Saturday, May 19, 2012

कोयना डॅम - चिपळूण - डेरवण - मार्लेश्वर - गणपतीपुळे

कोयना डॅम  - चिपळूण - डेरवण - मार्लेश्वर - गणपतीपुळे

चार दिवस सुट्टी टाकून सासरी हिंडण्याचा बेत ठरूवूनच गेलो होतो. सकाळी क्वॉलिस आली त्याने 6.15 ला निमगाव केतकी सोडले. संत ज्ञानेश्वर पालखी मार्गे नातेपुते शिखर ¨शगणापूरला गेलो. रस्ताच्या बाजुबाजूला ओसाड रान आहे. तर काही ठिकाणी उसाची शेती केल्याचे दिसून आले. उन्हाळा असल्याने ब:यापैकी गरम होत होते.

गोंदवलेकर महाराज

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज मंदिर पाहिले. भक्तांतर्फे  येथे मोफत प्रसाद वाटप केला जातो. यासाठी आजुबाजूच्या गावातून तसेच अन्य ठिकाणांहून भाजीपाला, गहू, तांदूळ, डाळी, कडधान्ये तसेच तेल टेम्पोच्या टेम्पो भरून मोफत वाटले जातात. या ठिकाणी दुपारी 12.30 वाजता महाप्रसादाचे वाटप केले जाते. वेळ नसल्याने आम्ही तेथून निघालो. हे ठिकाण सातारा पंढरपूर रस्त्यापासून सुमारे 64 किलोमीटरवर आहे. तेथून आम्ही 9 ला निघालो. नवीन मार्ग व नकाशा जवळ नसल्याने नक्की कोठून आलो ते कळले नाही. मात्र, येथे येण्यासाठी रोटीबोटीचा घाट लागला. वाटेत एका ठिकाणी थांबून काकूंनी घेतलेला उपमा पोटभरून खाल्यावर पुढे निघालो. वाटेत एका बागेत कै:या तोडण्याचा कार्यक्रम केला. तेथून उंब्रजफाटय़ाला आलो. एव्हाना 10.30 वाजले होते.


कोयना धरण








 
कोयना धरण परिसर पाहण्यासाठी निघालो. कुंभार्ली घाटाच्या खूप अलिकडे  कोयना धरणाकडे रस्ता आहे. रस्ता चांगला बांधला आहे. कोयना धरणाच्या पाण्यावर फुलविलेली मोठी बाग पाहिली. बागेत जाण्यासाठी 10 रुपये प्रवेश फी तर पार्किग 20 रुपये  आहे. बाग सुंदर असून, बागेतून धरण परिसर छान दिसतो.  तेथून कुंभाली घाटातून चिपळूणला जायला निघालो. उन्हाळय़ाचे दिवस असल्याने वाटेत दोन मोठे फणस विकत घेतले. मात्र, मुक्कामी गेल्यावर खराब असल्याचे कळले असो.  कुंभार्ली घाटातून चिपळूणला गेलो. वाटेत जाताना वाटते संगमेश्वर संभाजीमहाराजांना जेथे पकडले ते ठिकाण आहे. बरीच नावे अशी असल्याने पाहायचे राहून गेले. 

डेरवण : 

 




 

डेरवणला शिवसृष्टीचे शिल्प पाहण्यासाठी गेलो. चिपळूण डेरवण सावर्डमार्गे 2क् किमी अंतरावर आहे. श्रीसंत सीताराम बुवा आत्माराम वालावलकर यांचे डेरवण गावात वास्तव्य होते. त्यांच्या निकटविर्तयांनी श्री संत सीतारामबुवा वालावलकर चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली. दि. 5 मे 1981 रोजी श्री महाराजांनी शिवजयंतीच्या दिनी श्री शिवसमर्थ मंदिराचे उद्घाटन केले. कै. गणेश दादा पाटकर व सहका:यांनी पंधरा वर्षे अथक मेहनतीतून शिवशिल्पसृष्टी साकारली आहे. गडाच्या दरवाज्यासमोर दोन हत्ती आहेत. तटबंदीतून प्रवेश केल्यावर प्रथम दोन मावळे पहारा करताना दिसतात. स्वराज्याची शपथ, अफझलखान वध, बाजीप्रभू देशपांडे, शाहिस्तेखानाची फजिती असे अनेक प्रसंग येथे मूर्तीच्या स्वरूपात आहेत. शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे. या ठिकाणी फोटो काढण्यास बंदी आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी अश्वारूढ झालेले मावळे आपले लक्ष वेधून घेतात. सुमारे 150 ते 200 मावळे या ठिकाणी आहेत.  एव्हाना दुपारचे 2 वाजले होते. दुपारचे जेवण येथेच ओटापले.
नंतर कळालेली माहिती  - (डेरवणला शिवशिल्पसृष्टीपासून सुमारे दीड किमी अंतरावर एक मोठा राजवाडा आहे. राजेशिर्के यांचे वंशज येथे राहत असल्याचे समजले.)

