आहे. नेहमीसारखी या ठिकाणी ही बाजार पेठ आहे. पोहय़ाचे पापड, मिरगुंड, कोकम सरबत, कुरडय़ा, लोणचे असे कोकणचे प्रकार घरी घेऊन येता येतात.

उन्हरे :

महाराष्ट्रातील गरम पाण्याचे कुंड म्हणून प्रसिद्ध. परंतु ब:याचश्या लोकांना माहित नसलेले उन्हरे हे गरम पाण्याचे कुंड पाली पासून केवळ दोन किलोमीटर अंतरावर आहे. हा परिसर अंबा नदीच्या काठावर आहे.  श्रीरामाने बाण मारून सितामाईस स्नानासाठी हे स्थान तयार केले अशी पुराणात कथा आहे. या गंधकमिश्रीत कुंडात स्नान केल्यास त्वचेचे विकार बरे होतात. असे बोलले जाते. एकुण तीन कुंडे आहेत. त्यापैकी एक महिलांसाठी एक पुरूषांसाठी आहे. या दोन्ही कुंडातील पाण्याचे तापमान त्वचेला सहन होते. तिस:या कुंडाचे पाणी जास्त गरम आहे. कुंडाच्या तळाशी लाकडाच्या फळय़ा आहेत. त्यावर उभे राहता येते.  येथे जास्त वेळ थांबल्यास गंधकाच्या वासामुळे चक्कर येवू शकते.  या ठिकाणी 15 फूट बाय 15 फूट असा गरम पाण्याचा कुंड आहे. कुंडाभोवती भिंत बांधलेली असून, या ठिकाणी बारा महिने, चोवीस तास गरम पाणी असते. पार्किग जागेजवळ छोटेसे हॉटेल सुद्धा आहे.




मागे एकदा मित्रंबरोबर घनगड - कोरीगड - तेलबैला - सवाष्णीचा घाटमार्गे पालीला आलो होतो. तेथून मुक्काम करण्यासाठी उन्हेरे ला एसटीने गेलो होतो. या ठिकाणी विठ्ठल-रु क्मिणी मंदिर असून, मंदिरात तेव्हा 1996 साली आम्ही मुक्काम केला होता. तेव्हा रात्री येथील वातावरणात गंधकाचा वास भरपूर होता. रात्री तर या कुंडातून मोठमोठे बुडबुडे येत असल्याचे पाहून मन काही काळ घाबारले होते. कारण लाव्हारसामुळे खडक तापतात. त्यात पाण्याचे झरे असल्यामुळे पाणी खडकातून वर येते. असे वाचले होते. न जाणो लाव्हारस बाहेर आला तर या भीतीने रात्र ब:यापैकी जागून काढली. येथून काहीच अंतरावर नदी असून, नदीतील पाणी मात्र नेहमी सारखे आहे.  रोहा मार्गे पालीच्या गणपतीला जाता येते. येथून पुढे जिंज:यालाही जाता येते.  उन्हरेतून नागोठणो मार्गे पेणला जाता येते. स्कूटरवरून परिवाराला घेऊन उन्हात निघालो. दुपारचे 2 वाजले होते. जंजि:याला जाण्याचा बेत रद्द करावा लागला. एकतर स्कूटर, वर उन मग काय हार मानून सरळ पेणला काकाकडे जायचे ठरले.  दुपारी 3.30 ला पेणला पोचलो. विश्रांती घेऊन पुन्हा संध्याकाळी अलिबागला बिचवर गेलो.

अलिबाग

 


 

या आधी अलिबागच्या कुलाबा किल्यावर गेलो असल्याने तसेच वेळही नसल्याने गेलो नाही. अलिबागला मुक्काम करायचा नाही असे ठरल्यावर टू व्हिलरवरून सायंकाळी 7 ला पेणला येण्यास निघालो. वाटेत छानच जंगल व घाटातून जाणारा रस्ता आहे. वाटेत गाडी पंक्चर होईल काय, चोर आडवेल काय अशी भीती वाटत होती. पण देवाच्या कृपेने तसे काही घडले नाही.  

अलिबाग एक सुंदर पर्यटन स्थळ आहे. बिचवर नेहमी प्रवाशांची वर्दळ असते. अलिबाग विषयी पुन्हा एक वेगळा लेख नंतर लिहतो.



