तुळापूर
रविवार होता. ‘एलबीटी’मुळे सर्व दुकाने आठवड्यानंतर सुरू झाली होती. सकाळीच खरेदी केल्याने संध्याकाळी फिरायला जायचे असे ठरवून जवळ असल्या तुळापूरला जायचे ठरले. अवघ्या महाराष्ट्राचे श्रद्धास्थान श्री छत्रपती शिवाजीमहाराज व त्यांचे सुपूत्र धर्मवीर संभाजीमहाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली तुळापूर येथील भूमी पुण्यापासून काहीच अंतरावर आहे. त्या विषयी...
तुळापूर :
आदिलशाही दरबारातील वजिर मुरारपंत जगदेव यांनी ठिकाणी हत्तीला तराफ्यात उतरवून त्याचे वजनाइतके सोने दान केले अशी एक गोष्ट सांगण्यात येते. यावरूनच गावाला तुळापूर नाव पडले. तुळापूर पुणे जिल्ह्यातील एक छोटेसे गाव. पूर्वीचे नाव 'नांगरवास' असे होते. भीमा, भामा आणि इंद्रायणी नद्यांच्या त्रिवेणी संगमावर असलेले छोटेसे गाव. तुळापुर आळंदी पासून अंदाजे १४ किलोमीटरवर तर पुण्यापासून ३० किलोमीटरवर आहे. येथे महाराष्ट्रातील नद्यांचा दुर्मिळ त्रिवेणी संगम पहावयास मिळतो. श्रीक्षेत्र आळंदीकडून वाहत येणारी इंद्रायणी नदी, भीमाशंकरच्या दाट जंगलात उगम पावलेली भीमा व तिची उपनदी भामा या तीन मोठ्या नद्यांचा संगम तुळापूर येथे झाला आहे. येथे संगमेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. तुळापूर येथे संभाजी महाराजांची समाधी आहे.
संगमेश्वर मंदिर
तुळापूरला श्री शंकराचे जुने मंदिर होते. काही कालावधीनंतर हे मंदिर श्री संगमेश्वर मंदिर म्हणून प्रसिद्ध झाले. इसवी सन १६३३ च्या सुमारास आदिलशाही दरबारातील वजिर श्री मुरारपंत जगदेव यांनी स्वामी रुद्रनाथ महाराज यांच्या आज्ञेचे पालन करून श्री संगमेश्वर मंदिराची डागडुजी केली. येथे वास्तव्यास असताना छत्रपती शहाजी महाराज तसेच बालशिवाजी दोघेही संगमेश्वराची पूजा करीत असत. येथील संगमावर मोठा नदीघाट उभारला असून, बोटिंगची सोय उपलब्ध करून दिली आहे. माणसी ३० रुपये प्रमाणे आपल्याला नदीतून एक चक्कर मारता येते. निरगुडकर फाउंडेशनद्वारा येथे संभाजीमहाराजांचे स्मारक उभारण्यात आले आहे.
तमाम शिवप्रेमींची ही श्रद्धास्थाने. तुळापूरपासून जवळच असलेले वढू बुद्रुक आणि तुळापूर ही भीमा नदीतीरावरची ही पवित्र स्थाने. या दोन गावांना ऐतिहासिक फार महत्व आहे. या भूमीत छत्रपती संभाजी महाराजांवर अंतिम संस्कार झाले. औरंगजेबाने अमानुष व क्रुरतेने संभाजी महाराजांचा अंत केला आणि शरीराचे तुकडे अस्ताव्यस्त भीमेच्या किनारी टाकून दिले. त्या सर्व इतिहासाची साक्षीदार ही भूमी आहे. शंभूराजे आणि कवी कलश यांना औरंगजेबाने साखळदंडात कैद करून तुळापूर येथे आणले होते. फाल्गुन अमावस्येला ११ मार्च १६८९ रोजी संभाजीराजांची शिरच्छेद करून भीमा आणि इंद्रायणी नदीच्या संगमावरील तुळापूर येथे हत्या करण्यात आली होती. वढू बुद्रुक आणि तुळापूर या दोनही ठिकाणी संभाजी महाराजांची समाधी आहे. वढूपासून तुळापूर ५ ते ६ किलोमीटर अंतरावर आहे. वेळेअभावी मला वढूला जाता आले नाही. औरंगजेबाने जेव्हा संभाजी महाराजांच्या शरीराचे तुकडे इकडेतिकडे फेकून दिले त्या वेळी प्रत्येक मराठी माणूस हादरून गेला. आपला राजाचा क्रुरतेने केलेला अंत येथील जनतेला कळल्यावर अंतिम संस्कार योग्य रीतीने व्हायला पाहिजे असे वाटले. वढूच्या ग्रामस्थांनी यात पुढाकार घेतला. जीव धोक्यात घालून, भीमानदी रात्रीत ओलांडून व मुगली सैन्याला चकवून त्यांनी संभाजी महाराजांची मिळतील ती अंगे गोळा केली आणि विधिवत अंतिमसंस्कार केले.