मार्लेश्वर  : 

 



 

मार्लेश्वर जायला निघालो. मार्लेश्वरला जाणारा रस्ता घनदाट जंगलातून जातो. वेडीवाकडी वळणो घेत. 3 ला मार्लेश्वरला पोहचलो. मार्लेश्वरला शंकराचे मंदिर आहे. मंदिराला जाण्यासाठी अंदाजे 250 ते 300 पाय:या चढून जावे लागतात. पावसाळय़ात या ठिकाणी खरे जायला हवे. समोरून 500 ते 1000 फुटांवरून धबधबा कोसळत असतो. आम्ही गेलो तेव्हा धबधबा ज्या ठिकाणावरून कोसळतो त्या ठिकाणी फक्त पाण्याची बारीक  धार  दिसून येत होती.  सुमारे 3क् ते 35 मिनिटे चालण्यास लागतात. वाटेत पाय:या केल्यामुळे धमछाक चांगलीच होते. वरती शंकराच्या मंदिरात सापाचे दर्शन घडते असे म्हणतात. मंदिराभोवती माकडे भरपूर असल्याने चांगला वेळ गेला. मार्लेश्वरहून सायंकाळी  5 ला निघालो. एव्हाना गाडी लागल्यामुळे अनेक जागा बदल केले. शेवटी मलाही गाडी लागल्याने चांगलेच चक्करायला लागले. सायंकाळी 8. ला गाडी  गणपतीपुळे येथे आली. मुंबई-गोवा महामार्गावरील हातखांबा येथून र}ागिरीमार्गे गणपतीपुळेला जायला सुमारे 40 कि.मी.चा मार्ग आहे.

गणपतीपुळे


 

मग आला मुक्काम करण्याचा प्रश्न. काकांबरोबर गणपतीपुळेत आठ माणसांसाठी राहण्यास जागा मिळते का ते पाहायला गेलो. बराच ठिकाणी हुडकल्यावर एसटी स्टॅन्ड शेजारी दीक्षित यांचा हॉल मिळतो का ते पहा असे एका माणसाने सांगितले. त्यांचा फोन घेऊन त्यांना फोन केला. या म्हणाले. जागा म्हणजे मस्त पैकी एक मोठा हॉल होतो. मस्त सोय झाली. फॅमिली म्हणून एकूण 7क्क् रुपये त्यांनी घेतले. हॉलमध्ये सामान ठेऊन फ्रेश होण्यास गेलो. एव्हाना 9.30 वाजले होते. दिवसभर गाडीत बसून अंग चांगलेच चिंबून आले होते. 9.3क् जेवणासाठी म्हणून मालगुंडला एक चांगले हॉटेल असल्याचे दीक्षित यांनी सांगितले. तेथून मालगुंड दोन किलोमीटरवर होते. पुन्हा गाडीत बसून मालगुंडला गेलो तर तेथे जागा नसल्याचा बोर्ड पहायला मिळाला. निराश होऊन पुन्हा गणपतीपुळेमध्ये पोटाबासाठी हॉटेल शोधायला निघालो. अखेर एका ठिकाणी कशीबशी जागा मिळाली. जेवण बेताचेच होते. परंतु चालले. रात्री 10.30 जेवण संपवून पुन्हा हॉलमध्ये आलो. गप्पाटप्पा करून सगळे झोपलो. आमच्याबरोबर आणखीन एक कुटुंब हॉलमध्ये राहायला आले होते. तेवढीच सोबत मिळाली.

मालगुंड









दुस:या दिवशी सकाळी 6 ला उठून 9 वाजेर्पयत सगळे मालगुंडला कविवर्य केशवसूतांचा वाडा पाहण्यासाठी गेलो. टिपकल कोकणी वाडा कसा असतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा वाडा. शेणाने सरावलेली जमीन, बाहेर लाकडी झोका, आतमध्ये गाई, गुरांसाठी बांधलेला गोठा, केशवसूत जन्मलेली खोली, तेथील पलंग, पाळणा तसेच शेजारील खोलीत महाराष्ट्रातील दिग्गज कवींनी रचलेल्या कविता, लेखक व त्यांचे फोटो असे संग्राहालय पाहिले. एकूणच मलगुंडच परिसर शांत व नारळी, फोफळीच्या बागांनी सजलेला दिसला.  तेथे समुद्रकिनारा पाहिला. समुद्रकिना:यावर अर्धा तास खेळून पुन्हा निघालो
गणपतीपुळेला गणपतीचे दर्शन घेण्यासाठी. तेथे गेलो तर ही भली मोठी रांग बहुदा एकादशी होती. त्यामुळे तब्बल दीड तास रांगेत उभे राहून गणरायाचे दर्शन घेतले. मंदिर छान आहे.  प्राचीन कलाकुसरीतील मंदिर व मूर्र्ती सुंदर आहे. ‘नवरा माझा नवसाचा’ पिक्चरमध्ये येथील शुटिंग आहे. वॉटर स्कूटर, मोटर, पॅडल बोट, बोटिंग या सुविधा एमटीडीसीने येथे उपलब्ध करून दिल्या आहेत. मंदिराशेजारील समुद्रकिना:यावर थोडा वेळ थांबून पोटाबा करण्यासाठी हॉटेल गाठले. एव्हाना दुपारचा 1 वाजला होता. तेथेच एका झाडावरून आंबे उतरवित होते. त्यातील एकाला गपचूप 50 रुपये दिले. त्याने पण खूश होऊन 1क् कै:या दिल्या. क:या कशाला देताय म्हटल्यावर तो म्हणाला,‘‘घरी घेऊनच जा मस्त पिकतील. आणि खरच घरी आल्यावर आठवडय़ात मस्त हापूस आंबा आणि तोही 50 रुपयांत. राईसप्लेट (शाकाहारी) खाऊन पावसाला जाण्यासाठी निघालो. येथील एकूणच सर्व जागा या नारळ, हापूस आंब्यांच्या बागांनी  सजलेले.