महड गणपतीला जाण्यासाठी :

  • मुंबई-पनवेल-खोपोली मार्गावर खोपोलीच्या अलिकडे 6 कि.मी. अंतरावर उजवीकडे महडसाठी रस्ता जातो. मुंबई-महड अंतर 83 कि.मी आहे.
  • मुंबई-पुणे रेल्वेमार्गावर कर्जतपासून महड 24 कि.मी. आहे.
  • पुणे-लोणावळा-खोपोली-महड : अंदाजे 84 किमी. आहे.
  •  महडपासून सु. 20  किमी. अंतरावर कर्जत व खंडाळा ही लोहमार्ग स्थानके आहेत.

बल्लाळेश्वर पालीला जाण्याचा मार्ग

  • मुंबई ते पाली थेट एस.टी. ची आहे.
  • जवळचे रेल्वे स्टेशन कर्जत.
  • मुंबईहून रेल्वेने कर्जतला येथून पाली जाण्यासाठी एस.टी.बस आहेत.
  • खोपोली, पनवेल व कर्जत येथूनही एस.टी.ने पालीला जाता येते.
  • पुणे ते पाली बसची सोय आहे.
  • पुणे येथून रेल्वेने कर्जतला येऊन पुढे एस.टी. बसने पालीला जाता येते.

Saturday, May 19, 2012

कोयना डॅम - चिपळूण - डेरवण - मार्लेश्वर - गणपतीपुळे

कोयना डॅम  - चिपळूण - डेरवण - मार्लेश्वर - गणपतीपुळे

चार दिवस सुट्टी टाकून सासरी हिंडण्याचा बेत ठरूवूनच गेलो होतो. सकाळी क्वॉलिस आली त्याने 6.15 ला निमगाव केतकी सोडले. संत ज्ञानेश्वर पालखी मार्गे नातेपुते शिखर ¨शगणापूरला गेलो. रस्ताच्या बाजुबाजूला ओसाड रान आहे. तर काही ठिकाणी उसाची शेती केल्याचे दिसून आले. उन्हाळा असल्याने ब:यापैकी गरम होत होते.

गोंदवलेकर महाराज

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज मंदिर पाहिले. भक्तांतर्फे  येथे मोफत प्रसाद वाटप केला जातो. यासाठी आजुबाजूच्या गावातून तसेच अन्य ठिकाणांहून भाजीपाला, गहू, तांदूळ, डाळी, कडधान्ये तसेच तेल टेम्पोच्या टेम्पो भरून मोफत वाटले जातात. या ठिकाणी दुपारी 12.30 वाजता महाप्रसादाचे वाटप केले जाते. वेळ नसल्याने आम्ही तेथून निघालो. हे ठिकाण सातारा पंढरपूर रस्त्यापासून सुमारे 64 किलोमीटरवर आहे. तेथून आम्ही 9 ला निघालो. नवीन मार्ग व नकाशा जवळ नसल्याने नक्की कोठून आलो ते कळले नाही. मात्र, येथे येण्यासाठी रोटीबोटीचा घाट लागला. वाटेत एका ठिकाणी थांबून काकूंनी घेतलेला उपमा पोटभरून खाल्यावर पुढे निघालो. वाटेत एका बागेत कै:या तोडण्याचा कार्यक्रम केला. तेथून उंब्रजफाटय़ाला आलो. एव्हाना 10.30 वाजले होते.


कोयना धरण








 
कोयना धरण परिसर पाहण्यासाठी निघालो. कुंभार्ली घाटाच्या खूप अलिकडे  कोयना धरणाकडे रस्ता आहे. रस्ता चांगला बांधला आहे. कोयना धरणाच्या पाण्यावर फुलविलेली मोठी बाग पाहिली. बागेत जाण्यासाठी 10 रुपये प्रवेश फी तर पार्किग 20 रुपये  आहे. बाग सुंदर असून, बागेतून धरण परिसर छान दिसतो.  तेथून कुंभाली घाटातून चिपळूणला जायला निघालो. उन्हाळय़ाचे दिवस असल्याने वाटेत दोन मोठे फणस विकत घेतले. मात्र, मुक्कामी गेल्यावर खराब असल्याचे कळले असो.  कुंभार्ली घाटातून चिपळूणला गेलो. वाटेत जाताना वाटते संगमेश्वर संभाजीमहाराजांना जेथे पकडले ते ठिकाण आहे. बरीच नावे अशी असल्याने पाहायचे राहून गेले. 