संभाजी राजे :
संभाजीराजांचा जन्म छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी सईबाई यांच्या पोटी जेष्ठ शु. १२, शके १५७९ (14 मे 1657चा.) रोजी पुरंदर गडावर झाला. राजे केवळ २ वर्षांचे असतानाच सईबाई वारल्या. सईबार्इंच्या मागे राजमाता जिजाबाई शंभूराजांच्या पालनपोषणाची सर्व व्यवस्था पाहू लागल्या. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबरील आग्रा भेटीत त्यांना राजकारणाचे धडे शिकू लागले. या काळात महाराजांच्या बरोबर त्यांच्या अनेक पैलुंचा, गुणांचा संभाजीराजांवर नकळतपणे प्रभाव पडला. विद्याभ्यास, शस्त्रविद्या, दरबारातील कारभार, युद्धविद्या, सैन्याचे नेतृत्व या गोष्टीत संभाजी राजे पारंगत होते. राजांचे संस्कृत व हिंदी या भाषांवरही विलक्षण प्रभुत्व होते. त्यांनी ४ काव्यग्रंथ लिहिले आहेत. त्यांच्या ‘बुधभूषण’ या संस्कृत ग्रंथात केवळ ९ वर्षांच्या कालखंडात राजांनी १२८ लढाया जिंकून शिवाजीमहाराजांचे नाव राखले.
संभाजीराजांचा वाढता पराक्रम औरंगजेबाला घाबरून सोडणारा होता. पूर्ण ताकदीनिशी औरंगजेब सुमारे सात लाख सैन्यासह स्वराज्यावर चालून आला. संभाजी राजांकडे सैन्य होते केवळ तीस ते पस्तीस हजार. 1689 मध्ये राजे विशाळगडाकडून रायगडाकडे जाताना संमगमेश्वर येथे मुक्कामी थांबले होते. 1 फेब्रुवारी 1689 ला आपला सख्खा मेहुणा गणोजी शिर्केयाच्या फितुरीमुळे संगमेश्वर या ठिकाणी मुकर्रबखान या मोगली सरदाराने त्यांना ताब्यात घेतले. तेथून धिंड काढत अतिशय क्रूरपणो 15 फेब्रुवारी 1689 या दिवशी पेडगावच्या किल्यात औरंगजेबासमोर राजांना आणण्यात आले. धर्म बदलण्याची अट लाथाडून धर्मनिष्ठ राजांनी मरण पत्करले. 12 मार्च 1689 या दिवशी गुढीपाडवा होता. गुढीपाडवा हा हिंदुचा मोठा सण. या सणाच्या दिवशी त्यांचा अपमान करण्यासाठी 11 मार्चच्या फाल्गुन अमावस्येला संभाजीराजांची हत्या करण्यात आली. राजांना तुळापूर येथे आणण्यात आले. त्यांच्या देहाचे हाल करण्यात आले. मृत्युसमयी राजांचे वय अवघे 32 होते.