गणपतीचे दर्शन घेऊन पावसला निघालो. रत्नागिरीला कोतवडे मार्गे आलो.  नाणंजमार्गे जायचे नाही. अंतर 12 ते 15 किलोमीटरने वाढते. येथे आल्यावर दोन बंदर पाहिले.

भोगावती बंदर





एक भोगावती बंदर व दुसरे मार्गो बंदर येथे जवळच किल्ला आहे. पण वेळ नव्हता. येथे एका ठिकाणी समुद्राचे पाणी तापकीरी रंगाचे तर दुस:या ठिकाणी काळय़ा रंगाचे दिसले. मातीचा परिणाम. छोटय़ा बोटी दुरुस्ती व रंगरंगोटीसाठी येथे आलेल्या होत्या. दुपारचे 4 वाजले होते. अजून पावसला व तेथून लांजाला मामांकडे मुक्कामाला जायचे होते.

पावस :

 श्रीमत परमहंस सदगुरू स्वामी स्वरूपानंदमहाराजांचे येथे मंदिर आहे. मंदिर परिसर सुरेख असून, मंदिर मोठे आहे. येथे कमळाची फुले खूप लावलेली आहेत. वेळेअभावी पावस विषयी माहिती घेऊ शकलो नाही. या ठिकाणीही कोकणचा मेवा विकायला आलेला आपल्याला दिसतो. आंबे, कै:या, बोरं, फणस, फणस पोळी, आंबा पोळी, काजू,  असे विविध कोकणमेवा आपणाला भुलवतो. पावसला देसार्इ् बंधूची आंब्यांची झाडी पाहिली. एवढय़ा लांबून हे आंबे येतात हे पाहून आश्चर्य वाटले. पावसवरून निघाल्यावर सायंकाळी 6.3क् लांजा एसटी स्थानकाशेजारी पोहचलो. तेथून मामांना फोन करून बोलावून घेतले. तेही लगेच आले. मामाकडे सगळय़ांनी मुक्काम केला. त्यांचे घर लोकवस्तीपासून दूर. शांत ठिकाणी. मामांकडे त्यांनी लावलेली आंब्याची कलमे पाहिली. काजुची बाग दाखवली. ब:याच वर्षानी काजुची बी खाल्ली. थोडी तुरट, आंबट, गोड काय मस्त चव. वा. रात्री पोटभर जेवण करून. सकाळी पाहुणचार घेऊन निघालो. 9 वाजता त्यांचे घर सोडले
नंतर कळालेली माहिती : (लांजा - श्रीकालभैरव योगेश्वरी मंदिर, कोटचा सिध्दीविनायक, वनसुळे, एकखांबी गणपती मंदिर, मिल्लकार्जुन आदी मंदिर येथे आहेत.)
.

नाणिज मंदिर

 









 

दुस:या दिवशी नाणजला जायचे असल्याचे काकांनी सांगितले. स्वामी नरेंद्र महाराज यांचे जन्मस्थान असलेले नाणीज हे गाव. नाणिजधाम म्हणून प्रसिद्ध आहे. नाणिजला तर अखंड डोंगरावर मंदिर पाहून आश्चर्यचकितच व्हायला होते. अतिशय प्रशस्त जागा, सुंदर हिरवळ, मोठमोठी मंदिरे, सर्वत्र टापटिप. येथे गोरगोरिबांसाठी मोफत रुग्णसेवाही उपलब्ध आहे. मंदिराचा आकार संपूर्ण रथाचा केला असून, हा रथ दोन हत्ती ओढत असल्याच्या मोठय़ा आकारातील 15 या ठिकाणी आहेत. रथाची चाके सुद्धा चांगलीच मोठी आहे. संपूर्ण मंदिरातील आतील काम कोरीव लाकडात आहे. मंदिर परिसरात फोटो काढण्यास बंदी आहे. मंदिराशेजारी विश्व व काही पौराणिक देखावे आहेत. मंदिर पाहण्यास दीड तास लागतो. तेथून पुढे मार्लेश्वरला फाटा आहे. कोल्हापूरला 12क् किलोमीटर राहते. अंबा घाटमार्गे कोल्हापूरला जाण्यासाठी निघालो. देशावर व घाटाखाली जमिन, माती, दगड रंग बदलतात जातात. हे येथे दिसते.