डेरवण : 

 




 

डेरवणला शिवसृष्टीचे शिल्प पाहण्यासाठी गेलो. चिपळूण डेरवण सावर्डमार्गे 2क् किमी अंतरावर आहे. श्रीसंत सीताराम बुवा आत्माराम वालावलकर यांचे डेरवण गावात वास्तव्य होते. त्यांच्या निकटविर्तयांनी श्री संत सीतारामबुवा वालावलकर चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली. दि. 5 मे 1981 रोजी श्री महाराजांनी शिवजयंतीच्या दिनी श्री शिवसमर्थ मंदिराचे उद्घाटन केले. कै. गणेश दादा पाटकर व सहका:यांनी पंधरा वर्षे अथक मेहनतीतून शिवशिल्पसृष्टी साकारली आहे. गडाच्या दरवाज्यासमोर दोन हत्ती आहेत. तटबंदीतून प्रवेश केल्यावर प्रथम दोन मावळे पहारा करताना दिसतात. स्वराज्याची शपथ, अफझलखान वध, बाजीप्रभू देशपांडे, शाहिस्तेखानाची फजिती असे अनेक प्रसंग येथे मूर्तीच्या स्वरूपात आहेत. शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे. या ठिकाणी फोटो काढण्यास बंदी आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी अश्वारूढ झालेले मावळे आपले लक्ष वेधून घेतात. सुमारे 150 ते 200 मावळे या ठिकाणी आहेत.  एव्हाना दुपारचे 2 वाजले होते. दुपारचे जेवण येथेच ओटापले.
नंतर कळालेली माहिती  - (डेरवणला शिवशिल्पसृष्टीपासून सुमारे दीड किमी अंतरावर एक मोठा राजवाडा आहे. राजेशिर्के यांचे वंशज येथे राहत असल्याचे समजले.)

मार्लेश्वर  : 

 



 

मार्लेश्वर जायला निघालो. मार्लेश्वरला जाणारा रस्ता घनदाट जंगलातून जातो. वेडीवाकडी वळणो घेत. 3 ला मार्लेश्वरला पोहचलो. मार्लेश्वरला शंकराचे मंदिर आहे. मंदिराला जाण्यासाठी अंदाजे 250 ते 300 पाय:या चढून जावे लागतात. पावसाळय़ात या ठिकाणी खरे जायला हवे. समोरून 500 ते 1000 फुटांवरून धबधबा कोसळत असतो. आम्ही गेलो तेव्हा धबधबा ज्या ठिकाणावरून कोसळतो त्या ठिकाणी फक्त पाण्याची बारीक  धार  दिसून येत होती.  सुमारे 3क् ते 35 मिनिटे चालण्यास लागतात. वाटेत पाय:या केल्यामुळे धमछाक चांगलीच होते. वरती शंकराच्या मंदिरात सापाचे दर्शन घडते असे म्हणतात. मंदिराभोवती माकडे भरपूर असल्याने चांगला वेळ गेला. मार्लेश्वरहून सायंकाळी  5 ला निघालो. एव्हाना गाडी लागल्यामुळे अनेक जागा बदल केले. शेवटी मलाही गाडी लागल्याने चांगलेच चक्करायला लागले. सायंकाळी 8. ला गाडी  गणपतीपुळे येथे आली. मुंबई-गोवा महामार्गावरील हातखांबा येथून र}ागिरीमार्गे गणपतीपुळेला जायला सुमारे 40 कि.मी.चा मार्ग आहे.

गणपतीपुळे


 

मग आला मुक्काम करण्याचा प्रश्न. काकांबरोबर गणपतीपुळेत आठ माणसांसाठी राहण्यास जागा मिळते का ते पाहायला गेलो. बराच ठिकाणी हुडकल्यावर एसटी स्टॅन्ड शेजारी दीक्षित यांचा हॉल मिळतो का ते पहा असे एका माणसाने सांगितले. त्यांचा फोन घेऊन त्यांना फोन केला. या म्हणाले. जागा म्हणजे मस्त पैकी एक मोठा हॉल होतो. मस्त सोय झाली. फॅमिली म्हणून एकूण 7क्क् रुपये त्यांनी घेतले. हॉलमध्ये सामान ठेऊन फ्रेश होण्यास गेलो. एव्हाना 9.30 वाजले होते. दिवसभर गाडीत बसून अंग चांगलेच चिंबून आले होते. 9.3क् जेवणासाठी म्हणून मालगुंडला एक चांगले हॉटेल असल्याचे दीक्षित यांनी सांगितले. तेथून मालगुंड दोन किलोमीटरवर होते. पुन्हा गाडीत बसून मालगुंडला गेलो तर तेथे जागा नसल्याचा बोर्ड पहायला मिळाला. निराश होऊन पुन्हा गणपतीपुळेमध्ये पोटाबासाठी हॉटेल शोधायला निघालो. अखेर एका ठिकाणी कशीबशी जागा मिळाली. जेवण बेताचेच होते. परंतु चालले. रात्री 10.30 जेवण संपवून पुन्हा हॉलमध्ये आलो. गप्पाटप्पा करून सगळे झोपलो. आमच्याबरोबर आणखीन एक कुटुंब हॉलमध्ये राहायला आले होते. तेवढीच सोबत मिळाली.