महाराजांच्या पराक्रमाने, शौर्याने ही भूमि पावन झालेली आहे. संभाजीराजांबद्दल वाचून व ऐकून अंगावर आजही काटा उभा राहतो. अशा ह्या परमप्रतापी धर्मविर संभाजी महाराजांच्या समाधीस्थळास एकदा तरी प्रत्येकाने भेट अवश्य द्यायला हवी.
तुळापूरहूनजवळच असलेल्या वाघोलीकडे जाण्याकडे निघालो. वाघोली हे पुणे-नगर रस्त्यावरील प्राचीन गाव. येथे वाघेश्वराचे जुने मंदिर आहे. तुळापूरहून निघाताना संध्याकाळचे ६.३० वाजले होते.
वाघाच्या जबड्यात घालुनि हात मोजुनि दात...
बलिदान
स्थळाकडे जाणाºया मुख्य प्रवेशद्वाराच्या कमानीवर हे शिल्प बसविले आहे.
छत्रपती संभाजीमहाराज यांचे मनाला स्फूर्ती देईल असे शिल्प आहे. रायगडच्या
पायथ्याला सांदोशीच्या जंगलात संभाजीमहाराजांनी सिंहाशी झुंज दिली होती.
त्याचा जबडा हाताने फाडून ठार केले होते. या घटनेवर आधारित हे शिल्प असून,
सुमारे आठ फूट उंच, दहा फूट लांब असे शिल्प आहे.
![]() |
तुळापूर येथे स्वागत कमानीवर साकारलेले आकर्षक शिल्प. |
![]() |
श्रीधर्मवीर छत्रपती संभाजीमहाराजांचे प्रेरणादायी शिल्प. |
![]() |
कवि कलश यांची समाधी. |
श्री कवी कलश यांची समाधी :
श्री
छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी तसेच संभाजी महाराजांचे जवळचे सल्लागार
व काव्यसम्राट श्री कवी कलश यांना देखील संभाजी महाराजांबरोबरच तुळापूर
येथे ठार करण्यात आले. त्यांची समाधी आपणांस संगमेश्वर मंदिराच्या डाव्या
बाजुस दिसते.
![]() |
श्रीधर्मवीर छत्रपती संभाजीमहाराज समाधी. |
![]() |
संगमेश्वर येथील मंदिर व कळस. |
![]() |
मंदिरासमोर असलेला छोटा नंदी. |
![]() |
श्री संगमेश्वर |
![]() |
श्री संगमेश्वराचा कळस. |
![]() |
भीमा, भामा व इंद्रायणनदीचा त्रिवेणी संगमावरील मनोहारी दृश्य. |
![]() |
नदीपात्रत करण्यात येणारे नौकाविहार. |
![]() |
नदीतिरावरील श्री विष्णू महाबल्लाळेश्वर महादेव मंदिर |
![]() |
![]() |
नदीचा घाट |
कसे पोचाल :
- पुण्यापासून ईशान्येला अंदाजे ४० किलोमीटरवर असलेल्या तुळापूर या ठिकाणी पोहचण्यासाठी नगररोड मार्गे सुमारे ३२ किलोमीटर अंतर तर आळंदी रोड मार्गे अंदाजे ३४ किलोमीटर अंतर पार करावे लागते.
- तुळापूर येथे जाण्यासाठी पुणे महानगरपालिका परिवहन महामंडळाच्या बसेसची सुविधा उपलब्ध आहे.
पुण्याकडून यायचे झाल्यास :
- पुणे नगर रोड - चंदन नगर - वाघोली - लोणीकंद - (डावीकडे) तुळापूर फाटा -फुलगाव - तुळापूर.
दुसरा मार्ग
- पुणे -आळंदी रोड मार्गे: पुणे - येरवडा - विश्रांतवाडी - कळस - दिघी - च-होली -आळंदी - मरकळ - तुळापूर (रस्ता थोड्या ठिकाणी खराब आहे.)
- स्वत:ची गाडी असेल तर तुळापूरमध्ये पोहोचण्यासाठी जवळपास १ तास पुरेसा होतो.