जोतिबाचा डोंगर

अंबा घाटातून कोल्हापूरकडे जाताना वाटेत 21 किलोमीटरवर जोतिबाचा डोंगर लागतो. श्री ज्योतिबाच्या दर्शनाला गेलो. चैत्र महिन्यात ज्योतिबाच्या यात्रेला सुरुवात होते.  रविवारी व प्रत्येक पौर्णिमेला भक्तगण देवदर्शनासाठी गर्दी करतात.  सुमारे पाच हजार लोकवस्ती असणा:या या डोंगरावर बहुतांशी गुरव समाजातील लोक राहतात. दक्षिणा व शिधा हेच त्यांचे उत्पन्न आहे.  ज्योतिबाला सकाळी 8  ते 9  या वेळेत अभिषेक केला जातो. दुपारी 12 व रात्नी 9 वाजता ज्योतिबाची आरती होते. मंदिर रात्नी 11 पर्यंत दर्शनासाठी खुले असते.  आम्ही गेलो तेव्हा रविवार असल्यामुळे चांगलीच गर्दी होती. दर्शन न घेताच परत निघालो. वर्पयत गाडी जाते. काहीच अंतर चालवे लागते. डोंगरावर चांगलेच उन लागत होते. वारणा लस्सी पिऊन जोतिबाचा डोंगर सोडला.
कोल्हापूरला 11 ला पोचलो. गाडी पार्किग करायला तब्बल अर्धा तास गेला. महालक्ष्मीचे मंदिर मोठे आहे. रांगा सुद्धा चांगलीच मोठी होती. 1 तासानंतर देवीचे दर्शन घेतले. फक्त 10 ते 15 सेकंदात पुढे ढकले की झाले दर्शन. कोल्हापूरच्या देवीचे दर्शन घेऊन कोल्हापूरची बाजारपेठ हिंडलो. संध्यकाळी 5 ला कोल्हापूर सोडले. रात्री 9 ला घरी आलो.

 

Saturday, June 11, 2011

चिपळूण-विध्यंवासिनी-हेदवी-गुहागर-व्याडेश्वर

करंजेश्वरी देवी








चिपळूण हे मुंबई-गोवा हायवेवरील एक प्रसिद्ध ठिकाण आहे. चिपळुणला परशुरामाचे पुरातन काळी बांधलेले मंदिर आहे. निसर्गरम्य कोकणात भगवान परशुरामांच्या भूमीत वाशिष्ठी नदीच्या तिरी गोविंदगडाच्या पायथ्याशी गोवळकोट येथे श्री देव सोमेश्वर व देवी करंजेश्वरीचे भव्य मंदिर आहे. अनेक कोकणस्थ लोकांची कुलस्वामिनी म्हणून करंजेश्वरी देवी प्रसिद्ध आहे. .चिपळूण पासून जवळ सुमारे 4 किलोमीटरवर असलेल्या गोवळकोट किल्ल्याच्या पायथ्याशी हिचे मुख्य स्थान असून मंदिर अतिशय सुंदर व निसर्ग रम्य परिसरात आहे . गोवळकोट किल्ल्यामध्ये रेडजाई देवीचे स्थान आहे. देवीच्या समोर सोमेश्वर महादेवाचे स्थान आहे. पटवर्धन, दीक्षित आडनावाच्या लोकांची ही कुलदेवता आहे. तर गुहागर येथील व्याडेश्वर कुलदैवत आहे.

कथा : करंजेश्वरीचा शिमगोत्सव प्रसिद्ध आहे. नवरात्रोत्सवात येथे मोठी गर्दी असते. जागृत व पवित्न देवस्थान म्हणजे श्री देवी करंजेश्वरी. शहरातील पेठमाप गोवळकोट भागातील ग्रामस्थांचे हे ग्रामदैवत आहे. पूर्वीच्या काळी एका करंजीच्या झुडपात ही देवी प्रकट झाली. म्हणून तिला करंजेश्वरी असे नाव पडले. ती ज्या झुडपात प्रकाट झाली, तेथील जागेला शिंगासन असे म्हटले जाते. प्रकट झाल्यानंतर देवीने एका कुमारिकेला हळद-कुंकू आणण्यास सांगितले. कुमारिका हळदी-कुंकू आणण्यास गेल्यानंतर देवी अदृश्य झाली. ती पुन्हा गोवळकोट येथे प्रकट झाली. नंतर एका भक्ताच्या स्वप्नात येऊन तिने सांगितले की, करंजीच्या झुडपात नाकातील मोती अडकला आहे. तो घेऊन या. त्यानुसार तेथे मोती सापडला. ही घटना 300 ते 350 वर्षांपूर्वीची आहे, असे सांगितले जाते. त्यामुळे या देवीचे कुलभक्त आजही करंजीचे तेल वापरत नाहीत.
किल्ल्यात सध्या वस्ती नाही. सागराकडून येणारा व्यापारी मार्ग या खाडीतून येत असल्याने चिपळूणला बंदर म्हणूनही महत्त्व प्राप्त झालेले होते. या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी खाडीच्या मुखावर अंजनवेलचा गोपाळगड तर खाडीच्या आतील भागात चिपळूणचा गोवळकोट हा किल्ला उभारला गेला. गोवळकोट खाली बहुतांश मुस्लिम  वस्ती  आहे. उत्सवात सोमेश्वर व करंजेश्वरीच्या पालख्या मशिदीजवळ जातात. तेथे मुस्लिम समाजातील मानक:यांच्या हस्ते देवीची पूजा केली जाते. त्यानंतर होळी लावली जाते. पालखी गोविंदगडावर रेडजाई देवीच्या भेटीसाठी जाते. तेथे जगताप यांच्या हस्ते देवीची पूजा होते. हजारो महिला खणा-नारळाने देवीची ओटी भरतात आणि नवास बोलतात. नवसाला पावणारी देवी असा करंजेश्वरीचा लौकिक आहे. येथे राहण्याची सोय आहे. फक्त नवरात्रत जागा उपलब्ध आहे की नाही याची चौकशी करूनच मुक्कामाला जायला हवे. शक्यतो नवरात्रत जागा मिळणो कठीण असते.