मालगुंड









दुस:या दिवशी सकाळी 6 ला उठून 9 वाजेर्पयत सगळे मालगुंडला कविवर्य केशवसूतांचा वाडा पाहण्यासाठी गेलो. टिपकल कोकणी वाडा कसा असतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा वाडा. शेणाने सरावलेली जमीन, बाहेर लाकडी झोका, आतमध्ये गाई, गुरांसाठी बांधलेला गोठा, केशवसूत जन्मलेली खोली, तेथील पलंग, पाळणा तसेच शेजारील खोलीत महाराष्ट्रातील दिग्गज कवींनी रचलेल्या कविता, लेखक व त्यांचे फोटो असे संग्राहालय पाहिले. एकूणच मलगुंडच परिसर शांत व नारळी, फोफळीच्या बागांनी सजलेला दिसला.  तेथे समुद्रकिनारा पाहिला. समुद्रकिना:यावर अर्धा तास खेळून पुन्हा निघालो
गणपतीपुळेला गणपतीचे दर्शन घेण्यासाठी. तेथे गेलो तर ही भली मोठी रांग बहुदा एकादशी होती. त्यामुळे तब्बल दीड तास रांगेत उभे राहून गणरायाचे दर्शन घेतले. मंदिर छान आहे.  प्राचीन कलाकुसरीतील मंदिर व मूर्र्ती सुंदर आहे. ‘नवरा माझा नवसाचा’ पिक्चरमध्ये येथील शुटिंग आहे. वॉटर स्कूटर, मोटर, पॅडल बोट, बोटिंग या सुविधा एमटीडीसीने येथे उपलब्ध करून दिल्या आहेत. मंदिराशेजारील समुद्रकिना:यावर थोडा वेळ थांबून पोटाबा करण्यासाठी हॉटेल गाठले. एव्हाना दुपारचा 1 वाजला होता. तेथेच एका झाडावरून आंबे उतरवित होते. त्यातील एकाला गपचूप 50 रुपये दिले. त्याने पण खूश होऊन 1क् कै:या दिल्या. क:या कशाला देताय म्हटल्यावर तो म्हणाला,‘‘घरी घेऊनच जा मस्त पिकतील. आणि खरच घरी आल्यावर आठवडय़ात मस्त हापूस आंबा आणि तोही 50 रुपयांत. राईसप्लेट (शाकाहारी) खाऊन पावसाला जाण्यासाठी निघालो. येथील एकूणच सर्व जागा या नारळ, हापूस आंब्यांच्या बागांनी  सजलेले.





गणपतीचे दर्शन घेऊन पावसला निघालो. रत्नागिरीला कोतवडे मार्गे आलो.  नाणंजमार्गे जायचे नाही. अंतर 12 ते 15 किलोमीटरने वाढते. येथे आल्यावर दोन बंदर पाहिले.

भोगावती बंदर





एक भोगावती बंदर व दुसरे मार्गो बंदर येथे जवळच किल्ला आहे. पण वेळ नव्हता. येथे एका ठिकाणी समुद्राचे पाणी तापकीरी रंगाचे तर दुस:या ठिकाणी काळय़ा रंगाचे दिसले. मातीचा परिणाम. छोटय़ा बोटी दुरुस्ती व रंगरंगोटीसाठी येथे आलेल्या होत्या. दुपारचे 4 वाजले होते. अजून पावसला व तेथून लांजाला मामांकडे मुक्कामाला जायचे होते.

पावस :