भीमा नदी :
आंबेगाव तालुक्यात भीमाशंकर येथे उगम पावते. जिल्ह्यातील तिचा प्रवाह आंबेगाव, खेड, शिरुर या तालुक्यामधुन व दौंड आणि इंदापूर या तालुक्यांच्या भागातून जातो. दौंड आणि इंदापूर तालुक्यांच्या सीमांवरुन जाताना काही काळ पुणे व अहमदनगर आणि पुणे व सोलापूर या जिल्हयांमधील हद्दीवरून ती पुढे जाते. दौंड आणि इंदापूर या तालुक्यांच्या सीमांवरुन वाहत जाऊन ती पुढे नीरा नदीला घेऊन सोलापूर जिल्ह्यात जाते. इंद्रायणी, घोड, मुळा, मुठा, व नीरा या भीमेच्या जिल्ह्यातील प्रमुख उपनद्या आहेत.
आंबेगाव तालुक्यात भीमाशंकर येथे उगम पावते. जिल्ह्यातील तिचा प्रवाह आंबेगाव, खेड, शिरुर या तालुक्यामधुन व दौंड आणि इंदापूर या तालुक्यांच्या भागातून जातो. दौंड आणि इंदापूर तालुक्यांच्या सीमांवरुन जाताना काही काळ पुणे व अहमदनगर आणि पुणे व सोलापूर या जिल्हयांमधील हद्दीवरून ती पुढे जाते. दौंड आणि इंदापूर या तालुक्यांच्या सीमांवरुन वाहत जाऊन ती पुढे नीरा नदीला घेऊन सोलापूर जिल्ह्यात जाते. इंद्रायणी, घोड, मुळा, मुठा, व नीरा या भीमेच्या जिल्ह्यातील प्रमुख उपनद्या आहेत.
इंद्रायणी नदी :
इंद्रायणी
ही भीमेची उपनदी पुणे जिल्ह्याच्या मध्ये भागातून वाहते. ही नदी
लोणावळयाच्या नैऋत्येला कुरवंडेजवळ उगम पावते. हवेली तालुक्यातील तुळापूर
येथे ही भीमेस मिळते.
तुळापूर येथून निघून 20 मिनिटावर असलेले वाघेश्वर मंदिर पाहण्यासाठी निघालो.
वाघेश्वर
तुळापूर येथून निघून 20 मिनिटावर असलेले वाघेश्वर मंदिर पाहण्यासाठी निघालो.
वाघेश्वर
छत्रपती संभाजीमहाराजांना मानाचा मुजरा.
ReplyDeleteछान ..परंतु एक सांगणे असे की तुळापुर ची तुला मुरार जगदेव यांनी केली होती ...शहाजी राजांनी नव्हे
ReplyDeleteमित्रा,
ReplyDeleteचूक झाली.
दुरुस्त करत आहे
वढू बु. येथे महाराजांची समाधीचे अत्यंत सुरेख काम चालू आहे.भाराउन टाकणारे हे स्थळ आहे.
ReplyDeleteवढू बु. येथे महाराजांची समाधीचे अत्यंत सुरेख काम चालू आहे.भाराउन टाकणारे हे स्थळ आहे.
ReplyDeleteमला अक्षरशा रडायला येते की महाराजांनी आपल्यासाठी
ReplyDeleteआपल्या जीवाचा विचार नाही केला पण आता आपण त्यांच्यासाठी काय करतोय
खरंय
Deleteभिमा आणि भामा यांचा संगम शेल-पिंपळगाव येथे होतो मग तुळापूर येथे त्रिवेणी संगम कसा ?
ReplyDeleteत्रिवेणीसंगमात लहान मुलांना पाण्यात उतरता येते का ? तुलापूर च्या आसपास इतर कोणती आणखी ट्रीप साठि जागा आहे का?
ReplyDeleteसंभाजी महाराजांचं... सगळं तुकडे तुकडे झालेलं शरीर शिवून अंत्यविधी केला, त्या गोविंद गायकवाडांचा संदर्भ द्यायला पाहिजे होता.
ReplyDeleteछत्रपती संभाजी महाराज यांच्या देहाचे तुकडे उचलून अंत्यसंस्कार करणारे शिवले आणि देशमुख यांनी केले...
Delete