कालभैरव व श्रीदेवी जोगेश्वरी :

श्री. देव जुना कालभैरव व श्रीदेवी जोगेश्वरी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सुप्रसिध्द ग्रामदैवत जागृत श्री जुना कालभैरव व श्रीदेवी जोगेश्वरीचे पुरातन मंदिर वसले आहे. हे देवस्थान श्रीक्षेत्र परशुरामांशी संबंधित आहे. 

विध्यंवासिनी  :



मुंबई-गोवा हायवेवर चिपळूण सोडल्यानंतर सुमारे 2 ते 3 किलोमीटर अंतरावर डाव्या गोव्याकडे जाताना डाव्या हाताला विध्यंवासिनी मंदिराकडे जाणारा फाटा लागतो. श्री देवी विध्यंवासिनी रावतळे येथील डोंगरात 




 श्री देवी विंध्यवासिनीचे पुरातन जागृत देवस्थान आहे. भारतातील बारा शिक्तपीठांपैकी विंध्यवासिनीचे मुख्यपीठ उत्तरप्रदेशात विंध्याचल येथे आहे. वसुदेव देवकीचे अपत्य समजून तिला कंसाने शिळेवर आपटण्यासाठी उचलले त्याचक्षणी ती कंसाच्या हातातून निसटून अंतराळात गेली आणि विंध्याचल येथे प्रकटली. तीच विंध्यवासिनी देवी होय. अशी येथे माहिती आहे. मंदिराच्या पाय:या चढून जाण्याच्या आधी डावीकडे अगिस्त कुंड लागते. यात बारमाही पाणी असत. मंदिरा शेजारी कोयना जलविद्युत केंद्राची भुकंप शाळा आहे. मंदिराच्या शेजारील मोठे धबधबे आहेत. मंदिरात नवरात्नौत्सव, त्रिपुरारी पौर्णिमा दर मंगळवार, शुक्र वार गर्दी असते. ¨जोशी यांची ही देवी आहे. शेजारी मोठा पाण्याचा कुंड असून, मागील डोंगरामधून मोठा धबधबा कोसळतो. त्याचे पाणी कुंडात येते.  

व्याडेश्वर





चित्पावन ब्राह्मण घराण्यांमध्ये जास्तीत जास्त घराण्यांचे कुलदैवत हे गुहागर येथील समुद्रतीरी श्री क्षेत्र व्याडेश्वर होय. व्याडेश्वरला शंकराचे मंदिर आहे.  गुहागर गावामध्ये बस स्टॅंडचे जवळच हे मंदिर आहे. 



 देवळाभोवती प्रशस्त व स्वच्छ जागा आहे. येथे निवासाची सोय  आहे.  या मंदिराचे वार्षिक उत्सव हे त्रिपूरी पौर्णिमा व महाशिवरात्र आहे. मंदिराच्या मागे पाच मिनिटांवर समुद्रकिनारा असून नारळी पोफळीच्या बागा आहेत.

गुहागर


चिपळूणपासून 45 किलोमीटर गुहागरचा समुद्रकिनारा आहे. शेजारीच 5 मिनिटांच्या अंतरावर व्याडेश्वराचे मंदिर आहे. समुद्रकिनारा मोठा व स्वच्छ आहे.

श्री दशभुज लक्ष्मीगणोश - हेदवी




    गुहागर पासून 25 किलोमीटर अंतरावर हेदवी हे गाव आहे. तटबंदीने वेढलेले थोड्या उंचीवरील  मंदिर वर चढून जाण्यासाठी पाय:या आहेत.  पेशवेकाळात केळकर स्वामी नावाचे गणोशभक्त राहत होते. त्यांची पुण्याला पेशव्यांशी भेट झाली असता त्यांना वर्तवलेल्या काही घटनांची साक्ष पटल्यामुळे  पेशव्यांनी त्यांना त्या काळी मंदिर बांधण्यासाठी पैसे दिले. त्या पैशातून हे मंदिर उभारले. गणपतीची मूर्ती काश्मीर मधील पाषाणापासून बनवलेली आहे. दहा हातांची ही मूर्ती आहे. मूर्तीचे डोळे काळेभोर असून अत्यंत रेखीव आहेत. मंदिरात कोठेही उभे राहून दर्शन घेतले असता ती आपल्याकडेच पाहत आहे असे वाटते.मंदिर आवारातच दीपमाळही आहे  मंदिर परिसरात असलेली गर्द आंब्याची झाडे आहेत.  दर संकष्टी व विनायक चतुर्थीला येथे भाविकांची गर्दी असते. हेदवी गावाजवळ स्वच्छ व सुंदर समुद्रकिनारा आहे. श्री उमा महेश्वर मंदिर  हेदवीच्या समुद्रकिनारी डोंगराच्या पायथ्याशी उमा महेश्वराचे मंदिर आहे. अहल्याबाई होळकरांनी दिलेल्या देणगीतून हे मंदिर उभारल्याचे सांगितले जाते. समुद्रकिनारी खडकाळ भागात थोड्या उंचीवर असलेल्या या मंदिरापर्यंत भरतीचे पाणी येते. गाभा:यात एक शंकराची पिंड असून मंदिराजवळच एक पाण्याचे कुंडदेखील आहे.