 श्रीमत परमहंस सदगुरू स्वामी स्वरूपानंदमहाराजांचे येथे मंदिर आहे. मंदिर परिसर सुरेख असून, मंदिर मोठे आहे. येथे कमळाची फुले खूप लावलेली आहेत. वेळेअभावी पावस विषयी माहिती घेऊ शकलो नाही. या ठिकाणीही कोकणचा मेवा विकायला आलेला आपल्याला दिसतो. आंबे, कै:या, बोरं, फणस, फणस पोळी, आंबा पोळी, काजू,  असे विविध कोकणमेवा आपणाला भुलवतो. पावसला देसार्इ् बंधूची आंब्यांची झाडी पाहिली. एवढय़ा लांबून हे आंबे येतात हे पाहून आश्चर्य वाटले. पावसवरून निघाल्यावर सायंकाळी 6.3क् लांजा एसटी स्थानकाशेजारी पोहचलो. तेथून मामांना फोन करून बोलावून घेतले. तेही लगेच आले. मामाकडे सगळय़ांनी मुक्काम केला. त्यांचे घर लोकवस्तीपासून दूर. शांत ठिकाणी. मामांकडे त्यांनी लावलेली आंब्याची कलमे पाहिली. काजुची बाग दाखवली. ब:याच वर्षानी काजुची बी खाल्ली. थोडी तुरट, आंबट, गोड काय मस्त चव. वा. रात्री पोटभर जेवण करून. सकाळी पाहुणचार घेऊन निघालो. 9 वाजता त्यांचे घर सोडले
नंतर कळालेली माहिती : (लांजा - श्रीकालभैरव योगेश्वरी मंदिर, कोटचा सिध्दीविनायक, वनसुळे, एकखांबी गणपती मंदिर, मिल्लकार्जुन आदी मंदिर येथे आहेत.)
.

नाणिज मंदिर

 









 

दुस:या दिवशी नाणजला जायचे असल्याचे काकांनी सांगितले. स्वामी नरेंद्र महाराज यांचे जन्मस्थान असलेले नाणीज हे गाव. नाणिजधाम म्हणून प्रसिद्ध आहे. नाणिजला तर अखंड डोंगरावर मंदिर पाहून आश्चर्यचकितच व्हायला होते. अतिशय प्रशस्त जागा, सुंदर हिरवळ, मोठमोठी मंदिरे, सर्वत्र टापटिप. येथे गोरगोरिबांसाठी मोफत रुग्णसेवाही उपलब्ध आहे. मंदिराचा आकार संपूर्ण रथाचा केला असून, हा रथ दोन हत्ती ओढत असल्याच्या मोठय़ा आकारातील 15 या ठिकाणी आहेत. रथाची चाके सुद्धा चांगलीच मोठी आहे. संपूर्ण मंदिरातील आतील काम कोरीव लाकडात आहे. मंदिर परिसरात फोटो काढण्यास बंदी आहे. मंदिराशेजारी विश्व व काही पौराणिक देखावे आहेत. मंदिर पाहण्यास दीड तास लागतो. तेथून पुढे मार्लेश्वरला फाटा आहे. कोल्हापूरला 12क् किलोमीटर राहते. अंबा घाटमार्गे कोल्हापूरला जाण्यासाठी निघालो. देशावर व घाटाखाली जमिन, माती, दगड रंग बदलतात जातात. हे येथे दिसते.

जोतिबाचा डोंगर

अंबा घाटातून कोल्हापूरकडे जाताना वाटेत 21 किलोमीटरवर जोतिबाचा डोंगर लागतो. श्री ज्योतिबाच्या दर्शनाला गेलो. चैत्र महिन्यात ज्योतिबाच्या यात्रेला सुरुवात होते.  रविवारी व प्रत्येक पौर्णिमेला भक्तगण देवदर्शनासाठी गर्दी करतात.  सुमारे पाच हजार लोकवस्ती असणा:या या डोंगरावर बहुतांशी गुरव समाजातील लोक राहतात. दक्षिणा व शिधा हेच त्यांचे उत्पन्न आहे.  ज्योतिबाला सकाळी 8  ते 9  या वेळेत अभिषेक केला जातो. दुपारी 12 व रात्नी 9 वाजता ज्योतिबाची आरती होते. मंदिर रात्नी 11 पर्यंत दर्शनासाठी खुले असते.  आम्ही गेलो तेव्हा रविवार असल्यामुळे चांगलीच गर्दी होती. दर्शन न घेताच परत निघालो. वर्पयत गाडी जाते. काहीच अंतर चालवे लागते. डोंगरावर चांगलेच उन लागत होते. वारणा लस्सी पिऊन जोतिबाचा डोंगर सोडला.
कोल्हापूरला 11 ला पोचलो. गाडी पार्किग करायला तब्बल अर्धा तास गेला. महालक्ष्मीचे मंदिर मोठे आहे. रांगा सुद्धा चांगलीच मोठी होती. 1 तासानंतर देवीचे दर्शन घेतले. फक्त 10 ते 15 सेकंदात पुढे ढकले की झाले दर्शन. कोल्हापूरच्या देवीचे दर्शन घेऊन कोल्हापूरची बाजारपेठ हिंडलो. संध्यकाळी 5 ला कोल्हापूर सोडले. रात्री 9 ला घरी आलो.

 

कॉपी करू नका