बामणघळ

बामणघळ हेदवीचा किनारा हा स्वच्छ असून सुरिक्षत आहे. उमा महेश्वर मंदिराच्या बाजुने डोंगराच्याकडेने चालत गेल्यास पुढे खडकात पडलेली एक मोठी भेग दिसते. भरतीच्या वेळेस येथे उंच लाट उसळते. डोंगरावर समुद्राचे पाणी आदळून एक अरुद घळ तयार झाले आहे. पाण्याच्या अंदाज येत नाही त्यामुळे जरा सावध राहायला हवे.

जायचे कसे


- पुणो - ताम्हिणी घाट मार्गे - वेळे - निजामपूर - माणगाव- महाड- पोलादपूर- खेड- चिपळूण
- वरंधा घाट मार्गे- पुणो - सातारा रोडने  कापूरव्होळ - भोर/ वरंधा घाट महाड - पोलादपूर- खेड- चिपळूण 
- महाबळेश्वर घाट  मार्गे- पुणो - सातारा रोडने  खंबाटकी घाट ओलांडल्यानंतर वाई फाटा- वाई- पाचगणी - 
- महाबळेश्वर - पोलादपूर- खेड- चिपळूण 
- उंब्रज मार्गे पाटण- कोयनानगर- चिपळूण (चांगला मार्ग आहे.)

Wednesday, April 20, 2011

गोवा पर्यटन..!



गोवा पर्यटन..!


बरेच दिवस गोव्याबद्दल एकत होतो. 4 दिवस सुट्टी काढून गोव्याला जायला निघालो. बरेच दिवस कुठे बाहेर गेलो नसल्याने यावर्षी कुठेतरी लांब ¨हडायला जायचे ठरले. अर्थातच सुमद्रकिनारी. मग माहिती घेऊन गोव्याला जाण्याचे पक्के केले. सुरेश परबच्या मित्रने लगेच ओळखीचे कळंगुटला हॉटेल बुक करून दिले. तेथे मुक्काम करण्याची चांगली सोय झाली.
गोव्यातील पर्यटनाची सुरूवात या राजधानी असणा-या पणजी शहरापासूनच होते. गोव्यात प्रामुख्याने उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा असे दोन विभाग आहेत. पणजी हे शहर उत्तर गोव्यात आहे. गोव्यात जाण्यासाठी योग्य वेळ म्हणजे ऑक्टोबर ते मार्च हा काळ होय.






आमचा प्रवास

सायंकाळी 4 ला पुण स्टेशनवरून निजामउद्दीन-वास्को द गामा रेल्वेने प्रवास सुरू झाला. वाटेत उरळीकांचनला पोलिसांनी दरवाजे बंद करण्याच्या सूचना दिल्या. घरून आणलेले जेवण जेऊन रात्रभर प्रवासाचा आनंद घेत जागलो. मिरज जंक्शनला गाडी थांबली तेथून बराच वेळ जागा होतो. मडगाव रेल्वेस्टेशनवर सकाळी 7 ला उतरलो. तेथून बसची सोय पटकन होत नाही. प्रायव्हेट कार आहेत मात्र त्या पणजीला घेऊन जाण्यासाठी 1000 रुपये मागतात. अर्थातच रेल्वेस्टेशनवरून थोडे अंतर चालून गेल्यावर मोठय़ा रस्तावर आलो. तेथून पणजीला जाणा:या कदंबच्या बसेस आहेत.  अतिशय स्वस्त दर आहेत. किरकोळ तिकीट असते. 10 रुपये, 5 रुपये असे. पणजी येथे राज्यातून बसेस येतात. गोव्यात सर्वच ठिकाणी बसेस उपलब्ध आहे. चौकशी करून पणजीहून कळंगुटला जाणारी बस पकडली.
कळंगुटला पोहचल्यावर हॉटेलमध्ये जाऊन रुम ताब्यात घेतली. फ्रेश होऊन लगेच बिचवर जायचे ठरले. उन्हाळा असला तरी ढगाळ वातावरणामुळे उन जाणवत नव्हते. कळंगुटपासून बस करून जवळच असलेल्या बिचवर गेलो. उन नसले तरी समुद्राची वाळू गरम गरम पायाला भाजत होती. किना:यावर एक मोठे जहाज दुरुस्तीसाठी लंगर टाकून थांबले होते. एवढे मोठे जहाज प्रथमच प्रत्यक्ष पाहत होतो.

कळंगुट बीच




 
बागा बीच - कलगुंट आणि अंजुना बीचच्या मधे हा बीच आहे. म्हापसा येथून 1 कि.मी. अंतरावर हा बीच आहे. इतर समुद्रकिना:यांच्या तुलनेत इथे गर्र्दी थोडी कमीच मिळाली. हॉटेल्स चांगले आहेत. पणजीपासून हा बिच 6 किलोमीटरवर आहे. आमच्या हॉटेलपासून हा बिच 1 किलोमीटरवर होता. त्यामुळे दोन-तीनदा या बिचवर जाऊन आलो.
हॉटेल मालकाला विचारून तेथून टुरिस्ट बस बुक केली. बस सकाळी 7 ला येणार होती. दुस:या दिवशी टूर कंपनीची बस आली. आम्ही तयार होतो. हॉटेल खाली एक छोटे हॉटेल होते. तेथे उपमा व चहा चांगला पोटभर खाल्ला. माणसी 250 रुपये असे या टूरचे पॅकेज होते. प्रथम नॉन एसीचे दर दिले होते. मात्र, टूरवाल्याने एसी चालू करून 50 रुपये जादा घेतले.
प्रथम त्यांनी जुन्या पणजीला बस नेऊन तेथील प्रेक्षणीय स्थळे दाखवायला सुरूवात केली.

सेंट झेवियर्स  चर्च 





गोव्यातील एक ख्रिस्त धर्म प्रसारक सेंट झेवियर्स  यांचे मृत शरीर या चर्चमध्ये एका पेटीत जतन करून ठेवले आहे. दर 10 वर्षांनी हे शरीर दशर्नासाठी बाहेर काढले जाते. या चर्चमधील कोरीव नक्षीकामही उत्कृष्ट आहे. गोव्यातील सर्वाधिक लोकप्रिय चर्च आहे. येथे संघम चित्रपटातील बरेचसे शुटिंग झाले आहे. चर्च मोठे असून, या चर्चसमोर रस्ता ओलांडून आणखीन एक चर्च आहे.  
 

चर्च ऑफ अवर लेडी ऑफ रोजरी

गोव्याच्या प्राचीन चर्चपैकी हे एक चर्च आहे.  पोर्तगीज अल्फान्सो दी अलबुकर्क सन 1590 मध्ये या चर्चमध्ये आले होते. त्याचा तपशील येथे दिला आहे. चर्चमध्ये चित्रे रेखाटण्यात आली आहेत.



तेथून पुढे टूरवाल्यांनी प्राचीन गोवा संग्राहलाय दाखवायला नेले. प्रवेश फी फक्त 250 रुपये प्रति माणसी असल्याने अर्थातच पाहिले नाही. बघणा:यांनी सुद्धा जास्त काही खास नसल्याचे सांगितले.दुपारी 12.30 ला त्यांच्या ओळखीच्या हॉटेलमध्ये नेऊन जेवण करण्यास सांगितले. जेवण करून श्री शांतादुर्गा मंदिर पाहण्यास निघालो.

श्री मंगेश मंदिर





पणजीपासून 23 किलोमीटरवर असलेल्या फोंडा येथे हे भगवान शंकराचे भव्य मंदिर आहे.  पांढ:या शुभ्र रंगाने मंदिर रंगवलेले आहे. मंदिरा समोर एक उंच दीपमाळ आहे. ही दीपमाळ भव्य आणि सुंदर आहे. मंदिराच्या समोरच एक बांधकाम केलेलं स्वच्छ पाण्याचं तळं आहे.  पांढ:या शुभ्र रंगाचे हे मंदिर आहे. मंदिर 400 वर्षे जुने असल्याचे येथे सांगितले जाते. चहूबाजूने हिरवळ व डोंगरांनी वेढलेले आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे हे गाव.


शांतादुर्गा मंदिर 

पणजीपासून अंदाजे 33 कि.मी. अंतरावर असणा:या कवळे  या ठिकाणी हे श्री शांतादुर्गा मंदिर आहे. या मंदिराचा कळस सुंदर आहे. गोव्यात पाऊस जास्त. त्यामुळे  येथील मंदिराचे रुप सुद्धा महाराष्ट्रातील मंदिरांपेक्षा वेगळे दिसले. ािस्ती धर्म, पोर्तगीज धर्मचा येथील मंदिर बांधणीवर असलेला प्रभाव चांगला दिसला. मंदिर सुरेख आहे.


मत्सालय








नाव आठवत नाही पण मत्सालय पाहायला गेलो. या मत्सालयात 5क् रुपये तिकीट होते. पैसे वसूल झाले. वेगवेगळय़ा जातीचे मासे येथे होते. हातात जिवंत लॉबस्टर आपल्याला येथे पकडता येतो. अर्थात तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच.

दोना पोला






प्रेमी युगुलांचे आकर्षण असलेले हे ठिकाण असून, या ठिकाणी दोना आणि पोला या दोन प्रेमी युगुलांच्या प्रेमाची आठवण करून देणारा त्यांचा पुतळा आहे. येथे एक दुजे के लिय, सिंघम हे चित्रपट शुटिंग केले आहे.

वाघातोर बीच

पणजी शहरापासून 24 कि.मी. अंतरावर हा बीच आहे. हा बीच आपल्याला एक दुजे के लिए या चित्रपट सुद्धा येथेच शूट केला.

संध्याकाळी 6 ला पणजीला परत आलो. तेथे मांडवीनदीत पर्यटकांसाठी खास छोटय़ा लॉचवर असतात. त्याचे दर माणसी 150 रुपये आहे. जहाजावर पर्यटकांच्या मनोरंजनासाठी खास ऑर्केस्ट्राची सोय केलेली असते. या पार्टीत आपल्याला कोकणी-मराठी गाणी आणि नृत्याचा कार्यक्रम पाहायला मिळतो. आपणाला यात सहभागी करून घेतात. मांडवी नदीतून रात्री केला जाणारा हा फेरफटका मनाला भुरळ घालतो. नदीत दिसणारी मोठ-मोठी कॅसीनो हॉटेल्सही आपल्याला दिसतात.

 रात्री 8.30 ला पुन्हा कळंगुटला टूर बसने सोडले. तेथून पुन्हा कळंगुट बिचवर जेवणासाठी गेलो. येथे बाजारपेठ छान आहे. पण पुण्यातील तुळशीबागेत जे मिळते. ते इथेही मिळते. त्यामुळे खरेदीचा मोह टाळला. किरकोळ खरेदी करून हॉटेलवर परतलो.

दुस:या दिवशी संध्याकाळी 7.30 ला पुण्याला जाणारी आमची नीता ट्रॅव्हल्सची बस होती. कळंगुटला पोहचल्यानंतर पुण्याला परतीसाठी प्रथम बुकिंग केले. न जाणो गाडीच मिळाली नाही तर. पणजीतून मापस्याला नीता ट्रॅव्हल्सची बस येणार होती. दुपारी 12.30 ला कळंगुट सोडले. तेथून मापश्याला आलो. 






अंजुना बिच

मापश्याहून अंजुना बिच बघायला गेलो. किरकोळ दर असल्याने बसमध्ये बसून सुमारे अर्धा तासाने बिचवर पोहचलो. गाडी दुस:या मार्गाने जाणार असल्याने त्या महाभागाने वाटेत सोडले मग सुरू झाला 1.5 किलोमीटरचा पायी प्रवास. पाठीवर भलीमोठी बॅग. अध्र्या तासाने घामाघुम होऊन एका हॉटेलमध्ये जेवण उरकले. तेथून अंजुना बिच पाहायला गेलो. हा सुद्धा छान बिच आहे. विशेष करून बाहेरील देशातील बहुसंख्य पर्यटक येथे उन खाण्यासाठी येतात. आम्ही गेलो तेव्हा तसे काही नव्हते. तेथून परत मापश्याला गाडीने आलो. 



मापसा :

मापसा येथे मोठी बाजारपेठ असून, तेथे काजू विक्री मोठय़ा प्रमाणावर होते. आम्ही गेलो तेव्हा गावाचा बाजार असल्याने गावागावातून आलेले ग्राहक व पर्यटकांमुळे येथे जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. पुण्यातील स्वारगेटप्रमाणो या ठिकाणांहून बाहेर जाणा:या म्हणजे पुणो, मुंबईकडे जाणा:या बसेस येतात. काजू, बदाम, वेगवेगळय़ा भाज्या, कपडे, कधीही न बिघतलेल्या भाज्या पाहण्यात चांगलाच वेळ गेला. तेथून बसची वाट पाहण्यासाठी थांबलो. सायंकाळी 7.45 ला गाडी आली. तोर्पयत गाडी येते का नाही याची भीती वाटत होती. नाहीतर पुन्हा काळंगटला परत यावे लागणार होते. पणजीतून गाडी सुटते व मापसाला येते. येथून पुण्याला जाते. येथेही बुकिंग करता आले असते. बस स्लिपरकोच असल्याने कधी झोप लागली ते कळलेच नाही.

समुद्रकिना:यापासून ते चर्च, मंदिरे, श्रीमंतांचे कॅसीनो आदी येथे सर्व काही इथे पाहायला मिळते. समुद्रकिना:यावर पोहण्याचा मनसोक्त आनंद लुटणारे परदेशी पाहुणो..भव्य-दिव्य आणि उत्कृष्ट कलाकुसर असणारी चर्च..मंदिरे..उंच नारळाची हिरवीगार झाडी..समुद्रतील छोटी मोठी गलबते.. पाहून गोवाला परत येण्याचा निश्चिय करून परतीचा मार्ग धरला. 

काही टिप्स :

1) गर्दीच्या वेळी गोव्याला मुक्काम करणो अवघड आहे. 

2) स्वत:ची गाडी असली तरी टुरिस्ट बस करणो केव्हाही परवडेल कारण गोव्यातील काही ठिकाणो बरीच लांब आहेत. तसेच अनोळखी रस्ते शोधत बसण्यापेक्षा पैसे देऊन प्रवासाचा आनंद लुटावा हेच बरे.
3) काही बिचेस जवळ जवळ आहेत. त्यामुळे कदंब ट्रान्सपोर्टची सोय उपलब्ध आहे. किरकोळ तिकीट असते.


कॉपी करू नका